शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
3
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
4
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
5
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
6
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
7
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
8
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
9
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
10
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
11
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
12
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
13
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
14
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
15
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
16
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
17
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
18
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
19
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
20
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला

कुपोषणबळी कुटुंबीयाच्या घरच्या परिस्थितीचे वास्तव भीषण

By admin | Updated: September 20, 2016 03:47 IST

भूकबळी ठरलेल्या ईश्वर सवरा आणि सागर वाघ यांना व त्यांच्या कुटुंबियांना रोज भूक भागविण्याची भ्रांत पडत होती.

रविंद्र साळवे,

मोखाडा- भूकबळी ठरलेल्या ईश्वर सवरा आणि सागर वाघ यांना व त्यांच्या कुटुंबियांना रोज भूक भागविण्याची भ्रांत पडत होती. अनेकदा उपाशी पोटी रहावे लागत होते. असे भीषण वास्तव लोकमतने त्यांच्या घरी सात्वनासाठी भेट दिली असता. समोर आली आहे. घरात धान्यांचा कण नाही भांडी नाहीत अंथरूण, पांघरूण नाही, पुरेशी वस्त्रे नाही अशी स्थिती आहे.नामदेव सवरा म्हणाले की, रोज आम्ही उठतो ते आज पोटात दोन घास पडतील की नाही याच फिकीरीत कारण आमच्या हाताला रोजगार नाही. आधी तो शोधावा लागतो त्यात तो मिळाला तरी इतकी तुटपुंजी मजुरी मिळते की, त्यातून एक वेळी पोट कसे बसे भरावे असा प्रश्न असतो. आता सध्या हाताला कोणतेच कामे नाही. गवत कापणी करून काही दिवसांपासून आमचा उदरनिर्वाह सुरू आहे. तर आता कुणी गवत निंदणीचे कामे सांगतात हिच कामे करत आम्ही आमच्या मुलाबाळांना खाऊ घालत आहे ईश्वर गेल्याचे खूप दु:ख होत असून आता कृष्णा आणि सोनाली आणि पत्नी एवढाच आमचा परिवार उरला आहे. असे ते म्हणाले. ईश्वरची आई सुंदर हिने सागर गेल्या पासून अंगणवाडीत आहार दिला जात असल्याचे सांगितले. तोच आधी दिला गेला असता तर ईश्वर वाचला असता. कारण तो त्यापूर्वी कधी दिलाच जात नव्हता, असे सांगितले.यानंतर कळमवाडी येथील सागर वाघ या मृत बालकाच्या कुटुंबियांची परिस्थिती जाणून घेतली.त्याचे वडील शिवा म्हणाले की, आम्हाला घर नाही कुडाच्या झोपडीत आम्ही राहत आहोत. काम नसल्याने जगायच कसे हा आम्हला रोजच प्रश्न भेडसावतो. यामुळे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा शेतीचे कामे झाल्यानंतर आम्ही आमच्या मुलाबाळांसह स्थलांतरीत होतो. आम्हाला जॉबकार्डसुध्दा नव्हते, सागरचा मृत्यू झाल्यानंतर आम्हाला जॉबकार्ड दिले आहेत. सागर असतांना कधी कधीच अंगणवाडीतला आहार मिळायचा परंतु सागर गेल्याने या परिस्थितीत बदल झाला आहे. यामुळे सरकार आदिवासींचा जीव जाण्याची वाट पाहते काय असा प्रश्न उपस्थित केला.मुलगी नंदीती, पत्नी सीता असा आमचा परिवार आता उरला आहे, असे ते म्हणाले.मोखाडा ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ३०/३५ कुपोषित बालके दवाखान्यात दाखल झालेली आहेत, त्यांना एफ ७५, एफ १०० फूड दिले जात असून केळी अंडी दूध असा आहार दिला जात असून उपचार चालू असे लोकमतला सांगितले. त्यांच्या घरात कोणतीही चिज वस्तू नव्हती. अशी स्थितीत ते कसे जगत असतील असा प्रश्न कुणालाही पडावा अशी स्थिती होती. हे पाहून कोणाचेही हृदय द्रवेल असे वातावरण होते.