शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

‘स्वदेश भ्रमण’साठी सिंधुदुर्गची निवड

By admin | Updated: April 8, 2015 00:59 IST

केंद्र शासनाची योजना : आर्थिक वर्षात १00 कोटींची तरतूद; राज्यातील एकमेव जिल्हा

सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाच्या ‘स्वदेश भ्रमण’ या पर्यटन विकासासाठी असणाऱ्या योजनेत महाराष्ट्रातून एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील समुद्रकिनारी भागाचा विकास केला जाणार आहे. यासाठी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाने १०० कोटींची तरतूद केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.केंद्र शासनामार्फत यावर्षीपासून पर्यटन विकासासाठी ‘स्वदेश भ्रमण’ ही नवीन योजना तयार केली असून, या योजनेंतर्गत राज्यातून एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश केला आहे. या योजनेंतर्गत तीन वर्षासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने वर्षाला १०० कोटी याप्रमाणे केंद्र शासनामार्फत निधी दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात म्हणजेच सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून, हा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर असणाऱ्या भागाच्या विकासावर खर्च केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी दिली. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचे केले अभिनंदनसन २०१४-१५ या वर्षाकरीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता, निधी वितरण व सनियंत्रण ठेवण्याचे काम यशस्वी करून जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांनी शंभर टक्के निधी खर्च केला. त्याबद्दल जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी सर्व यंत्रणांचे तसेच जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांचे अभिनंदन केले आहे. सन २०१५-१६ चेही उत्कृष्ट नियोजन करून आगामी वर्षातही जिल्हा नियोजनाची कामे उत्कृष्टपणे पार पाडावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी सर्व यंत्रणांना केले आहे.टप्प्याटप्प्याने मिळणार ३०० कोटीमहाराष्ट्रातून एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ‘स्वदेश भ्रमण’ या योजनेत समावेश केल्याने जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यालगत असणाऱ्या बाबींचा विकास करण्यासाठी तीन वर्षांमध्ये ३०० कोटी रुपये मिळणार आहेत. सन २०१५-१६ - १०० कोटी, २०१६-१७ - १०० कोटी व २०१७-१८ - १०० कोटी अशा तीन टप्प्यांत हा निधी मिळणार आहे. या ३०० कोटींतून जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीचा विकास होणार आहे.सागर किनारपट्टी होणार विकसितसिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटर लांबीचा स्वच्छ व नितळ समुद्रकिनारा लाभलेला असून, याठिकाणी पर्यटनदृष्ट्या विकास झालेला दिसून येत नाही. केंद्र शासनाकडून ‘स्वदेश भ्रमण’ या योजनेतून सिंधुदुर्गला समुद्र किनारपट्टीच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी मिळणार आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या पर्यटनस्थळी सोयी-सुविधा या निधीतून केल्या जाणार आहेत.