शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

‘स्वदेश भ्रमण’साठी सिंधुदुर्गची निवड

By admin | Updated: April 8, 2015 00:59 IST

केंद्र शासनाची योजना : आर्थिक वर्षात १00 कोटींची तरतूद; राज्यातील एकमेव जिल्हा

सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाच्या ‘स्वदेश भ्रमण’ या पर्यटन विकासासाठी असणाऱ्या योजनेत महाराष्ट्रातून एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील समुद्रकिनारी भागाचा विकास केला जाणार आहे. यासाठी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी केंद्र शासनाने १०० कोटींची तरतूद केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.केंद्र शासनामार्फत यावर्षीपासून पर्यटन विकासासाठी ‘स्वदेश भ्रमण’ ही नवीन योजना तयार केली असून, या योजनेंतर्गत राज्यातून एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश केला आहे. या योजनेंतर्गत तीन वर्षासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने वर्षाला १०० कोटी याप्रमाणे केंद्र शासनामार्फत निधी दिला जाणार आहे. या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात म्हणजेच सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली असून, हा निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर असणाऱ्या भागाच्या विकासावर खर्च केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी दिली. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचे केले अभिनंदनसन २०१४-१५ या वर्षाकरीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत कामांना प्रशासकीय मान्यता, निधी वितरण व सनियंत्रण ठेवण्याचे काम यशस्वी करून जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांनी शंभर टक्के निधी खर्च केला. त्याबद्दल जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी सर्व यंत्रणांचे तसेच जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात यांचे अभिनंदन केले आहे. सन २०१५-१६ चेही उत्कृष्ट नियोजन करून आगामी वर्षातही जिल्हा नियोजनाची कामे उत्कृष्टपणे पार पाडावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांनी सर्व यंत्रणांना केले आहे.टप्प्याटप्प्याने मिळणार ३०० कोटीमहाराष्ट्रातून एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ‘स्वदेश भ्रमण’ या योजनेत समावेश केल्याने जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्यालगत असणाऱ्या बाबींचा विकास करण्यासाठी तीन वर्षांमध्ये ३०० कोटी रुपये मिळणार आहेत. सन २०१५-१६ - १०० कोटी, २०१६-१७ - १०० कोटी व २०१७-१८ - १०० कोटी अशा तीन टप्प्यांत हा निधी मिळणार आहे. या ३०० कोटींतून जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीचा विकास होणार आहे.सागर किनारपट्टी होणार विकसितसिंधुदुर्ग जिल्ह्याला १२१ किलोमीटर लांबीचा स्वच्छ व नितळ समुद्रकिनारा लाभलेला असून, याठिकाणी पर्यटनदृष्ट्या विकास झालेला दिसून येत नाही. केंद्र शासनाकडून ‘स्वदेश भ्रमण’ या योजनेतून सिंधुदुर्गला समुद्र किनारपट्टीच्या विकासासाठी १०० कोटींचा निधी मिळणार आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या पर्यटनस्थळी सोयी-सुविधा या निधीतून केल्या जाणार आहेत.