शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

सिंधुदुर्ग सर्वात स्वच्छ जिल्हा

By admin | Updated: September 9, 2016 05:23 IST

भारत सरकारच्या ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात सिक्कीम व केरळ राज्याने देशात पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहे. सिक्कीमखेरीज हिमाचल प्रदेश, मिझोरम व नागालँड ग्रामीण स्वच्छतेत आघाडीवर आहेत.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीभारत सरकारच्या ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षणात सिक्कीम व केरळ राज्याने देशात पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहे. सिक्कीमखेरीज हिमाचल प्रदेश, मिझोरम व नागालँड ग्रामीण स्वच्छतेत आघाडीवर आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र १५ व्या क्रमांकावर आहे. मात्र सर्वात स्वच्छ जिल्ह्याचा सन्मान महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने मिळवला असून, सातारा तिसऱ्या तर कोल्हापूर पाचव्या क्रमांकावर आहे. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी सर्वेक्षण अहवालाचे ठळक तपशील गुरूवारी जाहीर केले. पुढले सर्वेक्षण जानेवारी महिन्यात होणार आहे. केंद्र सरकारने देशातल्या ७0 जिल्ह्यांत ७0 हजारांपेक्षा अधिक घरांचे सर्वेक्षण करून हा अहवाल सादर केला. सर्वेक्षणात मुख्यत्वे ग्रामीण भागांचाच समावेश आहे. अहवालानुसार देशातले सर्वाधिक स्वच्छ राज्य सिक्कीम आहे. त्यानंतर अनुक्रमे केरळ, मिझोरम, हिमाचल प्रदेश व नागालँड यांचा क्रमांक लागतो. ग्रामीण स्वच्छतेत बंगाल १२ व्या, गुजराथ १४ व्या तर महाराष्ट्र १५ व्या क्रमांकावर आहे. देशातले सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश २६ व्या तर बिहार सर्वात शेवटच्या ३१ व्या क्रमांकावर आहे. तोमर म्हणाले, की या रँकिंगमुळे राज्यांत व जिल्ह्यामध्ये स्वच्छतेची स्पर्धा वाढेल व जनतेत जागरूकता निर्माण होईल. स्वच्छ जिल्ह्यांच्या यादीत सिंधुदुर्गखालोखाल बंगालचा नादिया, महाराष्ट्रातील सातारा, बंगालचा पूर्व मिदनापूर व महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वेक्षणात सर्वाधिक गुण ग्रामीण भागांत घरातील शौचालयांच्या स्वच्छतेला देण्यात आले. त्यानंतर शाळा व रुग्णालयात साठलेला कचरा व घाण पाण्याचे साठे इत्यादींचे निरीक्षण करून गुण देण्यात आले.ग्रामीण स्वच्छतेत बंगाल १२ व्या, गुजराथ १४ व्या तर महाराष्ट्र १५ व्या क्रमांकावर आहे. देशातले सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश २६ व्या तर बिहार सर्वात शेवटच्या ३१ व्या क्रमांकावर आहे.