शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

भाजपात आयारामांची चांदी

By admin | Updated: September 28, 2014 02:07 IST

स्वबळावर सत्ता काबीज करण्याकरिता सिद्ध झालेल्या भारतीय जनता पार्टीने वेगवेगळ्य़ा पक्षांतून आलेल्या किमान दोन डझन आयारामांकरिता उमेदवारीचे नजराणो पेश केले आहेत.

तिकिटे मिळाली : निष्ठावंतांना डावलले, रा. स्व. संघात नाराजी
संदीप प्रधान - मुंबई
स्वबळावर सत्ता काबीज करण्याकरिता सिद्ध झालेल्या भारतीय जनता पार्टीने वेगवेगळ्य़ा पक्षांतून आलेल्या किमान दोन डझन आयारामांकरिता उमेदवारीचे नजराणो पेश केले आहेत. पक्षाच्या या आयात धोरणावर भाजपा व रा. स्व. संघाचे जुनेजाणते कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.
डॉ. विजयकुमार गावित (नंदूरबार), अनिल गोटे (धुळे शहर), संजय सावकारे (भुसावळ), अतुल भोसले (कराड दक्षिण), डॉ. सुनील देशमुख (अमरावती),
डॉ. माधव किन्हाळकर (भोकर), प्रशांत बंब (गंगापूर), मंदा म्हात्रे (बेलापूर), राम कदम (घाटकोपर पश्चिम),  विजय कांबळे (कुर्ला), लक्ष्मण जगताप (चिंचवड), बबनराव पाचपुते (श्रीगोंदा), अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण), अजित घोरपडे (तासगाव), आशिष देशमुख (काटोल), समीर मेघे (हिंगणा), संजय देवतळे (वरोरा), राजन तेली (सावंतवाडी), वैभव नाईक (ऐरोली), भारती लव्हेकर (वर्सोवा) अशी काही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर मंडळी भाजपाची उमेदवारी घेऊन रिंगणात उतरली आहेत.
याखेरीज शिवसेनेच्या मतदारसंघांत सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष, उप जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. अशा प्रकारे सत्ता आणण्याचा भाजपाचा हा प्रयत्न म्हणजे सुजेला बाळसे धरले असे म्हणण्यासारखा असल्याचे एका कार्यकत्र्याने सांगितले.
 
खोगीरभरतीवर स्वयंसेवक नाराज
अन्य पक्षांतून भाजपात येऊ पाहणा:यांना गोळवलकर गुरुजींच्या साहित्याचा अभ्यास करायला लावल्याखेरीज व त्यांची वैचारिक बैठक पक्की झाल्याखेरीज पक्षात प्रवेश देऊ नका, असा आग्रह माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांनी मुंबईतील एका सभेत धरला होता. मात्र स्वबळाच्या सत्तेची भूक वाढलेल्या भाजपाने सरसंघचालकांच्या या भूमिकेकडे कानाडोळा करून अन्य पक्षांतील खोगीरभरती केली असल्याचे मत एका संघ स्वयंसेवकाने व्यक्त केले.
 
आम्ही सतरंजा उचलायच्या का?
महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली तर सध्या पक्षात आलेले हे उपरे काही काळ टिकून राहतील. मात्र दुर्दैवाने सत्ता आली नाही तर यापैकी किती जण भाजपा व संघ परिवाराच्या विचारधारेशी जोडलेले राहतील, असा सवाल केला जात आहे. केडरबेस पार्टी मासबेस झाल्याखेरीज सत्ता मिळत नाही, हे खरे असले तरी आयारामांना उमेदवारीचे नजराणो देताना आम्ही कार्यकत्र्यानी केवळ सतरंजा उचलायच्या का, असा संतप्त सवाल एका कार्यकत्र्याने केला.