शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात आयारामांची चांदी

By admin | Updated: September 28, 2014 02:07 IST

स्वबळावर सत्ता काबीज करण्याकरिता सिद्ध झालेल्या भारतीय जनता पार्टीने वेगवेगळ्य़ा पक्षांतून आलेल्या किमान दोन डझन आयारामांकरिता उमेदवारीचे नजराणो पेश केले आहेत.

तिकिटे मिळाली : निष्ठावंतांना डावलले, रा. स्व. संघात नाराजी
संदीप प्रधान - मुंबई
स्वबळावर सत्ता काबीज करण्याकरिता सिद्ध झालेल्या भारतीय जनता पार्टीने वेगवेगळ्य़ा पक्षांतून आलेल्या किमान दोन डझन आयारामांकरिता उमेदवारीचे नजराणो पेश केले आहेत. पक्षाच्या या आयात धोरणावर भाजपा व रा. स्व. संघाचे जुनेजाणते कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.
डॉ. विजयकुमार गावित (नंदूरबार), अनिल गोटे (धुळे शहर), संजय सावकारे (भुसावळ), अतुल भोसले (कराड दक्षिण), डॉ. सुनील देशमुख (अमरावती),
डॉ. माधव किन्हाळकर (भोकर), प्रशांत बंब (गंगापूर), मंदा म्हात्रे (बेलापूर), राम कदम (घाटकोपर पश्चिम),  विजय कांबळे (कुर्ला), लक्ष्मण जगताप (चिंचवड), बबनराव पाचपुते (श्रीगोंदा), अमल महाडिक (कोल्हापूर दक्षिण), अजित घोरपडे (तासगाव), आशिष देशमुख (काटोल), समीर मेघे (हिंगणा), संजय देवतळे (वरोरा), राजन तेली (सावंतवाडी), वैभव नाईक (ऐरोली), भारती लव्हेकर (वर्सोवा) अशी काही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील मातब्बर मंडळी भाजपाची उमेदवारी घेऊन रिंगणात उतरली आहेत.
याखेरीज शिवसेनेच्या मतदारसंघांत सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष, उप जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. अशा प्रकारे सत्ता आणण्याचा भाजपाचा हा प्रयत्न म्हणजे सुजेला बाळसे धरले असे म्हणण्यासारखा असल्याचे एका कार्यकत्र्याने सांगितले.
 
खोगीरभरतीवर स्वयंसेवक नाराज
अन्य पक्षांतून भाजपात येऊ पाहणा:यांना गोळवलकर गुरुजींच्या साहित्याचा अभ्यास करायला लावल्याखेरीज व त्यांची वैचारिक बैठक पक्की झाल्याखेरीज पक्षात प्रवेश देऊ नका, असा आग्रह माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांनी मुंबईतील एका सभेत धरला होता. मात्र स्वबळाच्या सत्तेची भूक वाढलेल्या भाजपाने सरसंघचालकांच्या या भूमिकेकडे कानाडोळा करून अन्य पक्षांतील खोगीरभरती केली असल्याचे मत एका संघ स्वयंसेवकाने व्यक्त केले.
 
आम्ही सतरंजा उचलायच्या का?
महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आली तर सध्या पक्षात आलेले हे उपरे काही काळ टिकून राहतील. मात्र दुर्दैवाने सत्ता आली नाही तर यापैकी किती जण भाजपा व संघ परिवाराच्या विचारधारेशी जोडलेले राहतील, असा सवाल केला जात आहे. केडरबेस पार्टी मासबेस झाल्याखेरीज सत्ता मिळत नाही, हे खरे असले तरी आयारामांना उमेदवारीचे नजराणो देताना आम्ही कार्यकत्र्यानी केवळ सतरंजा उचलायच्या का, असा संतप्त सवाल एका कार्यकत्र्याने केला.