शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

बारावीच्या परीक्षार्थींच्या संख्येत लक्षणीय वाढ

By admin | Updated: February 28, 2017 04:51 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा मंगळवार (दि. २८)पासून सुरू होणार आहे

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा मंगळवार (दि. २८)पासून सुरू होणार आहे. यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा एक लाखाहून अधिक विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले आहेत.राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत २८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा परीक्षेस १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यात ८ लाख ४८ हजार ९२९ विद्यार्थी आणि ६ लाख ५६ हजार ४३६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास अधिक संधी उपलब्ध झाल्याने ही वाढ झाली असावी, असा अंदाज राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.म्हमाणे म्हणाले, बारावीच्या परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी ‘गैरमार्गाविरोधात लढा’ हे अभियान राबाविले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात ७ याप्रमाणे सुमारे २५० भरारी पथके नेमण्यात आली आहेत. माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून, या विषयास एकूण १ लाख ११ हजार ७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्याच प्रमाणे या वर्षी प्रथमच मिलिट्री स्कूलच्या विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान विषयाची परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यासाठी १ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना १० मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिल्या जातील. (प्रतिनिधी)>विभागीय मंडळाचे हेल्पलाइन क्रमांक पुणे : (०२०) ६५२९२३१७२, नागपूर : (०७१२) २५६५४०३,२५५३५०७३, औरंगाबाद : (०२४०) २३३४२२८,२३३४२८४४, मुंबई : (०२२) २७८९३७५६,२७८८१०७५५, नाशिक : (०२५३) २५९२१४३६, कोल्हापूर : (०२३१) २६९६१०१़, १०२,१०३७, अमरावती : (०७२१) २६६२६४७,८, लातूर : (०२३८२)२५१६३३,२५१७३३९, कोकण : (०२३५२) २२८४८०>परीक्षा केंद्रात मोबाइल बंदीगेल्या काही परीक्षांचा अनुभव लक्षात घेता परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे आधी ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर बारावीची प्रश्नपत्रिका बाहेर पडते. परिणामी, परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदा विद्यार्थी, शिक्षक कोणीही परीक्षा केंद्रात मोबाइल घेऊन जाणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी केवळ अर्धा तास आधीच परीक्षा केंद्राच्या प्रमुखाच्या ताब्यात प्रश्नपत्रिका दिल्या जातील.- गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ