शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल! ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:54 IST

मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च करण्याची ताकद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आता राज्यातील मंदिरांच्या दानपेट्या खुल्या होणार आहेत. नामवंत देवस्थानांच्या एकत्रित पुढाकारातून येत्या मे मध्ये राज्यात सुमारे चार हजार विवाह धूमधडाक्यात लावून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ८० लाखांच्या खर्चाचे नियोजन करण्यात येत आहे.

- अविनाश साबापुरेयवतमाळ : मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च करण्याची ताकद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आता राज्यातील मंदिरांच्या दानपेट्या खुल्या होणार आहेत. नामवंत देवस्थानांच्या एकत्रित पुढाकारातून येत्या मे मध्ये राज्यात सुमारे चार हजार विवाह धूमधडाक्यात लावून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ८० लाखांच्या खर्चाचे नियोजन करण्यात येत आहे.धर्मादाय आयुक्तांकडे लाखो सामाजिक संस्था, धार्मिक ट्रस्ट नोंदणीकृत आहेत. मात्र, त्यातील बºयाचशा संस्थांकडे पैसा असूनही त्या समाजासाठी काहीच खर्च करीत नाहीत. त्यांच्याकडून हा पैसा घेऊन त्यातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचे परिपत्रक सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आले आहे.यासाठी जिल्हास्तरावर ‘सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा समिती’ स्थापन करुन धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी करण्यात आली आहे. या समित्यांच्या नावे स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले असून त्यात जमा होणाºया निधीतून विवाह सोहळ्यांचा खर्च केला जाणार आहे. या समितीमध्ये सहभागी झालेल्या देवस्थान ट्रस्टकडील पैसाही यात वापरला जाणार आहे.यवतमाळ जिल्हास्तरीय विवाह मेळावा १२ मे रोजी होणार आहे. तर राज्यभरातील जिल्ह्यांमध्येही मे मध्येच सर्वधर्मीय सामूहिक मेळावे होणार असल्याची माहिती सहायक धर्मादाय आयुक्त प्रशांत चव्हाण यांनी दिली.सामाजिक कामांसाठी खर्च होत नसल्याने अनेक संस्थांची मान्यता काढून घेण्यात आली आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २१ हजार नोंदणीकृत संस्था असल्या तरी त्यातील ४ हजार संस्थांची मान्यता गेल्या वर्षभरात रद्द करावी लागली.- जयदीप चौहान, सहायक धर्मादाय आयुक्त, यवतमाळ

टॅग्स :marriageलग्न