शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मंदिरांच्या दानपेटीतून होणार शुभमंगल! ४००० शेतकरी कन्यांची बांधणार लग्नगाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:54 IST

मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च करण्याची ताकद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आता राज्यातील मंदिरांच्या दानपेट्या खुल्या होणार आहेत. नामवंत देवस्थानांच्या एकत्रित पुढाकारातून येत्या मे मध्ये राज्यात सुमारे चार हजार विवाह धूमधडाक्यात लावून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ८० लाखांच्या खर्चाचे नियोजन करण्यात येत आहे.

- अविनाश साबापुरेयवतमाळ : मुला-मुलींच्या लग्नाचा खर्च करण्याची ताकद नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आता राज्यातील मंदिरांच्या दानपेट्या खुल्या होणार आहेत. नामवंत देवस्थानांच्या एकत्रित पुढाकारातून येत्या मे मध्ये राज्यात सुमारे चार हजार विवाह धूमधडाक्यात लावून देण्यात येणार आहेत. त्यासाठी ८० लाखांच्या खर्चाचे नियोजन करण्यात येत आहे.धर्मादाय आयुक्तांकडे लाखो सामाजिक संस्था, धार्मिक ट्रस्ट नोंदणीकृत आहेत. मात्र, त्यातील बºयाचशा संस्थांकडे पैसा असूनही त्या समाजासाठी काहीच खर्च करीत नाहीत. त्यांच्याकडून हा पैसा घेऊन त्यातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याबाबतचे परिपत्रक सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आले आहे.यासाठी जिल्हास्तरावर ‘सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावा समिती’ स्थापन करुन धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी करण्यात आली आहे. या समित्यांच्या नावे स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले असून त्यात जमा होणाºया निधीतून विवाह सोहळ्यांचा खर्च केला जाणार आहे. या समितीमध्ये सहभागी झालेल्या देवस्थान ट्रस्टकडील पैसाही यात वापरला जाणार आहे.यवतमाळ जिल्हास्तरीय विवाह मेळावा १२ मे रोजी होणार आहे. तर राज्यभरातील जिल्ह्यांमध्येही मे मध्येच सर्वधर्मीय सामूहिक मेळावे होणार असल्याची माहिती सहायक धर्मादाय आयुक्त प्रशांत चव्हाण यांनी दिली.सामाजिक कामांसाठी खर्च होत नसल्याने अनेक संस्थांची मान्यता काढून घेण्यात आली आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २१ हजार नोंदणीकृत संस्था असल्या तरी त्यातील ४ हजार संस्थांची मान्यता गेल्या वर्षभरात रद्द करावी लागली.- जयदीप चौहान, सहायक धर्मादाय आयुक्त, यवतमाळ

टॅग्स :marriageलग्न