शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

...झाले एकदाचे शुभमंगल सावधान !

By admin | Updated: April 29, 2016 02:56 IST

लग्न समारंभाचा खर्च करण्याची ऐपत नसलेल्या जोडप्यांनी १० ते १५ वर्षानंतर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लग्न केले

रवी रामगुंडेवार,एटापल्ली (गडचिरोली)- लग्न समारंभाचा खर्च करण्याची ऐपत नसलेल्या जोडप्यांनी १० ते १५ वर्षानंतर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लग्न केले. एटापल्ली परिसरातील गोंड आदिवासी जमातीमध्ये आजही हीआगळीवेगळी परंपरा जोपासली जाते. जीवनगट्टा येथील सुमारे १२ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. गोंड जमातीमध्ये आर्थिक परिस्थिती लग्नाच्या आड येत नाही. परिस्थिती हलाखीची असल्यास गोंड जमातीतील परंपरेनुसार कोणताही समारंभ न करता वर वधूला आपल्या घरी घेऊन येतो आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य रितसर सुरू होते. जेव्हा केव्हा आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळी लग्नसमारंभ करण्यास परवानगी दिली जाते. गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील गोंड जमातीचे नागरिक मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा जोपासत आहेत. मात्र आयुष्याच्या शेवटी का होईना लग्नसमारंभ आयोजित केला जातो. जीवनगट्टा येथे गोंड जमातीची एकूण ९६ घरे आहेत. लोकसंख्या ५०० च्या जवळपास आहे. या गावातील १२ जोडप्यांचे विवाह २८ एप्रिल रोजी त्यांच्या घरी पार पडले. भोजनाचा कार्यक्रम मात्र सामूहिक ठेवण्यात आला होता. बोहल्यावर चढलेल्या जोडप्यांनी वैवाहिक आयुष्य सुरू करून दोन ते २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, या सर्वांचा सामूहिक विवाह सोहळा पुढील आठवड्यात गावाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी नियोजनही केले आहे. यापूर्वीही १९९४-९५ मध्ये २० जोडप्यांचा विवाह याच गावात लावून देण्यात आला होता. मुलीचे लग्न कसे करायचे, या चिंतेतून किंवा लग्नासाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर डोक्यावर झाल्याने आत्महत्या होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. या पार्श्वभूमीवर गोंड जमातीमधील ही परंपरा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.>छोट्याशा गावाने केले मोठे काम...>आर्थिक परिस्थितीमुळे लग्न करून शकणाऱ्या जोडप्यांना एकत्रित राहण्यास समाजाची मान्यता आहे. परंतु अधिकृत लग्न बोहला चढल्याशिवाय अशा जोडप्यांना धार्मिक कार्यात पूजाविधी बंद असते. त्यामुळे त्यांना विवाह करावाच लागतो. त्याचाच हा सोहळा आहे. एका छोट्याशा गावात समाजाच्या पुढाकाराने हे मोठे कार्य पार पडले आहे.- देवानंद गावडे, गोंड समाजातील प्रमुख व्यक्ती