शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

हिम्मत असेल तर सदाशिव पेठेस 'ठाकरे पेठ' नाव द्या; समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देण्यास विरोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 14:57 IST

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी विदर्भ राज्याचे वचन पाळले नाही, असा आरोप करत शिवसेना नेत्यांची नावे मुंबई, पुण्यात शोभतील, असे श्रीहरी अणे म्हणाले. तसेच, हिम्मत असेल तर सदाशिव पेठेला 'ठाकरे पेठ' नाव द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरुन सध्या शिवसेना-भाजपामध्ये वाद सुरु आहे. समृद्धी महामार्गालाशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यायचे की माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे, यावरुन शिवसेना-भाजपा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, या वादात आता माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी उडी घेतली आहे. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास श्रीहरी अणे यांनी विरोध केला आहे. 

श्रीहरी अणे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून शिवसेनेच्या मागणीला विरोध दर्शविला आहे. समृद्धी महामार्ग हे नाव वाईट आहे काय? असा सवाल त्यांनी विचारला आहे. विदर्भासाठी शिवसेनेच्या एकाही नेत्याने काहीच केले नाही. या एका कारणासाठी तरी शिवसेनेच्या नेत्याचे नाव समृद्धी महामार्गाला नको, असे श्रीहरी अणे यांनी म्हटले आहे. 

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांनी विदर्भ राज्याचे वचन पाळले नाही, असा आरोप करत शिवसेना नेत्यांची नावे मुंबई, पुण्यात शोभतील, असे श्रीहरी अणे म्हणाले. तसेच, हिम्मत असेल तर सदाशिव पेठेला 'ठाकरे पेठ' नाव द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर, विदर्भातील महामार्गाचे नाव समृद्धी महामार्ग योग्य आहे. नाव बदलायचेच असेल तर 'विदर्भ' महामार्ग करा. व्यक्ती विशेष नावे हवी असतील तर विदर्भ कर्मभूमी असलेल्या महात्मा गांधी यांचे नाव समृद्धी महामार्गाला द्या, अशी मागणी श्रीहरी अणे यांनी केली आहे. 

दरम्यान, शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गShiv Senaशिवसेना