शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

२३ तारखेला औकात दाखवू

By admin | Updated: February 19, 2017 02:22 IST

शिवसेना आणि शिवसैनिकांनी गेली पन्नास वर्षे अहोरात्र मुंबई सेवा करुनच मुंबई जिंकली आहे. तुमच्यासारख्या प्रचारसभा घेऊन जिंकली नाही. मुख्यमंत्र्यांच्या थापा ऐकून लोक कंटाळले

मुंबई : शिवसेना आणि शिवसैनिकांनी गेली पन्नास वर्षे अहोरात्र मुंबई सेवा करुनच मुंबई जिंकली आहे. तुमच्यासारख्या प्रचारसभा घेऊन जिंकली नाही. मुख्यमंत्र्यांच्या थापा ऐकून लोक कंटाळले आहेत. तरीही ते अजून थापाच मारत आहेत. आमची औकात काढली, कपडे उतरविण्याची भाषा केलीत, मुंबईकर जनता २३ तारखेला तुम्हाला औकात दाखवेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या प्रचारसभेत भाजपावर हल्लाबोल केला. रविवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता असल्याने सर्वच पक्षांनी शनिवारी जाहीरसभा घेत आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर शिवसेनेची सभा झाली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. पुण्यातील मुख्यमंत्र्यांची सभा पारदर्शक होती. सभेला गर्दी झाली नाही म्हणून मुख्यमंत्रीही ‘पारदर्शक’ झाले, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंची देना बँक नाही तर लेना बँक आहे म्हटले होते. पण त्यांची ना लेना, ना देना बँक आहे, त्यांची केवळ नो अ‍ॅक्सिस बँक आहे. शिवसैनिकांची भरगच्चा बँक आमच्याकडे आहे तुमच्यासारखी रिकामी नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.मुंबई महापालिकेने केलेली कामे यांना दिसली नाही. मुंबई महापालिकेत आपली एकहाती सत्ता येणार आहे त्यानंतर आरोग्य कवच योजनेच्या शिबिरात सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासणार आहे, म्हणजे त्यांना पाटणा वगैरे दिसणार नाही. माझ्या सोन्यासारख्या मुंबईची तुलना पाटणाशी करून तिची अहवेलना करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना निक्षून सांगितले.वीस वर्षे सोबत असताना आमचा भ्रष्टाचार दिसला नाही. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना भाजपाचे मंत्री भ्रष्टाचाराने किती बरबटलेले आहेत ते आधी सांगा. भ्रष्ट होतो तर मग युतीच्या चर्चेला आलातच कशाला, असा सवाल करतानाच तुम्हाला ११४ जागा सोडल्या असत्या तर मग आम्ही पारदर्शी ठरलो असतो का, असा सवाल उद्धव यांनी केला. त्यांच्या जाहिरातींप्रमाणेच भाजपाला आता ‘चल हट’ म्हणण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले. शिवसेना संपविण्याची भाषा केली गेली पण तुमच्या सात नव्हे सातशे पिढ्या खाली आल्या तरी शिवसैनिक हाती भगवा घेऊन तुमच्या छाताडावर नाचेल. शिवसेनेचा एक तरी नगरसेवक भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सापडला असता, तर या भाजपाने थयथयाट केला असता. पारदर्शकतेत मुंबई अव्वल आहे. त्याचा अभिमान आहे. एकही रुपयाचे कर्ज डोक्यावर नसलेली मुंबई ही एकमेव पालिका आहे. हजारो कोटींच्या ठेवी बँकेत ठेवल्या. जनतेच्या या पैशावरच तुमचा डोळा आहे. आम्ही जनतेच्या पैशाला कधी हात लावला नाही आणि लावणारही नाही. (प्रतिनिधी)मोदींवर टीकामुंबईतील नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताय. पण हजारो कोटींचा पैसा खर्च करुनही गंगा नदीचे एक थेंब पाणी शुद्ध झाले नसल्याचा अहवाल खुद्द लवादाना दिला आहे. मग ‘नमामी गंगे’चा पैसा मोदींच्या खिशात गेला म्हणायचे का, असा सवाल उद्धव यांनी केला.