शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

२३ तारखेला औकात दाखवू

By admin | Updated: February 19, 2017 02:22 IST

शिवसेना आणि शिवसैनिकांनी गेली पन्नास वर्षे अहोरात्र मुंबई सेवा करुनच मुंबई जिंकली आहे. तुमच्यासारख्या प्रचारसभा घेऊन जिंकली नाही. मुख्यमंत्र्यांच्या थापा ऐकून लोक कंटाळले

मुंबई : शिवसेना आणि शिवसैनिकांनी गेली पन्नास वर्षे अहोरात्र मुंबई सेवा करुनच मुंबई जिंकली आहे. तुमच्यासारख्या प्रचारसभा घेऊन जिंकली नाही. मुख्यमंत्र्यांच्या थापा ऐकून लोक कंटाळले आहेत. तरीही ते अजून थापाच मारत आहेत. आमची औकात काढली, कपडे उतरविण्याची भाषा केलीत, मुंबईकर जनता २३ तारखेला तुम्हाला औकात दाखवेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या प्रचारसभेत भाजपावर हल्लाबोल केला. रविवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता असल्याने सर्वच पक्षांनी शनिवारी जाहीरसभा घेत आपली दावेदारी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर शिवसेनेची सभा झाली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. पुण्यातील मुख्यमंत्र्यांची सभा पारदर्शक होती. सभेला गर्दी झाली नाही म्हणून मुख्यमंत्रीही ‘पारदर्शक’ झाले, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंची देना बँक नाही तर लेना बँक आहे म्हटले होते. पण त्यांची ना लेना, ना देना बँक आहे, त्यांची केवळ नो अ‍ॅक्सिस बँक आहे. शिवसैनिकांची भरगच्चा बँक आमच्याकडे आहे तुमच्यासारखी रिकामी नाही, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.मुंबई महापालिकेने केलेली कामे यांना दिसली नाही. मुंबई महापालिकेत आपली एकहाती सत्ता येणार आहे त्यानंतर आरोग्य कवच योजनेच्या शिबिरात सर्वप्रथम मुख्यमंत्र्यांचे डोळे तपासणार आहे, म्हणजे त्यांना पाटणा वगैरे दिसणार नाही. माझ्या सोन्यासारख्या मुंबईची तुलना पाटणाशी करून तिची अहवेलना करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना निक्षून सांगितले.वीस वर्षे सोबत असताना आमचा भ्रष्टाचार दिसला नाही. आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना भाजपाचे मंत्री भ्रष्टाचाराने किती बरबटलेले आहेत ते आधी सांगा. भ्रष्ट होतो तर मग युतीच्या चर्चेला आलातच कशाला, असा सवाल करतानाच तुम्हाला ११४ जागा सोडल्या असत्या तर मग आम्ही पारदर्शी ठरलो असतो का, असा सवाल उद्धव यांनी केला. त्यांच्या जाहिरातींप्रमाणेच भाजपाला आता ‘चल हट’ म्हणण्याची वेळ आली आहे असेही ते म्हणाले. शिवसेना संपविण्याची भाषा केली गेली पण तुमच्या सात नव्हे सातशे पिढ्या खाली आल्या तरी शिवसैनिक हाती भगवा घेऊन तुमच्या छाताडावर नाचेल. शिवसेनेचा एक तरी नगरसेवक भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सापडला असता, तर या भाजपाने थयथयाट केला असता. पारदर्शकतेत मुंबई अव्वल आहे. त्याचा अभिमान आहे. एकही रुपयाचे कर्ज डोक्यावर नसलेली मुंबई ही एकमेव पालिका आहे. हजारो कोटींच्या ठेवी बँकेत ठेवल्या. जनतेच्या या पैशावरच तुमचा डोळा आहे. आम्ही जनतेच्या पैशाला कधी हात लावला नाही आणि लावणारही नाही. (प्रतिनिधी)मोदींवर टीकामुंबईतील नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करताय. पण हजारो कोटींचा पैसा खर्च करुनही गंगा नदीचे एक थेंब पाणी शुद्ध झाले नसल्याचा अहवाल खुद्द लवादाना दिला आहे. मग ‘नमामी गंगे’चा पैसा मोदींच्या खिशात गेला म्हणायचे का, असा सवाल उद्धव यांनी केला.