शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

जावं ‘त्या’ गटात की राहावं गपगुमान आहे तिथंच..?

By अतुल कुलकर्णी | Updated: October 2, 2022 11:05 IST

तात्यासाहेब, एकच सवाल छळतो आहे... जगावं की मरावं असं म्हणून तुम्ही गेलात पण, आज आमच्या अस्वस्थतेनं कैलास शिखर गाठलं आहे... 

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

तात्यासाहेब, एकच सवाल छळतो आहे...जगावं की मरावं असं म्हणून तुम्ही गेलात पण, आज आमच्या अस्वस्थतेनंकैलास शिखर गाठलं आहे... एकच सवाल, तात्यासाहेब एकच सवाल...जावं ‘त्या’ गटात की राहावं गपगुमान आहे तिथंच..?हा एकच सवाल दिवसरात्र छळतोय...!

फुकट्या पदावलीचा तुकडा घेऊन...निष्ठेचं कथित प्रमाणपत्र कवटाळून,राहावं बांदऱ्याच्याच रस्त्यांवर...कधीतरी, काहीतरी मिळेल या आशेनंकी जावं बेफाम अनामिक आनंदानं...ठाण्यातल्या मठाच्या दिशेनं...हा एकच सवाल छळतो आहे..!

तुम्ही ग्रेट होतात तात्यासाहेब...म्हणून तुम्ही लिहून गेलात...

“जगावं बेशरम लाचार आनंदानंकी फेकून द्यावं हे देहाचं लक्तरत्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये”आम्ही तर असा सवालही विचारू शकत नाहीकारण प्रश्न विचारणाऱ्यांचं पुढं काय होतं हे तुम्हाला नाही कळणार तात्यासाहेब...!

आमच्या पुढे प्रश्न वेगळेच आहेत तात्यासाहेब,कसा टिकवावा मतदारसंघ...? कशी टिकवावी आमदारकी..? कसा टिकवावा लोकांच्या मनातला विश्वास...?कशी व्यक्त करावी मनातली टोकाची अस्वस्थता,की फेकून द्यावं आता हे खांद्यावरचं जुनाट, मोडीस निघालेलं धनुष्य त्यात गुंडाळलेल्या बोथट बाणांसह...आणि नव्याने मिळणारं धनुष्य घ्यावं हातीत्यातल्या नव्या कोऱ्या टोकदार बाणांसह...आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी...

कसा करावा तात्पुरता शेवट तात्यासाहेब,मनात निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांचा..?की घ्यावा एकदाचा निर्णयमाझ्या मतदारसंघासाठी...माझ्या आमदारकीसाठी...माझ्या टक्केवारीसाठी आणि मिळाली तर माझ्या लाल दिव्याच्या गाडीसाठी...माझ्या एका निर्णयानं,अनेक प्रश्नांना मुक्ती मिळेल तात्यासाहेब...

जगावं की मरावं हा प्रश्न तात्यासाहेब तुमच्या पोरांनी तुमच्यापुढे उभा केला...आमच्या पोरा बाळांसाठी राहावं इथंच की जावं ठाण्याच्या दिशेनंहा खरा प्रश्न आहे आमच्यापुढं...

मुला बाळांचा प्रश्न तुम्हाला नव्हताच तात्यासाहेब, आम्हाला मात्र एकच सवाल छळतो आहे,आमच्या पोरा बाळांच्या भविष्यातील राजकारणाचा.इतकी वर्ष निष्ठेनं काम करून आम्हाला काय मिळालं...?असा सवाल जेव्हा बायका पोरं करतात,तेव्हा काय उत्तर द्यायचं आम्ही..?तेही कोणी सांगत नाही तात्यासाहेब...या अस्वस्थतेनं जीवनाला असा डंख मारला की, नंतर येणाऱ्या निद्रेला आमच्या अस्तित्वाचाच प्रश्न पडावा,त्या निद्रेतही पुन्हा स्वप्न पडू लागली तर...?तर, नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्यासाठी जीव अधीर होत आहे म्हणून जुनेपण सोडणं सहन करतो आहे...तात्यासाहेब, निर्जीवपणानंआमच्या अस्तित्वावर होणारे अत्याचार...आणि मदतीचा मिळालेला खोका घेऊन उभे आहोत ताठ मानेने...आमच्या दयाघनाच्या दाराशी...!

तात्यासाहेब,“तो” आमच्यासाठी जीव ओवाळून टाकायला तयार आहे...एका बाजूला, ज्यांनी आम्हाला जन्म दिलाते आम्हाला विसरतातआणि दुसऱ्या बाजूला, ज्यांनी आम्हाला मदतीचा हात दिला“तो” आमच्यासाठी धावून येतोय...तेव्हा तात्यासाहेब तुम्हीच सांगा आम्ही कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं...?

टू बी ऑर नॉट टू बी,असा सवाल त्या शेक्सपियरला पडला होता,जगावर की मरावं हा सवाल तुम्हाला पडला होता,आम्हाला मात्रजावं ‘त्या’ गटात की आहे तिथंच राहावं...हा एकच सवाल दिवसरात्र छळतोय...!हा एकच सवाल दिवसरात्र छळतोय...! 

- तूमचाच, बाबूराव

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Politicsराजकारण