शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
5
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
6
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
7
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
8
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
9
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
10
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
11
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
12
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
13
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
14
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
15
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
16
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

जावं ‘त्या’ गटात की राहावं गपगुमान आहे तिथंच..?

By अतुल कुलकर्णी | Updated: October 2, 2022 11:05 IST

तात्यासाहेब, एकच सवाल छळतो आहे... जगावं की मरावं असं म्हणून तुम्ही गेलात पण, आज आमच्या अस्वस्थतेनं कैलास शिखर गाठलं आहे... 

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

तात्यासाहेब, एकच सवाल छळतो आहे...जगावं की मरावं असं म्हणून तुम्ही गेलात पण, आज आमच्या अस्वस्थतेनंकैलास शिखर गाठलं आहे... एकच सवाल, तात्यासाहेब एकच सवाल...जावं ‘त्या’ गटात की राहावं गपगुमान आहे तिथंच..?हा एकच सवाल दिवसरात्र छळतोय...!

फुकट्या पदावलीचा तुकडा घेऊन...निष्ठेचं कथित प्रमाणपत्र कवटाळून,राहावं बांदऱ्याच्याच रस्त्यांवर...कधीतरी, काहीतरी मिळेल या आशेनंकी जावं बेफाम अनामिक आनंदानं...ठाण्यातल्या मठाच्या दिशेनं...हा एकच सवाल छळतो आहे..!

तुम्ही ग्रेट होतात तात्यासाहेब...म्हणून तुम्ही लिहून गेलात...

“जगावं बेशरम लाचार आनंदानंकी फेकून द्यावं हे देहाचं लक्तरत्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये”आम्ही तर असा सवालही विचारू शकत नाहीकारण प्रश्न विचारणाऱ्यांचं पुढं काय होतं हे तुम्हाला नाही कळणार तात्यासाहेब...!

आमच्या पुढे प्रश्न वेगळेच आहेत तात्यासाहेब,कसा टिकवावा मतदारसंघ...? कशी टिकवावी आमदारकी..? कसा टिकवावा लोकांच्या मनातला विश्वास...?कशी व्यक्त करावी मनातली टोकाची अस्वस्थता,की फेकून द्यावं आता हे खांद्यावरचं जुनाट, मोडीस निघालेलं धनुष्य त्यात गुंडाळलेल्या बोथट बाणांसह...आणि नव्याने मिळणारं धनुष्य घ्यावं हातीत्यातल्या नव्या कोऱ्या टोकदार बाणांसह...आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी...

कसा करावा तात्पुरता शेवट तात्यासाहेब,मनात निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांचा..?की घ्यावा एकदाचा निर्णयमाझ्या मतदारसंघासाठी...माझ्या आमदारकीसाठी...माझ्या टक्केवारीसाठी आणि मिळाली तर माझ्या लाल दिव्याच्या गाडीसाठी...माझ्या एका निर्णयानं,अनेक प्रश्नांना मुक्ती मिळेल तात्यासाहेब...

जगावं की मरावं हा प्रश्न तात्यासाहेब तुमच्या पोरांनी तुमच्यापुढे उभा केला...आमच्या पोरा बाळांसाठी राहावं इथंच की जावं ठाण्याच्या दिशेनंहा खरा प्रश्न आहे आमच्यापुढं...

मुला बाळांचा प्रश्न तुम्हाला नव्हताच तात्यासाहेब, आम्हाला मात्र एकच सवाल छळतो आहे,आमच्या पोरा बाळांच्या भविष्यातील राजकारणाचा.इतकी वर्ष निष्ठेनं काम करून आम्हाला काय मिळालं...?असा सवाल जेव्हा बायका पोरं करतात,तेव्हा काय उत्तर द्यायचं आम्ही..?तेही कोणी सांगत नाही तात्यासाहेब...या अस्वस्थतेनं जीवनाला असा डंख मारला की, नंतर येणाऱ्या निद्रेला आमच्या अस्तित्वाचाच प्रश्न पडावा,त्या निद्रेतही पुन्हा स्वप्न पडू लागली तर...?तर, नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्यासाठी जीव अधीर होत आहे म्हणून जुनेपण सोडणं सहन करतो आहे...तात्यासाहेब, निर्जीवपणानंआमच्या अस्तित्वावर होणारे अत्याचार...आणि मदतीचा मिळालेला खोका घेऊन उभे आहोत ताठ मानेने...आमच्या दयाघनाच्या दाराशी...!

तात्यासाहेब,“तो” आमच्यासाठी जीव ओवाळून टाकायला तयार आहे...एका बाजूला, ज्यांनी आम्हाला जन्म दिलाते आम्हाला विसरतातआणि दुसऱ्या बाजूला, ज्यांनी आम्हाला मदतीचा हात दिला“तो” आमच्यासाठी धावून येतोय...तेव्हा तात्यासाहेब तुम्हीच सांगा आम्ही कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं...?

टू बी ऑर नॉट टू बी,असा सवाल त्या शेक्सपियरला पडला होता,जगावर की मरावं हा सवाल तुम्हाला पडला होता,आम्हाला मात्रजावं ‘त्या’ गटात की आहे तिथंच राहावं...हा एकच सवाल दिवसरात्र छळतोय...!हा एकच सवाल दिवसरात्र छळतोय...! 

- तूमचाच, बाबूराव

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Politicsराजकारण