शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राज्यात लागणार धक्कादायक निकाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 06:37 IST

राज्यात चार टप्प्यांमध्ये मतदान झाले.

मुंबई : राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांमधील ८६७ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी होणार असून त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

राज्यात मुख्य लढत भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी झाली. वंचित बहुजन आघाडी आणि बसपाची उमेदवारी काही दिग्गजांच्या विजयात अडसर ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल) राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने कौल दिला आहे. तो कौल खरा ठरणार की अनपेक्षित निकाल लागणार, याबाबत कमालीची उत्कंठा लागून आहे.

राज्यात चार टप्प्यांमध्ये मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, बसपा प्रमुख मायावती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर आदींच्या प्रचारसभांचा झंझावात राज्याने अनुभवला. गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरूवात होणार असून आयोगाने जय्यत तयारी केली आहे. ३८ ठिकाणी मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मतमोजणीसाठी सुमार १ लाख कर्मचारी आणि ५० हजारहून अधिक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत.

पक्षनिहाय उमेदवारकाँग्रेसने २५, राष्ट्रवादी काँग्रेस १९, भाजप २५, शिवसेना २३, वंचित बहुजन आघाडी ४७, बसप २९२०१४ मध्ये जिंकलेल्या जागाभाजप २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी ४, काँग्रेस २, स्वाभिमानी शेतकरी संघटना १.