शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

बांगलादेशींच्या घुसखोरीचा धक्कादायक पॅटर्न समोर; प. बंगालमध्ये अधिकृत आधार कार्ड मिळतात - विधानसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:16 IST

भाजपचे संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुंबई : जवळपास ९९ टक्के बांगलादेशी घुसखोर हे पश्चिम बंगालमध्ये कागदपत्रे तयार करून येतात. त्यासाठी दलाल सक्रिय आहेत असे सांगत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंगळवारी विधानसभेत धक्कादायक माहिती दिली. 

भाजपचे संजय उपाध्याय यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तरात कदम यांनी सांगितले की, परिस्थिती इतकी गंभीर आहे की, आधार कार्डदेखील अधिकृत तयार करून मिळतात. आधी कुटुंबातील एकजण येतो, मग नातेवाइकांना बोलावून घेतो. त्यामुळे घुसखोरी ही चिंतेची बाब असून, ती रोखण्यासाठी राज्य सरकार धोरणात्मक पावले उचलत आहे. 

बोरिवली; मुंबई येथे  पाच हजार बांधकाम कामगार हे बांगलादेशी आहेत. बोगस आधार कार्ड तयार करून हे भारताचे नागरिक होत आहेत. त्यांना रोखण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे, असा प्रश्न उपाध्याय यांनी केला.  त्यावर योगेश कदम म्हणाले, हा प्रश्न बोरिवलीपुरता नाही. ठाणे, रायगड, जालना येथील कारखान्यांमध्ये कारवाई करून बांगलादेशींना पकडले आहे. 

कागदपत्रे देतात एजंटआम्ही बांगलादेशींना अटक करतो. परंतु, न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतरच त्यांना हद्दपार करता येते. पश्चिम बंगालमधून ही घुसखोरी होते. काही एजंटच्या मदतीने ते कागदपत्रे तयार करतात. ९९ टक्के कागदपत्रे पश्चिम बंगालमध्ये तयार करून आणतात. महाराष्ट्रात त्यांना कागदपत्रे मिळत नाहीत. काही प्रकरणांत जन्म प्रमाणपत्रे ही महाराष्ट्रात काढल्याचे समोर आल्यानंतर नायब तहसीलदारांना निलंबित करण्यात आले, अशी माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाया गेल्या चार वर्षांतमहाराष्ट्राच्या इतिहासात बांगलादेशींवरील सर्वाधिक कारवाया मागील चार वर्षांत केलेल्या आहेत. २०२१ मध्ये १०९ बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले. २०२२ मध्ये ७७, २०२३ मध्ये १२७, २०२४ मध्ये २०२ जणांना हद्दपार आणि ७१६ जणांना अटक करण्यात आली. यावर्षी मार्चपर्यंत ६०० बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली. 

डिटेन्शन सेंटर उभारणारभाजपचे अतुल भातखळकर यांनी बांगलादेशी घुसखोरांचे कोम्बिंग ऑपरेशन करा, डिटेन्शन कॅम्पचे काय झाले, अशी विचारणा केली. भास्कर जाधव यांनी रत्नागिरी जिल्ह्यातही बांगलादेशी घुसखोर खोटे दाखले मिळवून राहतात, त्यांना चिपळूणमधून दाखले मिळालेत, हे निदर्शनास आणले. तर, सुधीर मुनगंटीवार यांनी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ निर्माण करून कागदपत्रांवर निर्णय व्हावे, अशी मागणी केली.

आ. अमित साटम यांनी घुसखोरीचा विषय संपविण्यासाठी केंद्राशी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा व्हावी, अशी विनंती करणार का, असा प्रश्न केला.

त्यावर, अटक केलेल्यांना ठेवण्यासाठी नवीन डिटेन्शन सेंटर निर्माण करू. केंद्राच्या गृह विभागाकडूनही माहिती येते, त्यानुसारही कारवाई केली जाते, असे कदम म्हणाले.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डwest bengalपश्चिम बंगालBangladeshबांगलादेश