शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेत एकवाक्यताच

By admin | Updated: July 15, 2017 01:18 IST

समृद्धी महामार्ग योजनेबाबत शिवसेना शेतकऱ्यांबरोबर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : समृद्धी महामार्ग योजनेबाबत शिवसेना शेतकऱ्यांबरोबर आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे परस्पर विरोधी वक्तव्य करत नसून शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने त्यांच्या जमिनी लाटल्या जाऊ नयेत ही पक्षाची भुमिका आहे; असे शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी सांगितले. कामकाजात भाजपा मंत्र्यांचे चांगले सहकार्य मिळत असते असे त्या म्हणाल्या.विधानपरिषदेच्या नियोजित अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षप्रमुख ठाकरे मार्ग होऊ देणार नाही म्हणत आहेत तर शिवसेनेचे मंत्री जमीनी अधिग्रहीत करण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित रहात आहेत याकडे लक्ष वेधले असता त्यांनी, शिवसेना शेतकऱ्यांबरोबर आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्यात येऊ नये इतकेच शिवसेनेचे म्हणणे आहे व मंत्री शिंदे यांचेही तेच मत आहे व यात परस्परविरोधी असे काहीच नाही असे त्या म्हणाल्या. राज्यातील पेट्रोल पंपांवर होणारी चोरी आपण सिद्ध केली आहे, त्यामुळे सरकारने याबाबतीत उपाययोजना कराव्यात अशी मागणीही अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय आय. टी. क्षेत्रातील महिलांची सुरक्षा, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीची बेशिस्त, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर याच्या कामकाजात सुधारणा, आळंदी, सिद्धबेट विकास आराखडट्याचा पाठपुरावा आदी विषयांवर अधिवेशनात विचारणा करणार असल्याचे डॉ. निलीम गोऱ्हे यांनी सांगितले.पुणे महापालिकेत पुर्णवेळ आरोग्य प्रमुख नाही. सहायक आरोग्यप्कमुखांच्याही काही जागा रिक्त आहेत. अशीच स्थिती राज्यातील अन्य महापालिकांमध्येही आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर याची चर्चा केली असून त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र याबाबत आपण विधानपरिषदेत प्रश्न विचारणार आहे. स्मार्ट सिटी योजनेत पुण्याची निवड झाली, मात्र काही लाखांपैकी फक्त काही हजार लोकांना प्रश्नावली देऊन त्यांच्या उत्तरांवर योजनेचा अजेंडा ठरवला जात आहे यावर गोऱ्हे यांनी टीका केली. लोकप्रतिनिधींना महत्व न देता सरकारी अधिकारीच निर्णय घेत आहेत याकडेही सरकारचे लक्ष वेधणार असल्याचे त्या म्हणाल्या.>मुंढे महत्वाकांक्षी तर आयुक्त मेहनतीपीएमपीएल चे व्यवस्थापकीय संचालक महत्वाकांक्षी आहेत, भविष्यात ते राजकारणात उतरले तर आश्चर्य वाटायला नको. महापालिका आयुक्त मेहनती आहेत, मात्र थेट पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क असल्याने लोकप्रतिनिधींना ते विचारत नाहीत. हे दोन्ही अधिकारी प्रमुख असणाऱ्या पीएमपीएल व महापालिका या व्यवस्थांविषयी आपण विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहोत असे आमदार डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.