शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
2
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
3
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
4
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
5
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
6
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
7
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
8
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
9
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!
10
Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
11
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
12
PF Withdrawal : ना फॉर्मची चिंता ना कुठे जाण्याचं टेन्शन; EPF खात्यातून UPI द्वारे काढू शकता पैसे, आली मोठी अपडेट
13
ओरिजनल काय आहे का? सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक नाराज
14
Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाची नाइट शिफ्ट; दिवसा ब्रेक; भांडुपमध्ये भिंत कोसळली
15
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
16
आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!
17
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
18
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
19
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
20
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?

शिवसेनेचे ठाणे

By admin | Updated: June 19, 2015 04:44 IST

१९ जून १९६६. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देणारी ही तारीख. प्रत्येक शिवसैनिकासाठी त्याच्या जन्मतारखेइतकीच महत्त्वाची असलेली ही तारीख.

- एकनाथ शिंदे

१९ जून १९६६. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देणारी ही तारीख.प्रत्येक शिवसैनिकासाठी त्याच्या जन्मतारखेइतकीच महत्त्वाची असलेली ही तारीख.नव्याने पेटून उठलेल्या मराठी अस्मितेच्या हुंकाराची द्वाही अवघ्या आसमंतात फिरवणारी ही तारीख. १०६ हुतात्म्यांचं रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईत, महाराष्ट्राच्या या राजधानीतच मराठी माणसाची होत असलेली गळचेपी पाहून दादरच्या एका व्यंगचित्रकार तरुणाचं रक्त सळसळलं, मन पेटून उठलं. मराठी माणसाची ही त्याच्याच घरात होणारी गळचेपी दूर करण्यासाठी काहीतरी करण्याच्या विचाराने तो झपाटून उठला आणि त्यातूनच जन्माला आला शिवसेना नावाचा झंझावात!!या झंझावातात भलेथोरले वृक्ष उन्मळून पडले, प्रस्थापित पाचोळ्यासारखे उडून गेले, महाराष्ट्रातल्या पारंपरिक राजकारणाची शैली बदलून गेली. नव्या, आक्रमक आणि मुख्य म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड राजकारणाची शैली शिवसेनेने आपल्या जन्मापासूनच रूढ केली.महाराष्ट्रातला तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे आकर्षित होण्याचं ते एक प्रमुख कारण होतं. जागच्या जागी मिळणारा न्याय! वस्तीत पाण्याचा नळ बसवणं असो, नोकरीच्या ठिकाणी डावललं जाणं असो किंवा शाळेची अ‍ॅडमिशन असो, दैनंदिन आयुष्यातील या समस्यांनी सामान्य मराठी माणूस मेटाकुटीला आला होता. तेव्हाचे सत्ताधीश स्वत:च्याच मस्तीत सामान्य जनतेला विसरून गेले होते. त्यामुळेच शिवसेनेच्या शाखाशाखांवर सामान्य जनता गर्दी करू लागली आणि इथे चुटकीसरशी समस्या सुटतात, हे लक्षात आल्यानंतर या गर्दीत भरच पडू लागली.शिवसेनेने नेहमीच तरुणांना विधायक कार्यक्रम दिला आहे. मराठी तरुणांमधील उद्यमशीलता वाढीस लागावी, असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुरुवातीपासून आग्रह होता. शिवसेनेने मराठी तरुणांना केवळ वडापाव दिला, असं म्हणून हिणवणारे बरेच आहेत. पण वडापाव हे केवळ प्रतीक आहे. मराठी तरुणांनी नोकरीची बंधनं झुगारून उद्योगांमध्ये उतरावं, त्यासाठी वाट्टेल तितकी मेहनत करावी, हे त्यामागील खरं मर्म होतं. त्याचवेळी प्रत्येकाला उद्योग करणं शक्य नाही, हे जाणून चाकरमान्यांचे हित जपण्यासाठी, त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आणि मुंबई आणि महाराष्ट्रातल्या नोकरीत स्थानिक मराठी जनतेला हक्काचे स्थान मिळालेच पाहिजे, यासाठी ‘स्थानीय लोकाधिकार समिती’च्या माध्यमातून शिवसेनेनं इथल्या मराठी जनतेला न्याय मिळवून दिला.‘स्थानीय लोकाधिकार समिती’ असो वा सध्या कामगारांच्या प्रश्नांसाठी झुंजणारी ‘भारतीय कामगार सेना’, शिवसेनेनं नेहमीच सामान्य मराठी माणसाच्या हितासाठी कडवट भूमिका घेतली आहे.‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून दिलेला मंत्र आजही शिवसैनिक प्राणपणाने जपतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हाच वारसा पुढे चालू ठेवला आहे. हाच मंत्र घेऊन शिवसेना वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात पसरली. त्यातला ‘ठाणे’ हा शिवसेनेच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा. शिवसेनेला सत्तेचा पहिला मान ठाण्यानेच दिला.

(लेखक सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा. उ.) आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत)