शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

विधान परिषद निवडणूक , ५३१ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेनेची जुळवाजुळव

By admin | Updated: May 27, 2016 19:12 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आता रंगतदार स्थितीत आला आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. २७-  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना आता रंगतदार स्थितीत आला आहे. बविआची एकगठ्ठा मते राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार असल्याने एकेका मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांची जुळवाजुळव करून ५३१ ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी आता शिवसेनेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे सध्या स्वत:चे असे सुमारे २९४ मतांचे मताधिक्य असून उर्वरित जमवाजमव करून ४३९ पर्यंतची मजल त्यांनी मारली आहे.

येत्या तीन ते चार दिवसांत ५३१ ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी आता सर्वच मंडळी कामाला लागली आहे. या निवडणुकीत विद्यमान उपसभापती राष्ट्रवादीचे वसंत डावखरे विरुद्ध शिवसेनेचे रवींद्र फाटक असा सामना दुसऱ्यांदा रंगणार आहे. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत फाटकांचा ४६ मतांनी पराभव झाला होता. परंतु, सध्याची स्थिती पाहता शिवसेना-भाजपाचे पारडे जड असले तरी कोणताही दगाफटका सहन करण्याची मानसिकता त्यांच्यात नसल्याने एकेका मतासाठी शिवसेनेची सर्वच मंडळी फिल्डिंग लावून आहे. ठाण्यातील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याच्या कार्यालयात सध्या आकड्यांची जुळवाजुळव सुरू असून आपल्या पक्षातील, मित्रपक्षातील आणि इतर पक्षांतील नेमके किती नगरसेवक आपल्या बाजूने ठामपणे उभे राहणार आहेत, याची बेरीज-वजाबाकी रोजच्या रोज सुरू आहे.

या निवडणुकीत एकूण १०२६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये सध्या शिवसेनेचा वरचष्मा असला तरीदेखील बविआची सुमारे ११९ मते ही थेट राष्ट्रवादीच्या पारड्यात जाणार असल्याने शिवसेनेपुढील अडचणीत थोडी भर पडली आहे. सध्याचे संख्याबळ पाहता शिवसेनेकडे मित्रपक्ष भाजपा धरून ४९१ चे मताधिक्य असले तरीदेखील त्यातील आतापर्यंत २९४ च्या आसपास मतांची ठामपणे जुळवाजुळव करण्यात शिवसेनेच्या मंडळींना यश आले आहे. उर्वरित मिळून ४३९ मतांची मजल मारली असल्याची माहिती शिवसेनेच्या खास सूत्रांनी दिली. परंतु अद्यापही मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेनेला ९२ मतांची गरज भासणार आहे. त्यांची जुळवाजुळव झाल्याचा दावा जरी ते करीत असले, तरीदेखील ही मते आपल्या झोळीत पाडून घेण्यासाठी शिवसेनेच्या नेतेमंडळींचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. प्रचारासाठी मुख्यमंत्री ठाण्यात शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपानेही मित्रधर्म गांभीर्याने पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हाच संदेश जिल्ह्यातील सर्व भाजपाच्या नगरसेवकांपर्यंत जाण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात येणार आहेत. २८ मे रोजी दुपारी ४ वाजता ते ठाण्यात येणार असून मेळावा घेणार आहेत. वागळे इस्टेट येथील एखाद्या सभागृहात तो होणार असल्याचे मानले जात आहे.