शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

शिवसेनेचे ढोल बजाओ आंदोलन

By admin | Updated: July 11, 2017 03:40 IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीचा लाभ प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना झाला

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीचा लाभ प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना झाला याची माहिती मिळावी, या मागणीकरिता शिवसेनेच्या वतीने रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके(आरडीसीसी) समोर सोमवारी ढोल बजाओ आंदोलन केले.शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, जिल्हाप्रमुख रवी मुंडे, सह संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, बबन पाटील, अलिबाग शिवसेना प्रमुख दीपक रानवडे यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांची या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्या वेळी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती त्यांनी शिष्टमंडळास दिली. राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीकरिता आणलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अनुषंगाने माहिती देताना नाईक म्हणाले, २०१५-१६ मधील खरीप हंगामात १९ हजार ३५० सभासदांना रक्कम ६७३३.७० लाख रुपये, रब्बी हंगामात ३ हजार ४२० सभासदांना १२३४.३६ लाख कर्जवाटप झाले. त्यापैकी ३०जून २०१६ पर्यंत खरीप व रब्बी हंगामातील १७ हजार ९२१ सभासदांची ७३६९.५४० लाख रु. रक्कम वसूल झाली. याचाच अर्थ ३० जून २०१६ अखेर १ हजार ४२९ सभासदांकडून ५९८.५२ लाख इतकी रक्कम येणे बाकी होती. बँकेची ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून आजपर्यंत जाहीर केलेल्या योजनेच्या परिपत्रकानुसार आहे. सहकार खात्याकडून याचे लेखापरीक्षण झाले नसल्याने या माहितीमध्ये लेखापरीक्षणानंतर बदल होवू शकतो. तसेच शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष सरकारकडे या कर्जमाफीसंदर्भात अनेक नवीन मागण्या करत असल्याने तसेच सरकारतर्फे योजनेमध्ये सुध्दा बदल केला जात असल्याने या माहितीमध्ये बदल होवू शकतो, असे नाईक यांनी सांगितले.