शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

"शहाजीबापू नौटंकी करणारा माणूस, गद्दारी करून शहाणपणा शिकवणं योग्य नाही"; शिवसेनेचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:16 IST

Shivsena Vinayak Raut Slams Shahajibapu Patil : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेगट यांच्या धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईवरुन कायदेशीर सामना सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार याची चर्चा होत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी धाव घेतली आहे. याबाबत, स्वत: एकनाथ शिंदेंनीही जाहीर सभेत सांगितलं होतं. आता, शिंदे गटातील आमदार आणि काय झाडी... काय डोंगार... काय हाटील डायलॉगफेम शहाजीबापू पाटील यांनी धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडेच राहणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांची कॉपी करू नये, बाळासाहेबांनाच ती ठाकरी भाषा शोभत होती, उद्धव आणि आदित्य ठाकरेंना ती भाषा शोभत नाही, असंही पाटील म्हणाले. यावरून आता शिवसेनेने टीकास्त्र सोडलं आहे. 

"शहाजीबापू नौटंकी करणारा माणूस, गद्दारी करून शहाणपणा शिकवणं योग्य नाही" असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Shivsena Vinayak Raut) यांनी शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "शहाजीबापू नौटंकी करणारा माणूस. एकदा आपटी खाल्ली, पुन्हा शिवसेनेने आधार दिला म्हणून आमदार झाले. आता नशिबातली ही शेवटची आमदारकी आहे. पांडुरंगाच्या पंढरीमध्ये राहून सुद्धा संत तुकारामही त्यांना कळले नाही. शहाजीबापूंनी गद्दारी करून शहाणपणा शिकवणं योग्य नाही" असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

शहाजीबापू पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आता आमचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. त्यामुळे, यापुढील निवडणुकांवर आमच्याकडून उद्धव ठाकरेंचा फोटो बॅनरवर लावला जाणार नाही, एकनाथ शिंदेंचा लावला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच, आदित्य ठाकरेंच्या सुरू असलेल्या सभा आणि त्यांच्या भाषणावर बोलतानाही त्यांनी आदित्य यांच्यावर टीका केली. आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांची कॉपी करू नये, बाळासाहेबांनाच ती ठाकरी भाषा शोभत होती, उद्धव आणि आदित्य ठाकरेंना ती भाषा शोभत नाही, असेही पाटील यांनी म्हटले. 

संजय राऊत दोषी असतील म्हणून त्यांना अटक झाली असावी. ईडीचा कुठलाही दोष नाही. त्यांना अटक केली त्यांचा आर्थिक व्यवहार पुढे येतील. आज महाराष्ट्र किरकिऱ्या कारट्याकडून शांत झाला असेल. उद्धव ठाकरेंनी हा आवाज बंद केला नाही तो ईडीने केला. ७-८ वर्ष त्यांचे दर्शन होत नाही आता निवांत राहा. शांत राहा अशा शब्दात शहाजीबापू पाटलांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Shiv Senaशिवसेना