शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शिवसेनेने फोडले निवडणूक यंत्रणेवर खापर, भाजपाला केले टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:07 IST

पालघर पोटनिवडणुकीत साडेआठ लाख मतदारांपैकी सहा लाख मतदारांनी भाजपाला नाकारले.

मुंबई : पालघर पोटनिवडणुकीत साडेआठ लाख मतदारांपैकी सहा लाख मतदारांनी भाजपाला नाकारले. मतदान यंत्रांमधील गडबडींमुळे भाजपाला विजय मिळाला, या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट तर केले पण शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले.निकालानंतर आयोजित पत्रपरिषदेत ठाकरे यांनी पालघरच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची नि:पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, भाजपा उमेदवार राजेंद्र गावित यांनी मागणी करताच मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांनी मतदानाची अंतिम आकडेवारी त्यांच्या सहीने जारी केल्यानंतर लाखभर मतदान कसे वाढले याची चौकशी झाली पाहिजे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. मी आज जे मुद्दे मांडत आहे ते अधिक गंभीर आहेत आणि ते जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे सांगत त्यांनी विषयाला बगल दिली.निवडणूक अधिकारी सरकारचे बाहुले बनून काम करणार असतील तर क्रिकेटमध्ये अंपायर जसे बाहेरून बोलावतात तसे निवडणूक निरीक्षकही बाहेरून बोलावण्याची वेळ आली आहे. मतदानादरम्यानचे घोळ असेच वाढले तर लोकांचा लोकशाहीवर विश्वासच राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले. लोकशाहीची थोडी बूज असेल तर निवडणूक आयोग पालघरमधील निवडणूक प्रक्रियेची चौकशी करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.शिवसेनेने पालघरमधील जागा निसटत्या मतांनी गमावली. चार-पाच तगडे उमेदवार असल्याने भाजपाचे जमले. खरेतर, हा भाजपाचा विजयच नाही, असे सांगून ठाकरे म्हणाले, अलीकडे भाजपा ज्या पद्धतीने वागत आणि बोलत आहे त्यावरून त्यांना मित्रपक्षांची गरज राहिलेली दिसत नाही.पालघरमध्ये वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी आम्ही लढलो. निवडणुकीच्या काळात पालघरवासीयांना जी आश्वासने शिवसेनेने दिली ती पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध राहू, असेही ते म्हणाले.