शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शिवसेनेने फोडले निवडणूक यंत्रणेवर खापर, भाजपाला केले टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:07 IST

पालघर पोटनिवडणुकीत साडेआठ लाख मतदारांपैकी सहा लाख मतदारांनी भाजपाला नाकारले.

मुंबई : पालघर पोटनिवडणुकीत साडेआठ लाख मतदारांपैकी सहा लाख मतदारांनी भाजपाला नाकारले. मतदान यंत्रांमधील गडबडींमुळे भाजपाला विजय मिळाला, या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट तर केले पण शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले.निकालानंतर आयोजित पत्रपरिषदेत ठाकरे यांनी पालघरच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची नि:पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, भाजपा उमेदवार राजेंद्र गावित यांनी मागणी करताच मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांनी मतदानाची अंतिम आकडेवारी त्यांच्या सहीने जारी केल्यानंतर लाखभर मतदान कसे वाढले याची चौकशी झाली पाहिजे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. मी आज जे मुद्दे मांडत आहे ते अधिक गंभीर आहेत आणि ते जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे सांगत त्यांनी विषयाला बगल दिली.निवडणूक अधिकारी सरकारचे बाहुले बनून काम करणार असतील तर क्रिकेटमध्ये अंपायर जसे बाहेरून बोलावतात तसे निवडणूक निरीक्षकही बाहेरून बोलावण्याची वेळ आली आहे. मतदानादरम्यानचे घोळ असेच वाढले तर लोकांचा लोकशाहीवर विश्वासच राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले. लोकशाहीची थोडी बूज असेल तर निवडणूक आयोग पालघरमधील निवडणूक प्रक्रियेची चौकशी करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.शिवसेनेने पालघरमधील जागा निसटत्या मतांनी गमावली. चार-पाच तगडे उमेदवार असल्याने भाजपाचे जमले. खरेतर, हा भाजपाचा विजयच नाही, असे सांगून ठाकरे म्हणाले, अलीकडे भाजपा ज्या पद्धतीने वागत आणि बोलत आहे त्यावरून त्यांना मित्रपक्षांची गरज राहिलेली दिसत नाही.पालघरमध्ये वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी आम्ही लढलो. निवडणुकीच्या काळात पालघरवासीयांना जी आश्वासने शिवसेनेने दिली ती पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध राहू, असेही ते म्हणाले.