शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

Sanjay Shirsat : "काहीच माहीत नव्हतं, अंगावरच्या कपड्यानीशी गेलो अन्..."; संजय शिरसाटांनी सांगितला 'तो' किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 10:50 IST

Shivsena Sanjay Shirsat : राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं नवीन सरकार स्थापन करण्याआधी बंडखोर आमदार हे सूरतला गेले होते. त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत आता आमदार खुलासा करत आहेत.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं नवीन सरकार स्थापन करण्याआधी बंडखोर आमदार हे सूरतला गेले होते. त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत आता आमदार खुलासा करत आहेत. शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Shivsena Sanjay Shirsat) यांनी सूरतला गेलो होतो तेव्हा आमच्यातील अनेकांकडे सामान किंवा कपडे देखील नव्हते असं म्हटलं आहे. इतकंच काय तर आपण नेमकं कुठे चाललो आहोत याची देखील कल्पनाही नव्हती असंही सांगितलं आहे. 

"एकनाथ शिंदे हे आम्हाला चला म्हटले म्हणून आम्ही निघालो. आमच्याकडे गरजेपुरते कपडेही नव्हते. अंगावरच्या कपड्यानीशी आम्ही आलो होतो. जेव्हा आम्ही एकनाथ शिंदेंना याबाबत सांगितलं तेव्हा अक्षरश: हॉटेलमध्येच कपड्याचं दुकान सुरू करण्यात आलं. त्यानंतर आम्हाला नवीन कपडे मिळाले" अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. आमदारांनी एकनाथ शिंदेंना आपल्या अडचणी सांगितल्या आणि सर्व काही सुरळीत झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. माध्यमांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"कपड्यांबद्दल सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कपड्यांनी भरलेल्या गाड्याच हॉटेलमध्ये आल्या. जणू काही हॉटेलमध्ये कपड्याचं दुकानच सुरू केलं होतं. यानंतर प्रत्येकाने आपल्या आवडीने कपडे घेतले. फक्त कपडेच नाही तर बूट आणि इतर गरजेचं सामानही उपलब्ध करुन देण्यात आलं" असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. शिरसाट हे औरंगाबाद विमानतळावर येताच त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मतदारसंघात कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. भरपावसात आमचे कार्यकर्ते आम्हाला नेण्यासाठी, स्वागतासाठी आल्याचे सांगत त्यांनी आम्ही आजही शिवसैनिकच असल्याचं म्हटलं. 

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील हा उठाव शिवसेना वाचविण्यासाठी होता, आम्हीच त्यांना हा बंड करायला लावलं, असेही ते म्हणाले. यावेळी, त्यांनी पक्षनेतृत्त्वार आणि त्यांच्याजवळील काही लोकांचा चांडाळ चौकटी म्हणत चांगलाच समाचार घेतला. तर, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही निशाणा साधला. माझ्या पालकमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात मला एक फोन नाही केला. माझ्या मतदारसंघात सोडा, पण माझ्या घराच्या बाजुला पालकमंत्री येतात आणि मला माहितीही होत नाही. माझ्या मतदारसंघासाठी 1 कोटीचा निधी आणि शेजारी गंगापूर मतदारसंघात 11 कोटींचा निधी मिळतो, हे कसं, असा सवालही संजय शिरसाट यांनी औरंगाबादेत असताना उपस्थित केला. तसेच, हे मी तोंडी बोलत नसून रेकॉर्डवर आहे सगळं, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना