शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

Sanjay Shirsat : "काहीच माहीत नव्हतं, अंगावरच्या कपड्यानीशी गेलो अन्..."; संजय शिरसाटांनी सांगितला 'तो' किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2022 10:50 IST

Shivsena Sanjay Shirsat : राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं नवीन सरकार स्थापन करण्याआधी बंडखोर आमदार हे सूरतला गेले होते. त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत आता आमदार खुलासा करत आहेत.

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं नवीन सरकार स्थापन करण्याआधी बंडखोर आमदार हे सूरतला गेले होते. त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत आता आमदार खुलासा करत आहेत. शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (Shivsena Sanjay Shirsat) यांनी सूरतला गेलो होतो तेव्हा आमच्यातील अनेकांकडे सामान किंवा कपडे देखील नव्हते असं म्हटलं आहे. इतकंच काय तर आपण नेमकं कुठे चाललो आहोत याची देखील कल्पनाही नव्हती असंही सांगितलं आहे. 

"एकनाथ शिंदे हे आम्हाला चला म्हटले म्हणून आम्ही निघालो. आमच्याकडे गरजेपुरते कपडेही नव्हते. अंगावरच्या कपड्यानीशी आम्ही आलो होतो. जेव्हा आम्ही एकनाथ शिंदेंना याबाबत सांगितलं तेव्हा अक्षरश: हॉटेलमध्येच कपड्याचं दुकान सुरू करण्यात आलं. त्यानंतर आम्हाला नवीन कपडे मिळाले" अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. आमदारांनी एकनाथ शिंदेंना आपल्या अडचणी सांगितल्या आणि सर्व काही सुरळीत झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. माध्यमांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

"कपड्यांबद्दल सांगितल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कपड्यांनी भरलेल्या गाड्याच हॉटेलमध्ये आल्या. जणू काही हॉटेलमध्ये कपड्याचं दुकानच सुरू केलं होतं. यानंतर प्रत्येकाने आपल्या आवडीने कपडे घेतले. फक्त कपडेच नाही तर बूट आणि इतर गरजेचं सामानही उपलब्ध करुन देण्यात आलं" असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. शिरसाट हे औरंगाबाद विमानतळावर येताच त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. मतदारसंघात कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. भरपावसात आमचे कार्यकर्ते आम्हाला नेण्यासाठी, स्वागतासाठी आल्याचे सांगत त्यांनी आम्ही आजही शिवसैनिकच असल्याचं म्हटलं. 

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील हा उठाव शिवसेना वाचविण्यासाठी होता, आम्हीच त्यांना हा बंड करायला लावलं, असेही ते म्हणाले. यावेळी, त्यांनी पक्षनेतृत्त्वार आणि त्यांच्याजवळील काही लोकांचा चांडाळ चौकटी म्हणत चांगलाच समाचार घेतला. तर, औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावरही निशाणा साधला. माझ्या पालकमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात मला एक फोन नाही केला. माझ्या मतदारसंघात सोडा, पण माझ्या घराच्या बाजुला पालकमंत्री येतात आणि मला माहितीही होत नाही. माझ्या मतदारसंघासाठी 1 कोटीचा निधी आणि शेजारी गंगापूर मतदारसंघात 11 कोटींचा निधी मिळतो, हे कसं, असा सवालही संजय शिरसाट यांनी औरंगाबादेत असताना उपस्थित केला. तसेच, हे मी तोंडी बोलत नसून रेकॉर्डवर आहे सगळं, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना