शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

शिवसेनेने धुडकावला युतीचा प्रस्ताव, भाजपाचाही घेतला समाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 06:28 IST

बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे युतीबाबत सकारात्मक संकेत देणाऱ्या भाजपा नेत्यांना शिवसेनेने चांगलेच फटकारले आहे. ‘शिवसेनेचा वाघ हा पिंज-यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून भाजपाचा समाचार घेतला आहे.

मुंबई : बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे युतीबाबत सकारात्मक संकेत देणाऱ्या भाजपा नेत्यांना शिवसेनेने चांगलेच फटकारले आहे. ‘शिवसेनेचा वाघ हा पिंज-यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून भाजपाचा समाचार घेतला आहे.भाजपाचे बिनपंखाचे विमान अजून उडतेच आहे. २०१९ चे चित्र पूर्ण वेगळे असेल, पण भाजपा अजूनही २०१४ च्या सुवर्णकाळात रमून बसला आहे, असे सांगतानाच भाजपाला मित्रांची गरज नाही. ते मजबूत व स्वयंभू आहेत, असा चिमटाही या मुखपत्रातून काढला आहे. शिवसेनेने सोबत असावे असे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उडत उडत सांगितले आहे. हा सद्विचार त्यांना २०१४ साली सुचला नाही व सत्ता मिळाल्यावरही ते विनय हरवून बसले. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले तर त्यासाठी जमीन नाही. सुवर्णकाळातील सुवर्ण कौले फुलपूर-गोरखपूरमधून उडून गेल्यावर काही गोष्टी सुचू लागल्या. भाजपाने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोमणाही ठाकरे यांनी भाजपाला मारला. मुंबईतील मेळाव्यात अमित शहांनी म्हटले होते की, भाजपाचे विरोधक हे साप, मुंगूस, कुत्री, मांजरी आहेत. एकमेकांशी वैर असलेले हे प्राणी मोदी महापुरात निभाव लागणार नाही म्हणून एकत्र आले. ‘यूपीए’ सरकारच्या काळातही यातले काही साप, कुत्री, मांजरी काँग्रेसबरोबर होते व मोदी लाट दिसताच यापैकी काही प्राणी भाजपाच्या तंबूत शिरले. त्यापैकी एक तेलगू देसम नुकताच बाहेर पडला आहे, अशी आठवणही अग्रलेखातून करून देण्यात आली आहे.>सत्ताधाºयांचा श्रीमंती थाटभाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईतील महामेळाव्यावरील खर्चावरही ‘सामना’तून टीका करण्यात आली. भाजपाच्या सुवर्णकाळासाठी कामाला लागा, असे आवाहन त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. अध्यक्ष महोदयांनी विचारांचे भस्म उधळले आहे. सत्ताधाºयांना साजेशा श्रीमंती थाटात भाजपाचा स्थापना दिवस झाला. राज्यात व केंद्रात सरकारे असल्याने हे होणारच, असे सांगतानाच यापूर्वी काँग्रेसची मुंबईतील अधिवेशनेही याच थाटात व्हायची, असेही या अग्रलेखातून भाजपाला सुनावण्यात आले.