शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
4
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
5
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
6
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
7
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
8
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
9
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
10
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
11
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
12
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
13
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
14
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
15
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
16
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
17
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
18
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
19
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
20
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने धुडकावला युतीचा प्रस्ताव, भाजपाचाही घेतला समाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 06:28 IST

बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे युतीबाबत सकारात्मक संकेत देणाऱ्या भाजपा नेत्यांना शिवसेनेने चांगलेच फटकारले आहे. ‘शिवसेनेचा वाघ हा पिंज-यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून भाजपाचा समाचार घेतला आहे.

मुंबई : बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे युतीबाबत सकारात्मक संकेत देणाऱ्या भाजपा नेत्यांना शिवसेनेने चांगलेच फटकारले आहे. ‘शिवसेनेचा वाघ हा पिंज-यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून भाजपाचा समाचार घेतला आहे.भाजपाचे बिनपंखाचे विमान अजून उडतेच आहे. २०१९ चे चित्र पूर्ण वेगळे असेल, पण भाजपा अजूनही २०१४ च्या सुवर्णकाळात रमून बसला आहे, असे सांगतानाच भाजपाला मित्रांची गरज नाही. ते मजबूत व स्वयंभू आहेत, असा चिमटाही या मुखपत्रातून काढला आहे. शिवसेनेने सोबत असावे असे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उडत उडत सांगितले आहे. हा सद्विचार त्यांना २०१४ साली सुचला नाही व सत्ता मिळाल्यावरही ते विनय हरवून बसले. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले तर त्यासाठी जमीन नाही. सुवर्णकाळातील सुवर्ण कौले फुलपूर-गोरखपूरमधून उडून गेल्यावर काही गोष्टी सुचू लागल्या. भाजपाने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोमणाही ठाकरे यांनी भाजपाला मारला. मुंबईतील मेळाव्यात अमित शहांनी म्हटले होते की, भाजपाचे विरोधक हे साप, मुंगूस, कुत्री, मांजरी आहेत. एकमेकांशी वैर असलेले हे प्राणी मोदी महापुरात निभाव लागणार नाही म्हणून एकत्र आले. ‘यूपीए’ सरकारच्या काळातही यातले काही साप, कुत्री, मांजरी काँग्रेसबरोबर होते व मोदी लाट दिसताच यापैकी काही प्राणी भाजपाच्या तंबूत शिरले. त्यापैकी एक तेलगू देसम नुकताच बाहेर पडला आहे, अशी आठवणही अग्रलेखातून करून देण्यात आली आहे.>सत्ताधाºयांचा श्रीमंती थाटभाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईतील महामेळाव्यावरील खर्चावरही ‘सामना’तून टीका करण्यात आली. भाजपाच्या सुवर्णकाळासाठी कामाला लागा, असे आवाहन त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. अध्यक्ष महोदयांनी विचारांचे भस्म उधळले आहे. सत्ताधाºयांना साजेशा श्रीमंती थाटात भाजपाचा स्थापना दिवस झाला. राज्यात व केंद्रात सरकारे असल्याने हे होणारच, असे सांगतानाच यापूर्वी काँग्रेसची मुंबईतील अधिवेशनेही याच थाटात व्हायची, असेही या अग्रलेखातून भाजपाला सुनावण्यात आले.