शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शिवसेनेने धुडकावला युतीचा प्रस्ताव, भाजपाचाही घेतला समाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 06:28 IST

बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे युतीबाबत सकारात्मक संकेत देणाऱ्या भाजपा नेत्यांना शिवसेनेने चांगलेच फटकारले आहे. ‘शिवसेनेचा वाघ हा पिंज-यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून भाजपाचा समाचार घेतला आहे.

मुंबई : बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे युतीबाबत सकारात्मक संकेत देणाऱ्या भाजपा नेत्यांना शिवसेनेने चांगलेच फटकारले आहे. ‘शिवसेनेचा वाघ हा पिंज-यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून भाजपाचा समाचार घेतला आहे.भाजपाचे बिनपंखाचे विमान अजून उडतेच आहे. २०१९ चे चित्र पूर्ण वेगळे असेल, पण भाजपा अजूनही २०१४ च्या सुवर्णकाळात रमून बसला आहे, असे सांगतानाच भाजपाला मित्रांची गरज नाही. ते मजबूत व स्वयंभू आहेत, असा चिमटाही या मुखपत्रातून काढला आहे. शिवसेनेने सोबत असावे असे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उडत उडत सांगितले आहे. हा सद्विचार त्यांना २०१४ साली सुचला नाही व सत्ता मिळाल्यावरही ते विनय हरवून बसले. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले तर त्यासाठी जमीन नाही. सुवर्णकाळातील सुवर्ण कौले फुलपूर-गोरखपूरमधून उडून गेल्यावर काही गोष्टी सुचू लागल्या. भाजपाने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोमणाही ठाकरे यांनी भाजपाला मारला. मुंबईतील मेळाव्यात अमित शहांनी म्हटले होते की, भाजपाचे विरोधक हे साप, मुंगूस, कुत्री, मांजरी आहेत. एकमेकांशी वैर असलेले हे प्राणी मोदी महापुरात निभाव लागणार नाही म्हणून एकत्र आले. ‘यूपीए’ सरकारच्या काळातही यातले काही साप, कुत्री, मांजरी काँग्रेसबरोबर होते व मोदी लाट दिसताच यापैकी काही प्राणी भाजपाच्या तंबूत शिरले. त्यापैकी एक तेलगू देसम नुकताच बाहेर पडला आहे, अशी आठवणही अग्रलेखातून करून देण्यात आली आहे.>सत्ताधाºयांचा श्रीमंती थाटभाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईतील महामेळाव्यावरील खर्चावरही ‘सामना’तून टीका करण्यात आली. भाजपाच्या सुवर्णकाळासाठी कामाला लागा, असे आवाहन त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. अध्यक्ष महोदयांनी विचारांचे भस्म उधळले आहे. सत्ताधाºयांना साजेशा श्रीमंती थाटात भाजपाचा स्थापना दिवस झाला. राज्यात व केंद्रात सरकारे असल्याने हे होणारच, असे सांगतानाच यापूर्वी काँग्रेसची मुंबईतील अधिवेशनेही याच थाटात व्हायची, असेही या अग्रलेखातून भाजपाला सुनावण्यात आले.