शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट बहुमतासाठी कसरत

By admin | Updated: February 19, 2017 03:15 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुरुंगात अडकल्याने, यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वबळावर सोडाच, काँग्रेस व घटक पक्षांना जोडीने घेऊनही सत्ता राखणे राष्ट्रवादी काँग्रेसला अवघड होणार आहे.

- गणेश धुरी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुरुंगात अडकल्याने, यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्वबळावर सोडाच, काँग्रेस व घटक पक्षांना जोडीने घेऊनही सत्ता राखणे राष्ट्रवादी काँग्रेसला अवघड होणार आहे. जी परिस्थिती राष्ट्रवादीची तीच जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी आसुसलेल्या शिवसेनेचीही आहे. शिवसेनेला स्वबळावर बहुमत गाठण्यासाठी प्रसंगी काँग्रेस-राष्ट्रवादीलाच सोबत घ्यावे लागण्याची चिन्हे आहेत. कारण भाजपासोबत मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत संबंध ताणले गेल्याने, हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापण्याची सुतराम शक्यता नाही.जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या अनुषंगाने शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात सभा झाल्या. यापूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या जाहीरसभा झाल्या आहेत. ‘मिशन-४१ प्लस’चा नारा दिलेल्या भाजपानेही ग्रामीण भागात सर्व गट-गणात उमेदवार देण्याची काळजी घेतली आहे. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या ग्रामीण भागात चौकसभा झाल्या आहेत. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनीही पूर्व भागात सभांचा धडाका लावला आहे. कॉँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा अपवाद वगळता अद्याप मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. पुरेसे उमेदवार उभे करण्यातही काँग्रेसला यश आलेले नाही. मागील वेळी सर्वाधिक संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला यंदा आहे. ते संख्याबळ टिकविता येणे, जसे अवघड आहे, तशीच स्थिती काँग्रेसची आहे. मागील वेळी दोन आकडी संख्या गाठलेल्या काँग्रेसला यंदा तेवढ्याही जागा मिळविणे दुरापास्त दिसत आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसने आपल्या सत्ता काळात कोणतेही प्रभावशाली कार्य केल्याचे दिसून येऊ शकले नाही. उलट विविध घोटाळ््यांच्या चर्चांमुळेच जिल्हा परिषद गाजली. त्यामुळे अनेक इच्छुकांनी काँग्रेस व राष्ट्रवादीऐवजी शिवसेना, भाजपाची तिकिटे मिळवून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. शिवाय गेल्या तीन पंचवार्षिकपासून राष्ट्रवादी काँग्रेसने ज्यांच्या खांद्यावर नाशिकची जबाबदारी टाकली आणि ज्यांनी ती सांभाळून सत्ताही आणली, ते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ वर्षभरापासून तुरुंगात असल्याने राष्ट्रवादी सैरभैर झाली आहे.नाही म्हणायला शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे या पवार कुटुंबीयांनी राष्ट्रवादीची नौका सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने, यंदा राष्ट्रवादीला दीड दशकापासून असलेली सत्ता टिकविणे अवघड बनले आहे. अशा स्थितीत स्पष्ट बहुमताने त्यांची जागा पटकाविणे अन्य पक्षांसाठीही बरेचसे अवघडच आहे.‘मिशन- ४१+’ अवघडभाजपाने या निवडणुकीसाठी ‘मिशन- ४१ प्लस’चा नारा दिला आहे. त्यासाठी विष्णू सावरा व जयकुमार रावल या दोन मंत्र्यांसह खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. मागील निवडणुकीत अवघे चार सदस्य निवडून आलेल्या भाजपासाठी हे ‘मिशन-४१ प्लस’ अशक्य आहे.