शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

भाजपाच्या यशामुळे शिवसेना झाकोळली

By admin | Updated: February 24, 2017 07:17 IST

मुंबईतच पक्षाच्या स्थापनेच्या मेळाव्यात बोलताना ‘सूरज निकलेगा... कमल खिलेगा’ असे उद्गार माजी पंतप्रधान

गौरीशंकर घाळे / मुंबईमुंबईतच पक्षाच्या स्थापनेच्या मेळाव्यात बोलताना ‘सूरज निकलेगा... कमल खिलेगा’ असे उद्गार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काढले होते. मुंबई महापालिका निवडणुकीत ८२ जागा मिळवीत भाजपाने गुरुवारी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयाची नोंद करत ते खरे केले. शिवसेनेच्या तोडीस तोड जागा मिळवीत आपण धाकटे नाही तर महापालिकेच्या राजकारणात आपण आता बरोबरीचे असल्याचे भाजपाने गुरुवारी सिद्ध केले.युतीच्या राजकारणात भाजपाच्या वाट्याला कायमच धाकट्या भावाची भूमिका आली. लोकसभा, विधानसभेच्या निकालानंतर आता महापालिकेच्या निकालांनी ते पूर्णपणे पुसले गेल्याची भावना भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवसेनेने युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर भाजपाने स्वबळावर मुंबईत सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला. एकीकडे पारदर्शक कारभार आणि मुंबईच्या विकासाचे आश्वासन द्यायचे तर दुसरीकडे महापालिकेच्या आजपर्यंतच्या गैरकारभाराचे खापर सर्वस्वी शिवसेनेवर फोडायचे, अशी दुहेरी रणनीती भाजपाने वापरली. त्याचा अपेक्षित परिणाम झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. मुंबईतील भाजपा नेत्यांनी वर्षभरापासूनच नालेसफाई, खड्डे या विषयांवरून शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरुवात केली. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या ‘अरे ला कारे’ करत आपली भूमिका चोख पार पाडली. भाजपाचा पारंपरिक मतदार मानला जाणारा गुजराती, उत्तर भारतीय समाजावरील पकड कायम करतानाच मराठी मतदार लांब जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली गेली. केवळ आम्हीच पारदर्शक कारभारातून मुंबईचा विकास साधू शकतो, हे पटवून देण्यात भाजपा यशस्वी झाली. परिणामी २० वर्षांतील धाकलेपण पुसले गेले.‘आम्हीच मुंबईत नंबर वन’ निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे तर आशिष शेलार यांनी थेट ‘आम्हीच मुंबईत नंबर वन’ असल्याचे म्हटले आहे. ८२ जागा घेत भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी १९९२ नंतर प्रथमच शिवसेना वगळता अन्य कोणत्या पक्षाने इतक्या मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या आहेत? त्यामुळे मुंबई म्हणजे फक्त शिवसेना हे २५ वर्षांचे समीकरण भाजपाच्या यशाने मागे पडल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या भावनिक राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देणारा, सोयीसुविधांची अपेक्षा करणारा मराठी मतदारही भाजपाकडे वळल्याचे चित्र आहे.