शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

समृद्धी महामार्गाबाबत शिवसेना संभ्रमात!

By admin | Published: June 27, 2017 1:34 AM

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाबाबत शिवसेना संभ्रमावस्थेत आहे. कधी विरोध तर कधी समर्थन अशी धरसोड भूमिका दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाबाबत शिवसेना संभ्रमावस्थेत आहे. कधी विरोध तर कधी समर्थन अशी धरसोड भूमिका दिसून येत आहे. पाहणी, चर्चा आणि नंतर निर्णय अशा मार्गाने सेना या विषयाला हाताळत असून, महामार्गाला शेतकऱ्यांचा थेट विरोध नसल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. माळीवाडा आणि पळशी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी समृद्धी महामागाबाबत भूमिका स्पष्ट केली. सेनेचा विकासाला विरोध नाही. मुंबई, पुणे, वरळी सी-लिंक, उड्डाणपूल मुंबईत केले; परंतु शेतकऱ्यांच्या संसाराची राखरांगोळी करून विकास नको आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाचे खाते शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्याचे आदेश शिंदे यांना देणार काय? यावर ठाकरे यांनी ठोस उत्तर न दता मुख्यमंत्री, शिंदे व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक लावली जाईल, असे सांगितले.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी तरतूद केलेल्या १८ हजार कोटींपैकी ८ हजार कोटींचे रस्ते एमएसआरडीसीकडे वर्ग झाले. एमएसआरडीसी ते रस्ते द्विपदरीऐवजी चौपदरी करणार का? यावर ठाकरे म्हणाले, माझीदेखील हीच भूमिका आहे. बोलल्यानंतर मार्ग निघतील. काही शेतकरी जमीन न देण्याच्या भूमिकेत आहेत. काहींना मोबदला जास्तीचा हवा आहे. आम्ही विरोधात दंड थोपटतो, नंतर शेतकऱ्यांची मानसिकता बदलते. त्यामुळे आधी शेतकऱ्यांची भूमिका समजून घेतली पाहिजे. आहे तो रस्ता रुंद करून दिला तर चालेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मार्ग होऊ नये, ही शेतकऱ्यांची मागणी नाही. सुपीक जमीन न जाता मार्ग व्हावा अशी शेतकऱ्यांची मागणी आह, असे ठाकरे यांनी सांगितले.