शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Aaditya Thackeray : "बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही; धनुष्यबाण हा आपलाच राहणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 15:40 IST

Shivsena Aaditya Thackeray : बंडखोरांपुढे दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहार पक्षात विलीन व्हा, नाही तर भाजपामध्ये विलीन होणं हेच पर्याय असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुंबई - शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत तब्बल 40 हून अधिक आमदारांनी बंड पुकारलं आहे. दोन्ही बाजूंनी दावे अन् प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद आता न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे पक्षाला भगदाड पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे देखील पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत. याच दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Shivsena Aaditya Thackeray) यांनी आपला 'ठाकरी बाणा' दाखवला आहे. बंडखोरांवर जोरदार निशाणा साधला आहे. 

"बंडखोरांना पुन्हा विधानभवनाची पायरी चढू देणार नाही, धनुष्यबाण हा आपलाच राहणार" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. यासोबतच प्रत्येक आमदार जरी तिथे गेला तरी विजय हा शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "उद्धवजींनी मोह सोडलाय, जिद्द, ताकद नाही. आम्हीच शिवसेना, बाळासाहेब ठाकरे नाव लावतात. तुमची लायकी असती तर सुरतमध्ये पळाला असता?बंड ठाण्यात बसून मुंबईत बसून केलं असतं. महाराष्ट्रात बंड करायची हिंमत नाही म्हणून बाहेर पळाले. एकाने विचारलं आदित्यजी कसं वाटतंय मी म्हटलं, लोकांचं प्रेम दिसतंय. पर्यावरण मंत्री म्हणून माझं हेच काम होते राज्यात कुठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेली आहे याचा आनंद आहे असा टोला त्यांनी लगावला. सांताक्रूझमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात आदित्य ठाकरे बोलत होते.  

संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात गेल्यावर सभेत उठून एका शेतकऱ्याने मला सांगितले की भुमरे पाच टर्म आमदार झाले आहेत, त्यांना मंत्रीपदाची संधी द्या. त्यानंतर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत बोललो. धनुष्यबाण हा आपलाच राहणार, शिवसेना पक्ष आणि प्रेम आपलच राहणार. बंडखोरांपुढे दोनच पर्याय आहेत. एकतर प्रहार पक्षात विलीन व्हा, नाही तर भाजपामध्ये विलीन होणं हेच पर्याय असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच परत यांना विधानभवनाची पायरी चढू देणार नाही. त्यांना निवडणुकीत पाडणार. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि परत निवडून येऊन दाखवा असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

20 मे रोजी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना विचारलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का? पण जे झालं ते झालंच. बंडखोरांना माफी नाही. महत्त्वाची खाती होती, पक्षात वजन होतं इथे मानसन्मान मिळत होता. स्वतः विकलेलो नाही विकणारही नाही. ज्यांना जायचंय दरवाजे खुले आहेत. काय होते तुम्ही आणि काय जोक झालाय तुमचा. जिथे पूर आलाय लोकांना खायला अन्न नाही अशा ठिकाणी तुम्ही मजा मारायला जाता? संरक्षण काश्मिरी पंडितांना द्यायला हवी ती कुठे वापरली जातेय. चार्टर्ड प्लेन, हॉटेलचा खर्च किती असेल, अपहरण केलेल्या आमदारांना कपडे देण्याचं बिल किती असेल. G20 मध्ये जेव्हा आपल्या देशात लोक येणार तेव्हा त्यांना वाटेल इथे लोकशाही आहे की नाही असा आरोप आदित्य ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपावर केला.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारण