शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिवस्मारकाला परवानगी नसताना तीन-तीनदा भूमिपूजन केलेच कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 05:57 IST

विरोधक आक्रमक : स्मारक समिती बरखास्त करण्याची मागणी

मुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्पाच्या परवानग्या कोण रोखत आहे? परवानगीच नसताना सरकारने तीन-तीन वेळा स्मारकाचे भूमिपूजन कसे केले, असे सवाल उपस्थित करत विरोधकांनी बुधवारी विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले. विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे कामकाज ४० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

शेकापचे जयंत पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे शिवस्मारकाचा प्रश्न उपस्थित केला. शिवस्मारकाच्या कामाच्या परवानग्या नेमके कोणते अधिकारी नाकारत आहेत. परवानग्या नसताना कोणते अधिकारी टेंडर काढत आहेत, याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. स्मारकाच्या कामात अडथळे येत असताना शिवस्मारक समिती काय काम करीत होती, असा सवाल करत ही समितीच बरखास्त करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

पर्यावरण खात्याची परवानगी नसताना पंतप्रधानांनी या स्मारकाचे भूमिपूजन केलेच कसे, असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. मराठा आंदोलन तीव्र झाल्याने तो दाबण्यासाठी भूमिपूजन उरकण्यात आल्याचा आरोप मुंडे यांनी केला. आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या समितीचे प्रमुख विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांना आठ पानी पत्र लिहिले होते. त्यातही चुकीच्या पद्धतीने स्मारकाच्या कामाचे टेंडर दिल्याचे मान्य केले आहे. हे पत्र आणि आता स्मारकाच्या कामाला कशामुळे स्थगिती मिळाली, याबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदन करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली.

टॅग्स :Shiv Smarakशिवस्मारक