शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

शिवप्रेमी साबीरभाई

By admin | Updated: October 16, 2014 23:04 IST

साबीर शेख ऊर्फ साबीरभाई यांचे निधन मनाला चटका लावणारे असले तरी आकस्मिक असे म्हणता येणार नाही.

साबीर शेख ऊर्फ साबीरभाई यांचे निधन मनाला चटका लावणारे असले तरी आकस्मिक असे म्हणता येणार नाही. वयाची 72 वर्षे ओलांडली असली तरी पन्नाशीनंतर ते मधुमेह, रक्तदाब, संधिवात अशा काही व्याधींनी त्रस्त होते. संधिवातामुळे त्यांना चालणोही कठीण झाले होते. केवळ कल्याणच नव्हे तर अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, डोंबिवलीसह ठाणो जिल्ह्यातील अनेक गावांतील, खेडय़ांतील कार्यकत्र्याच्या थेट स्वयंपाकघरार्पयत ते पोहोचले होते. कार्यकत्र्याना ते शेवटर्पयत नावाने ओळखत. साबीरभाईंचे संपूर्ण घराणो तसे भाविक, श्रद्धाळू होते. भजने, कीर्तने, भारूड, भक्तिगीते, समरगीते, पोवाडे याबरोबरच गझल, शेरशायरी यावरही त्यांचे  चांगले प्रभुत्व होते, अभ्यास होता. वारकरी संप्रदायाबद्दल त्यांना नितांत आदर होता.
साबीरभाई मूळचे नारायणगावचे असले तरी ते मुंबईत आले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या संपर्कात येताच त्यांच्या आयुष्याने वेगळीच कलाटणी घेतली़ अंबरनाथच्या आयुध उत्पादन करणा:या कारखान्यात काम करतानाच कामगार चळवळीशी त्यांचा संबंध आला. त्याच वेळी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले. व्यायामाची आवड असलेले पहिलवान, गड-किल्लेभ्रमणाची आवड जोपासणारे शिवशाहीर साबीर शेख यांनी अनेक तरुणांना बरोबर घेऊन त्यांच्यात गिरीभ्रमणाची आवड निर्माण केली. याबरोबरच जिल्ह्यात अत्यंत निष्ठवान शिवसेना कार्यकत्र्याची फौज निर्माण केली़ स्थानिक प्रश्नावर झालेल्या आंदोलनांत त्याचा महत्त्वाचा सहभाग असे. त्यांची भाषणो अभ्यासपूर्ण असत. 
शिवसेना ही मुस्लिमविरोधात नाही, हे त्यांनी आपल्याबरोबर अनेक मुस्लिम कार्यकर्ते शिवसेनेत आणून सिद्ध केले. चंद्रकांत भोईर, दिलीप कपोते, अंबरनाथचे गडकरी, कल्याणचे सुभाष साईवाले, दीपक सोनाळकर, प्रशांत मुल्हेरकर, तुषार राजे, भगवान खराटे, रत्नाकर चासकर, उल्हासनगरचे दिलीप मालवणकर असे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडविले. त्यात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागांतील जमिनीच्या वादातून होणारे तंटे, मारामा:यांत त्यांनी लक्ष घातल़े त्याबरोबरच कल्याणातील वाडेघरसारख्या एकेकाळी गुंड प्रवृत्तीचे गाव म्हणून दहशत असलेल्या या खेडय़ातील अनेक तरुणांना शिवसेनेच्या माध्यमातून सत्प्रवृत्तीच्या मार्गाला लावले.
शिवसेनेतर्फे त्यांनी कल्याण नगरपालिकेच्या थेट अध्यक्षपदाची निवडणूक लढविली. त्यात त्यांना तत्कालीन जनसंघाचे भगवानराव जोशी यांच्याकडून अवघ्या 3क्क् मतांनी पराभव पत्करावा लागला होता. अंबरनाथमधून ते विधानसभेवर निवडून गेले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना कामगार मंत्रीपदाचाही कार्यभार त्यांनी सांभाळला़ त्या वेळी डॉ. दत्ता सामंत, कृष्णराव धुळप, आर.जी. कर्णिक, मनोहर कोतवाल असे अनेक दिग्गज कामगार नेते या क्षेत्रत कार्यरत होत़े गोदरेज कंपनीतील कामगारांचा प्रश्न, नॅशनल रेयॉन कंपनीतील टाळेबंदी, आयडीआयमधील संप, मुंबईतील गिरणी कामगारांचे प्रश्न अशा अनेक प्रसंगांत अत्यंत तटस्थतेची भूमिका घेऊन कामगार हिताचे निर्णय त्यांनी घेतले. कामगार संघटना, नेते यांच्याबद्दलची मते, त्यांच्या भूमिका यात आपली मते ते स्पष्टपणो मांडत. हे सर्व करतानाच ठाणो जिल्ह्यात शिवसेनेचेही त्यांनी समर्थपणो नेतृत्व केले. आनंद दिघे यांना त्यांची उत्तम साथ मिळाली. त्यांच्या काळात गटबाजीच्या राजकारणाला थारा नव्हता.
गेली काही वर्षे प्रकृती साथ देत नसल्याने ते सक्रिय राजकारणातून बाजूला झाले होते. तरीही, घरी येणा:या कार्यकत्र्याशी, मित्रंशी गप्पा मारताना आपल्या जुन्या कार्यकत्र्याच्या स्मृतींना ते उजाळा देत, त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी करीत. कल्याणात दुर्गाडी किल्ल्याजवळ छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबरोबर साबीर शेख मंचावर उपस्थित होते. तोच त्यांचा शेवटचा कार्यक्र म असेल, याची कुणाही कार्यकत्र्याला कल्पना नसेल.
 
अण्णा बेटावदकर