शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवप्रेमी साबीरभाई

By admin | Updated: October 16, 2014 23:04 IST

साबीर शेख ऊर्फ साबीरभाई यांचे निधन मनाला चटका लावणारे असले तरी आकस्मिक असे म्हणता येणार नाही.

साबीर शेख ऊर्फ साबीरभाई यांचे निधन मनाला चटका लावणारे असले तरी आकस्मिक असे म्हणता येणार नाही. वयाची 72 वर्षे ओलांडली असली तरी पन्नाशीनंतर ते मधुमेह, रक्तदाब, संधिवात अशा काही व्याधींनी त्रस्त होते. संधिवातामुळे त्यांना चालणोही कठीण झाले होते. केवळ कल्याणच नव्हे तर अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, डोंबिवलीसह ठाणो जिल्ह्यातील अनेक गावांतील, खेडय़ांतील कार्यकत्र्याच्या थेट स्वयंपाकघरार्पयत ते पोहोचले होते. कार्यकत्र्याना ते शेवटर्पयत नावाने ओळखत. साबीरभाईंचे संपूर्ण घराणो तसे भाविक, श्रद्धाळू होते. भजने, कीर्तने, भारूड, भक्तिगीते, समरगीते, पोवाडे याबरोबरच गझल, शेरशायरी यावरही त्यांचे  चांगले प्रभुत्व होते, अभ्यास होता. वारकरी संप्रदायाबद्दल त्यांना नितांत आदर होता.
साबीरभाई मूळचे नारायणगावचे असले तरी ते मुंबईत आले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या संपर्कात येताच त्यांच्या आयुष्याने वेगळीच कलाटणी घेतली़ अंबरनाथच्या आयुध उत्पादन करणा:या कारखान्यात काम करतानाच कामगार चळवळीशी त्यांचा संबंध आला. त्याच वेळी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले. व्यायामाची आवड असलेले पहिलवान, गड-किल्लेभ्रमणाची आवड जोपासणारे शिवशाहीर साबीर शेख यांनी अनेक तरुणांना बरोबर घेऊन त्यांच्यात गिरीभ्रमणाची आवड निर्माण केली. याबरोबरच जिल्ह्यात अत्यंत निष्ठवान शिवसेना कार्यकत्र्याची फौज निर्माण केली़ स्थानिक प्रश्नावर झालेल्या आंदोलनांत त्याचा महत्त्वाचा सहभाग असे. त्यांची भाषणो अभ्यासपूर्ण असत. 
शिवसेना ही मुस्लिमविरोधात नाही, हे त्यांनी आपल्याबरोबर अनेक मुस्लिम कार्यकर्ते शिवसेनेत आणून सिद्ध केले. चंद्रकांत भोईर, दिलीप कपोते, अंबरनाथचे गडकरी, कल्याणचे सुभाष साईवाले, दीपक सोनाळकर, प्रशांत मुल्हेरकर, तुषार राजे, भगवान खराटे, रत्नाकर चासकर, उल्हासनगरचे दिलीप मालवणकर असे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडविले. त्यात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागांतील जमिनीच्या वादातून होणारे तंटे, मारामा:यांत त्यांनी लक्ष घातल़े त्याबरोबरच कल्याणातील वाडेघरसारख्या एकेकाळी गुंड प्रवृत्तीचे गाव म्हणून दहशत असलेल्या या खेडय़ातील अनेक तरुणांना शिवसेनेच्या माध्यमातून सत्प्रवृत्तीच्या मार्गाला लावले.
शिवसेनेतर्फे त्यांनी कल्याण नगरपालिकेच्या थेट अध्यक्षपदाची निवडणूक लढविली. त्यात त्यांना तत्कालीन जनसंघाचे भगवानराव जोशी यांच्याकडून अवघ्या 3क्क् मतांनी पराभव पत्करावा लागला होता. अंबरनाथमधून ते विधानसभेवर निवडून गेले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना कामगार मंत्रीपदाचाही कार्यभार त्यांनी सांभाळला़ त्या वेळी डॉ. दत्ता सामंत, कृष्णराव धुळप, आर.जी. कर्णिक, मनोहर कोतवाल असे अनेक दिग्गज कामगार नेते या क्षेत्रत कार्यरत होत़े गोदरेज कंपनीतील कामगारांचा प्रश्न, नॅशनल रेयॉन कंपनीतील टाळेबंदी, आयडीआयमधील संप, मुंबईतील गिरणी कामगारांचे प्रश्न अशा अनेक प्रसंगांत अत्यंत तटस्थतेची भूमिका घेऊन कामगार हिताचे निर्णय त्यांनी घेतले. कामगार संघटना, नेते यांच्याबद्दलची मते, त्यांच्या भूमिका यात आपली मते ते स्पष्टपणो मांडत. हे सर्व करतानाच ठाणो जिल्ह्यात शिवसेनेचेही त्यांनी समर्थपणो नेतृत्व केले. आनंद दिघे यांना त्यांची उत्तम साथ मिळाली. त्यांच्या काळात गटबाजीच्या राजकारणाला थारा नव्हता.
गेली काही वर्षे प्रकृती साथ देत नसल्याने ते सक्रिय राजकारणातून बाजूला झाले होते. तरीही, घरी येणा:या कार्यकत्र्याशी, मित्रंशी गप्पा मारताना आपल्या जुन्या कार्यकत्र्याच्या स्मृतींना ते उजाळा देत, त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी करीत. कल्याणात दुर्गाडी किल्ल्याजवळ छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबरोबर साबीर शेख मंचावर उपस्थित होते. तोच त्यांचा शेवटचा कार्यक्र म असेल, याची कुणाही कार्यकत्र्याला कल्पना नसेल.
 
अण्णा बेटावदकर