शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

शिवप्रेमी साबीरभाई

By admin | Updated: October 16, 2014 23:04 IST

साबीर शेख ऊर्फ साबीरभाई यांचे निधन मनाला चटका लावणारे असले तरी आकस्मिक असे म्हणता येणार नाही.

साबीर शेख ऊर्फ साबीरभाई यांचे निधन मनाला चटका लावणारे असले तरी आकस्मिक असे म्हणता येणार नाही. वयाची 72 वर्षे ओलांडली असली तरी पन्नाशीनंतर ते मधुमेह, रक्तदाब, संधिवात अशा काही व्याधींनी त्रस्त होते. संधिवातामुळे त्यांना चालणोही कठीण झाले होते. केवळ कल्याणच नव्हे तर अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी, डोंबिवलीसह ठाणो जिल्ह्यातील अनेक गावांतील, खेडय़ांतील कार्यकत्र्याच्या थेट स्वयंपाकघरार्पयत ते पोहोचले होते. कार्यकत्र्याना ते शेवटर्पयत नावाने ओळखत. साबीरभाईंचे संपूर्ण घराणो तसे भाविक, श्रद्धाळू होते. भजने, कीर्तने, भारूड, भक्तिगीते, समरगीते, पोवाडे याबरोबरच गझल, शेरशायरी यावरही त्यांचे  चांगले प्रभुत्व होते, अभ्यास होता. वारकरी संप्रदायाबद्दल त्यांना नितांत आदर होता.
साबीरभाई मूळचे नारायणगावचे असले तरी ते मुंबईत आले आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या संपर्कात येताच त्यांच्या आयुष्याने वेगळीच कलाटणी घेतली़ अंबरनाथच्या आयुध उत्पादन करणा:या कारखान्यात काम करतानाच कामगार चळवळीशी त्यांचा संबंध आला. त्याच वेळी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले. व्यायामाची आवड असलेले पहिलवान, गड-किल्लेभ्रमणाची आवड जोपासणारे शिवशाहीर साबीर शेख यांनी अनेक तरुणांना बरोबर घेऊन त्यांच्यात गिरीभ्रमणाची आवड निर्माण केली. याबरोबरच जिल्ह्यात अत्यंत निष्ठवान शिवसेना कार्यकत्र्याची फौज निर्माण केली़ स्थानिक प्रश्नावर झालेल्या आंदोलनांत त्याचा महत्त्वाचा सहभाग असे. त्यांची भाषणो अभ्यासपूर्ण असत. 
शिवसेना ही मुस्लिमविरोधात नाही, हे त्यांनी आपल्याबरोबर अनेक मुस्लिम कार्यकर्ते शिवसेनेत आणून सिद्ध केले. चंद्रकांत भोईर, दिलीप कपोते, अंबरनाथचे गडकरी, कल्याणचे सुभाष साईवाले, दीपक सोनाळकर, प्रशांत मुल्हेरकर, तुषार राजे, भगवान खराटे, रत्नाकर चासकर, उल्हासनगरचे दिलीप मालवणकर असे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडविले. त्यात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागांतील जमिनीच्या वादातून होणारे तंटे, मारामा:यांत त्यांनी लक्ष घातल़े त्याबरोबरच कल्याणातील वाडेघरसारख्या एकेकाळी गुंड प्रवृत्तीचे गाव म्हणून दहशत असलेल्या या खेडय़ातील अनेक तरुणांना शिवसेनेच्या माध्यमातून सत्प्रवृत्तीच्या मार्गाला लावले.
शिवसेनेतर्फे त्यांनी कल्याण नगरपालिकेच्या थेट अध्यक्षपदाची निवडणूक लढविली. त्यात त्यांना तत्कालीन जनसंघाचे भगवानराव जोशी यांच्याकडून अवघ्या 3क्क् मतांनी पराभव पत्करावा लागला होता. अंबरनाथमधून ते विधानसभेवर निवडून गेले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना कामगार मंत्रीपदाचाही कार्यभार त्यांनी सांभाळला़ त्या वेळी डॉ. दत्ता सामंत, कृष्णराव धुळप, आर.जी. कर्णिक, मनोहर कोतवाल असे अनेक दिग्गज कामगार नेते या क्षेत्रत कार्यरत होत़े गोदरेज कंपनीतील कामगारांचा प्रश्न, नॅशनल रेयॉन कंपनीतील टाळेबंदी, आयडीआयमधील संप, मुंबईतील गिरणी कामगारांचे प्रश्न अशा अनेक प्रसंगांत अत्यंत तटस्थतेची भूमिका घेऊन कामगार हिताचे निर्णय त्यांनी घेतले. कामगार संघटना, नेते यांच्याबद्दलची मते, त्यांच्या भूमिका यात आपली मते ते स्पष्टपणो मांडत. हे सर्व करतानाच ठाणो जिल्ह्यात शिवसेनेचेही त्यांनी समर्थपणो नेतृत्व केले. आनंद दिघे यांना त्यांची उत्तम साथ मिळाली. त्यांच्या काळात गटबाजीच्या राजकारणाला थारा नव्हता.
गेली काही वर्षे प्रकृती साथ देत नसल्याने ते सक्रिय राजकारणातून बाजूला झाले होते. तरीही, घरी येणा:या कार्यकत्र्याशी, मित्रंशी गप्पा मारताना आपल्या जुन्या कार्यकत्र्याच्या स्मृतींना ते उजाळा देत, त्यांच्या कुटुंबीयांची आस्थेने चौकशी करीत. कल्याणात दुर्गाडी किल्ल्याजवळ छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याबरोबर साबीर शेख मंचावर उपस्थित होते. तोच त्यांचा शेवटचा कार्यक्र म असेल, याची कुणाही कार्यकत्र्याला कल्पना नसेल.
 
अण्णा बेटावदकर