शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

शिवाजी विद्यापीठ करणार सहा गावे ‘आदर्श’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2015 01:01 IST

‘स्वच्छ, स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण सहा गावे शिवाजी विद्यापीठ ‘आदर्श ग्राम’ म्हणून विकसित करणार आहे.

कोल्हापूर : ‘स्वच्छ, स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील एकूण सहा गावे शिवाजी विद्यापीठ ‘आदर्श ग्राम’ म्हणून विकसित करणार आहे. त्यासाठी जिल्हानिहाय उपसमित्यांची सोमवारी स्थापना करण्यात आली. शिवाय जुलैअखेर कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) सूचनेनुसार विद्यापीठाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी कृती आराखडा निश्चिती, उपसमित्यांच्या स्थापनेबाबत विद्यापीठात सोमवारी बैठक झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. विद्यापीठ दत्तक घेतलेल्या गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे सांगाव (ता. कागल), कडगाव (ता. गडहिंग्लज), सांगली जिल्ह्यातील तडवळे (आटपाडी) आणि सातारा जिल्ह्यातील शिरढोण व माहुली आदींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)विद्यापीठाने निवडलेल्या सहा गावांच्या विकासासाठी पाच वर्षांचा कालावधी असणार आहे. येत्या १५ दिवसांत उपसमिती संबंधित गावांना भेट देऊन पाहणी करतील. त्यानंतर तेथील विकासाच्या दृष्टीने कृती आराखडा निश्चित करण्यात येईल.- डॉ. डी. के. गायकवाड, संचालक, विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ.