शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

शिवाजी पार्कमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 13:51 IST

शिवाजी पार्क पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी चौकशी केली असता, तिघे आत्मदहन करण्यासाठी शिवाजी पार्क येथे आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई- शिवाजी पार्क पोलिसांनी एकाच कुटुंबातील तीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी चौकशी केली असता, तिघे आत्मदहन करण्यासाठी शिवाजी पार्क येथे आल्याची माहिती समोर आली आहे. परभणीत वास्तव्याला असणा-या अखिलाबेगम नामक महिलेच्या पतीला परभणी पोलिसांनी चौकशीकरिता ताब्यात घेतले होते. त्यानंतर कोठडीतच नव-याचा मृत्यू झाल्याचं महिलेला समजले.

परभणी नानलपेठ पोलीस ठाण्यात 25 डिसेंबर 2016मध्ये ३८ वर्षीय समशेर खान याला चोरीच्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये खानचा मृत्यू झाला. पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत तीन पोलिसांना अटक करण्यात आली होती. मात्र घरचा करता पुरुष गेल्याने खान कुटुंबीय रस्त्यावर आले. आर्थिक मदत मिळावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी केली होती. यासंदर्भात परभणी गुन्हे शाखेनं भादंवि 302,331,348,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक एम. एस. रौफ यांना अटक झाली आहे. तर इतर दोन कर्मचारी फरार आहेत. सदर महिला अखिलाबेगम समशेर खान (35), मुलगा मन्सूरखान समशेर खान(15), दीर यासिन खान शामिर खान(30) यांच्यासह शिवाजी पार्क येथे आत्मदहन करण्यासाठी आले होते.सरकारकडून आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही, तसेच सरकारनं आमचा पुनर्वसन केलेलं नाही, असा आक्रोश करत तिने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तिन्ही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून एक रॉकेलची बॉटल व एक छोटा चाकू मिळाला असून ते सर्व सामान हस्तगत करण्यात आलं आहे.

 

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबई