शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पहिला दिवस शिवसेनेचा!

By admin | Updated: December 8, 2015 01:37 IST

स्वतंत्र विदर्भासाठी जनमताचा कौल घेण्याची मागणी करणाऱ्या महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची पदावरून हकालपट्टी करा, अशी घोषणा देत सत्ताधारी शिवसेनेने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाजी मारली.

अतुल कुलकर्णी,  नागपूरस्वतंत्र विदर्भासाठी जनमताचा कौल घेण्याची मागणी करणाऱ्या महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची पदावरून हकालपट्टी करा, अशी घोषणा देत सत्ताधारी शिवसेनेने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाजी मारली. मात्र आम्ही हा विषय विधानसभेत मांडू असे सांगत काँग्रेसने या प्रकरणापासून आज अंग काढून घेतले. श्रीहरी अणे हे महाधिवक्ता आहेत. त्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी जनतेचे मत घेण्याची माणगी करणे याचा अर्थ सरकारने ती मागणी करणे असा त्याचा अर्थ निघतो. बेळगाव कारवार सीमाप्रश्न सध्या सर्वाेच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना राज्याच्या महाधिवक्त्याने अशी भूमिका घेणे, मी स्वत: विदर्भवादी आहे, अशा मुलाखती माध्यमांना देणे यामुळे बेळगावची केसही कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा सूर उमटत असताना या विषयाचे भांडवल करण्याची संधी काँग्रेसने मात्र पहिल्याच दिवशी गमावली.शिवसेना आज या विषयावर आक्रमक झाली. पायऱ्यांवर आंदोलन करत, घोषणा देत त्यांनी विधानसभा दणाणून सोडली. आज पहिल्याच दिवशी शोकप्रस्ताव होते. त्याशिवाय सभागृहात दुसरा विषय नव्हता. मात्र शिवसेनेने सभागृहाबाहेर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सेना सभागृहातही काही तरी करेल की काय या उत्सुकतेपोटी पत्रकार गॅलरीही गच्च भरून गेली. काँग्रेसने मात्र या महाधिवक्ता अणे यांचा विषय आम्ही विधासभेत मांडू, असे सांगून या विषयापासून पळ काढला. याबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, शिवसेनेने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही सभागृहात काय ते मांडू ,असे सांगितले. सोमवारी श्रीहरी अणे यांचे व्याख्यान विधिमंडळात ठेवले होते ते आमच्या मागणीमुळेच विधिमंडळाला रद्द करावे लागले,असा दावाही विखे यांनी केला. तर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, महाधिवक्ता हे घटनात्मक पद आहे. त्यांची भूमिका ही सरकारची भूमिका आहे का? हे सरकारने स्पष्ट करावे. पण सभागृहात अथवा विधिमंडळ परिसरात कोणता विषय कसा मांडायचा हा विरोधी पक्षनेत्यांचा प्रश्न आहे. त्यांनाच विचारा.स्वतंत्र विदर्भासाठी जनमत घेण्याच्या अणे यांच्या वक्तव्यावरून मुंबईत शिवसेनेने ठिकठिकाणी आंदोलन केले. स्थानिक विभागप्रमुख आणि लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली जमलेल्या शिवसैनिकांनी निषेध नोंदविला. हुतात्मा चौक, दादर, कुर्ला, विलेपार्ले, घाटकोपर, बोरीवली आदी ठिकाणी ‘अखंड महाराष्ट्राचा विजय असो’, ‘अखंड महाराष्ट्र राहिलाच पाहिजे’, ‘महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा निषेध’ असे फलक दाखवत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.