शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

अंतर्गत मतभेदाचा शिवसेनेला फटका

By admin | Updated: April 21, 2017 20:41 IST

परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला समाधानकारक कामगिरी करता आलेली नसून, पक्षातील अंतर्गत वादाचा फटका

ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. 21 -  येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला समाधानकारक कामगिरी करता आलेली नसून, पक्षातील अंतर्गत वादाचा फटका या पक्षाला बसल्याचे स्पष्ट झाले आहे़ 
परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने ६५ पैकी ६२ जागांवर उमेदवार उभे केले होते़ उमेदवारी देण्यावरून या पक्षातही बरेच वाद निर्माण झाले होते़ शिवाय खा़ बंडू जाधव व आ़ डॉ़ राहुल पाटील या दोन नेत्यांच्या गटांमध्ये देखील उमेदवारीवरून वादाचे प्रकार झाले होते़ पक्षाचे संपर्कप्रमुख आ़ सुभाष भोईर यांनी पत्रकार परिषद घेऊन या दोन नेत्यांमधील वाद मिटला असल्याचे सांगितले असले तरी निवडणूक निकालामध्ये तसे दिसून आलेले नाही़ परिणामी पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे़ आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली गेली होती़ आ़पाटील यांनी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून प्रचार यंत्रणा राबविली होती़ शिवाय शहराच्या विकासाचा अजेंडा तयार केल्याचे त्यांनी भाषणांमधून सांगितले होते़ तसेच पोस्टरबाजीच्या माध्यमातूनही त्यांनी मतदारांना आवाहन केले होते़ परंतु, परभणीतील मतदारांनी त्यांना साथ दिली नसल्याचे निकालांती स्पष्ट झाले आहे़ शिवसेनेची वोट बँक असलेल्या अनेक प्रभागांत पक्षाचे उमेदवार पराभूत झाले आहेत़ मनपातील विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे, नगरसेवक नवनीत पाचपोर, सहसंपर्क प्रमुख डॉ़ विवेक नावंदर आदी दिग्गजांचा पराभव झाला असून, हा पराभव आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या गटासाठी धक्कादायक मानला जात आहे़ याशिवाय मतदानापूर्वी पूर्णा शहरात घडलेल्या दगडफेकीच्या घटनेचाही शिवसेनेच्या मतदानावर परिणाम झाल्याची चर्चा शहरातून होताना दिसून येत आहे़ 
सांघिक झाला नाही प्रचार
शिवसेनेकडून शहरात प्रभावी प्रचार यंत्रणा राबविली गेली असली तरी नेत्यांमध्ये मात्र सांघिक प्रचार झाला नाही़ परिणामी पक्षाला फारसे यश मिळाले नाही़ उलट पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आल्याने मतदारांनाच असुरक्षित वाटू लागल्याचे निकालातून दिसून आले आहे़ यावर आता पक्षातील नेत्यांनी चिंतन करणे गरजेचे आहे़