शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

परिषदेत सभापती सुरक्षित, उपसभापतींचा शोध सुरू, विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचा आग्रह  

By अतुल कुलकर्णी | Updated: July 10, 2018 06:03 IST

विधानपरिषदेत भाजपाचे सर्वाधिक २३ आमदार झाले असले तरी राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांच्या सभापतिपदाच्या खुर्चीला कोणताही धोका नाही.

नागपूर - विधानपरिषदेत भाजपाचे सर्वाधिक २३ आमदार झाले असले तरी राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांच्या सभापतिपदाच्या खुर्चीला कोणताही धोका नाही. ७८ सदस्य असणाऱ्या विधानपरिषदेत सत्ताधारी पक्षाकडे ३८ सदस्य आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य सहयोगी पक्षाचे मिळून ४० सदस्य झाले आहेत. शिवाय सोमवारी बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी २६ जुलैपासून सुरू होणार आहे. तोपर्यंत पावसाळी अधिवेशन संपून जाणार आहे.विधानपरिषदेच्या ११ आमदारांचा कालावधी २५ जुलै रोजी संपणार आहे. त्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यासाठी अर्ज मागे घेण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता. आज ११ अर्जच शिल्लक राहिल्यामुळे हे सगळे बिनविरोध निवडून आले असले तरी त्यांचे पहिले अधिवेशन हिवाळी अधिवेशन असेल.नव्या समीकरणानंतर भाजपाचे २३, शिवसेनेचे १३, नागो गाणार आणि प्रशांत परिचारक असे दोघे भाजपाकडे असणारे आमदार, अशी एकूण ३८ आमदारांची संख्या सत्ताधारी पक्षांकडे आहे. तर काँग्रेस १७, राष्टÑवादी १७, जयंत पाटील (शेकाप), बळीराम पाटील (अपक्ष), जोगेंद्र कवाडे (कवाडे गट), दत्तात्रय सावंत (अपक्ष) आणि कपिल पाटील (लोकभारती), असे एकूण ४० सदस्य विरोधी बाकावर आहेत. दोनचा फरक जरी असला तरी येणाºया काळात विधानपरिषदेत सत्तासंघर्ष सतत पाहायला मिळेल, असे चित्र आहे. उपसभापती माणिकराव ठाकरे यांना काँग्रेसने पुन्हा संधी न दिल्यामुळे आता उपसभापतिपद रिकामे होत आहे. या पदासाठी स्वत:जवळच्या ४० सदस्यांच्या भरवशावर काँग्रेस पुन्हा आपला हक्क सांगणार की, हे पद भाजपा, शिवसेना घेणार, यावर आतापासूनच खल चालू आहे. उपसभापती शिवसेनेने घ्यावे आणि त्याजागी परिषदेतील ज्येष्ठ मंत्र्यांची नियुक्ती करावी आणि मंत्रिपद विधानसभेच्या सदस्याला द्यावे, असा आग्रह शिवसेनेतून सुरू झाला आहे.उपाध्यक्षपदही रिकामेच!राज्याच्या इतिहासात विधानसभेचे उपाध्यक्षपद जवळपास साडेतीन वर्षे रिकामे राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. भाजपाने अध्यक्षपद हरिभाऊ बागडे यांना दिले; मात्र उपाध्यक्षपद रिवाजाप्रमाणे विरोधीपक्षाला द्यावे, असे अपेक्षित असताना ते दिले गेलेले नाही. भाजपा सत्तेवर आल्यानंतर शिवसेना विरोधात होती; त्यामुळे संख्याबळाच्या जोरावर एकनाथ शिंदे औटघटकेचे विरोधीपक्षनेते झाले होते. मात्र शिवसेनेत सत्तेत प्रवेश केल्यामुळे ते पद काँग्रेसकडे आले. आता विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्टÑवादीला मिळावे, असा त्यांचा दावा आहे. पण या पदासाठी भाजपाने कोणतीही घाई केलेली नाही.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदnewsबातम्या