शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने जैतापूरविषयी भूमिका स्पष्ट करावी: नितेश राणे

By admin | Updated: April 19, 2017 20:20 IST

जैतापुर येथील प्रकल्पाचे काम सन 2018 मध्ये पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे.

ऑनलाइन लोकमत  

सिंधुदुर्ग, दि. 19- जैतापूर येथील प्रकल्पाचे काम सन 2018 मध्ये पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. भाजप बरोबर राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध दर्शवित लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. त्यामुळे या प्रकल्पावरुन शिवसेनेने जनतेची फसवणूक केली आहे.अशी टिका करतानाच  शिवसेनेने या प्रकल्पाविषयी आपली भूमिका जनतेसमोर स्पष्ट करावी असे प्रतिपादन काँग्रेस आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.
 
येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत उपस्थित होते.
 
यावेळी आमदार नीतेश राणे म्हणाले, शिवसेनेने जैतापुर तसेच तोंडवळी येथील सी- वर्ल्ड प्रकल्पाबाबत राजकारण करीत जनतेेकडे मते मागितली होती. तसेच या मुद्यावरून त्यांचे खासदार तसेच आमदार निवडून आले आहेत. मात्र या दोन्ही प्रकल्पाविषयी शिवसेनेवाले आता काही बोलायला तयार नाहीत. त्यामुळे त्यानी जनतेची फसवणूकच केल्याचे स्पष्ट होते.
 
अशा लोकांवर जनतेने विश्वास ठेवायचा का? मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेचा खरा चेहरा उघडा पडला आहे. अलीकडेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या पर्यटनमंत्र्यानी सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत आमदार वैभव नाईक यांच्यावर जबाबदारी दिली आहे.
 वैभव नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत या प्रकल्पाचे राजकारण करीत नारायण राणे यांच्या विरोधात मते मागितली होती. त्यामुळे आता त्यांनी त्याबाबत जनतेला सपष्टीकरण द्यावे. सिवर्ल्ड प्रकल्पाविरोधात  तेथील देवस्थानने कौल दिला आहे. हे वैभव नाईक का लपवत आहेत? जर मालवण येथे सिवर्ल्ड प्रकल्प होत नसेल तर आम्ही तो देवगड येथे घेवू. त्यासाठी लागणारी जागा तेथे उपलब्ध आहे.
 माजी आमदार विजय सावंत यांनी साखर कारखान्यावरुन राणे कुटुंबियांवर आरोप केले आहेत. साखर कारखान्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी त्यांच्या अर्जा अगोदर आम्ही अर्ज केलेला आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सावंत यांनी 10 हजार तरुणांकडून नोकरी देतो असे सांगून अर्ज भरुन घेतले आहेत.  त्या सर्वाना त्यांनी नोकऱ्या द्याव्यात.असे झाले तर जनतेच्या हितासाठी आम्ही आमचा अर्ज मागे घ्यायला तयार आहोत. कारखान्याला आमचा विरोध नाही. त्यांना प्रामाणिकपणे कारखाना सूरु करायचा आहे का? हाच खरा प्रश्न आहे.
जिल्हा बँकेने कर्ज कोणाला द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. ते राणेना विचारुन् कोणाला कर्ज देत नाहीत. कर्ज हवे असेल तर त्यासाठी रितसर अर्ज करावा लागतो. नियमानुसार कर्ज दिले जाईल. त्यात आमचा कोणताही हस्तक्षेप नसेल.(प्रतिनिधी)
त्यांचे पक्षप्रमुख इडीच्या भितीमुळे गेले होते का?
इडीच्या चौकशीमुळे राणे भाजप मध्ये प्रवेश करीत आहेत.अशी टिका आमदार वैभव नाईक यांनी केली होती. त्याविषयी बोलताना नीतेश राणे म्हणाले की, अलीकडे शिवसेना पक्षप्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. ते सुध्दा ईडीच्या भीतिमुळेच त्यांना भेटले होते का?असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी फक्त टिका करीत बसण्यापेक्षा झेंड्याच्या पलीकडे जावून कार्यकर्ते निर्माण करावेत. त्यांच्या हयातीतच सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमय व्हावा अशा शुभेच्छा मी त्यांना देतो.असेही राणे यावेळी म्हणाले.
पक्ष आर्थिक अडचणीत कसा?
काँग्रेस पक्ष आर्थिक अडचणीत असून आमदारांचे वेतन पक्षासाठी घेण्याचा प्रस्ताव अजुन माझ्याकडे आलेला नाही. या प्रस्तावाला माझा विरोध असेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले स्वतः मुख्यमंत्री होते. त्यांनी विविध पदे भूषविली आहेत.असे असताना पक्ष आर्थिक अडचणीत कसा असेल. ज्या पक्षाची आपण पदे उपभोगतो त्या पक्षासाठी आपण वेळप्रसंगी  आपल्या खिशात हात घालणार नसू तर काय उपयोग? याबाबतची आमची मते वरिष्ठाना कळविण्यात येतील. विजय सावंत यांच्यासारख्या व्यक्ति पक्षाच्या अधिकृत उमेदवारा विरोधात निवडणूक लढवित असतानाही त्यांच्या विरोधात पक्ष काहीच कारवाई करीत नसेल तर काय उपयोग? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पक्ष प्रवेशाच्या अफवाच !
आम्ही दुसऱ्या पक्षात प्रवेश करीत असल्याच्या फक्त अफवाच पसरविल्या जात आहेत. ओरोस येथे बुधवारी झालेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक ही नियोजित कार्यक्रमांसाठी होती. नारायण राणे यांना प्रदेशाध्यक्ष पदाची ऑफर दिल्याबद्दल मला काहीही कल्पना नाही असे नीतेश राणे यांनी येथे स्पष्ट केले.