शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

“एकनाथ शिंदेंना खुर्ची द्यायला नको, म्हणून तेव्हा उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपदच नाकारले”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 14:03 IST

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी घ्यायला हवी होती. मात्र, ती आशा फोल ठरली. पक्ष मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहिला, असा दावा करण्यात आला.

Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील नेते ठाकरे गटावर सडकून टीका करताना दिसत आहेत. यातच शिंदे गटातील खासदाराने २०१४ मधील एका घटनेची आठवण करून देत मोठा गौप्यस्फोट केल्याचे सांगितले जात आहे. 

सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असे उद्धव ठाकरे नेहमीच म्हणत असले, तरी २०१९ मध्ये सत्ता आल्यानंतर मात्र शिवसेनेचा सर्वांना अपेक्षित असलेला मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिले गेले नाही. २०१४ मध्ये तर उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंना द्यावे लागेल म्हणून पक्षाने ते स्वीकारलेच नाही, असा मोठा दावा शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही शिवसैनिक रस्त्यावर आणि त्याची झोळी रिकामीच राहिली, असे कीर्तीकर यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’, या स्वतःच्या राजकीय वाटचालीवर आधारित पुस्तक लिहिले असून त्यामध्ये हे सर्व दावे केले आहेत.

उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले, हे आश्चर्यजनक होते 

राज्यात २०२९ महाविकास आघाडीची सत्ता आली. यावेळी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला दिले, महत्त्वाची खाती मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला दिली. वास्तविक सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद देण्याची संधी असताना उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. हे काहीसे आश्चर्यजनक होते, असे सांगत स्वतः पक्षप्रमुख मुख्यमंत्री होते. शिवाय तीन पक्षांचे सरकार चालवण्याची कठीण कसरत तर होतीच. त्यामुळे संघटना बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे अशी कुजबूज संघटनेत सुरू होती. उद्धव ठाकरे नाहीत तर किमान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी तरी शिवसैनिकांना भेट द्यावी, अशी आशा असताना तीही फोल ठरली. आदित्यने संघटना बांधणीची सूत्रे हातात घेऊन राज्यभर फिरणे अपेक्षित असताना मंत्रिपद स्वीकारले. ज्याचा नकारात्मक परिणाम संघटनेवर झाला आणि पक्ष पुन्हा एकदा मोठ्या फुटीच्या उंबरठ्यावर उभा राहिला, असेही कीर्तीकर यांनी पुस्तकात म्हटले आहे.

दरम्यान, शिवसैनिकांची पक्षनेतृत्वाशी भेट होत नसताना एकनाथने शिवसैनिकाला आधार दिला. दरबारी मंडळी मात्र कायम एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कारस्थान रचत आली. २०१४ नंतर मिळणारे शिवसेनेच्या वाट्याचे उपमुख्यमंत्रिपद केवळ एकनाथ शिंदेंना द्यावे लागेल, या विचाराने ते पक्षाने स्वीकारलेच नाही. राजकारणात कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होतो आणि पक्ष मोठा झाला तर पक्षाचा नेता. याचा विसर दरबारी मंडळींना पडला, अशी टीका कीर्तीकरांनी पुस्तकातून केली आहे.  

 

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरShiv Senaशिवसेना