शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

शिवसेना पाठिंबा काढण्याच्या तयारीत!, ‘मोठा निर्णय’ होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 05:28 IST

आंध्रातील चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष राष्टÑीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्याने आता शिवसेनेच्या निर्णयाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (२० मार्च) ‘मातोश्री’वर पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.

- राजेश निस्तानेमुंबई : आंध्रातील चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष राष्टÑीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्याने आता शिवसेनेच्या निर्णयाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (२० मार्च) ‘मातोश्री’वर पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे. याबैठकीत ‘मोठा निर्णय’ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.२०१९ च्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सत्तेतून बाहेर पडून भाजपाविरोधात आणखी आक्रमकपणे रस्त्यावर उतरण्याचा शिवसेनेचा मनसुबा आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच ‘शिवालयात’ विभागनिहाय शिवसेना पदाधिकाºयांच्या बैठका घेतल्या. सत्तेतील सहभाग, भाजपाशी युती, पक्षाच्या मंत्री-आमदारांकडून मिळणारी वागणूक, होणारी कामे, नियुक्त्या, जनतेचे प्रश्न, पक्षसंघटन अशा विविध मुद्द्यांवर मते जाणून घेतली. सत्तेला लाथ मारून रस्त्यावर उतरत शिवसेनेने आपल्या मूळ रूपात यावे, यावर राज्यभरातून आलेल्या पदाधिकाºयांमध्ये एकमत असल्याचे दिसून आले.राष्टÑवादीचे तटस्थतेचे संकेतशरद पवार-राहुल गांधी भेटीने राज्यात आता राष्टÑवादी भाजपा सरकारच्या पाठीशी राहणार नाही, तटस्थ राहील असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे मंगळवारच्या बैठकीत शिवसेना निर्णयापर्यंत पोहोचण्याची व अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर भाजपा सरकारचा पाठिंबा काढला जाण्याची शक्यता शिवसेनेच्या गोटात वर्तविली जात आहे.आमदारांना रोखण्याचे आव्हानशिवसेनेने पाठिंबा काढल्यास भाजपाला संख्याबळाची जुळवाजुळव करावी लागणार आहे. सेनेच्या काही आमदारांना २०१९ च्या विजयाचे स्वप्न दाखवून जाळ्यात ओढण्याची भाजपाची व्यूहरचना आहे. शिवसेनेसाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच काठावरच्या २०-२२ आमदारांना शिवसेनेत रोखून धरण्याचे आव्हान पक्ष नेतृत्वापुढे राहणार आहे.>शिवसेनेच्या नाराजीची कारणेलोकसभेत भाजपाशी युती कायम ठेवून विधानसभेत स्वतंत्र लढावे. दोन्ही पक्षांनी आपल्या लोकसभेच्या जागा ‘जैसे थे’ ठेवून काँग्रेस-राष्टÑवादीच्या ताब्यातील जागांबाबत ‘चेंज’चा विचार करावा, असाही एक मतप्रवाह सेनेत आहे. शिवसेनेच्या खच्चीकरणाची एकही संधी भाजपाने सोडलेली नाही. सेनेचे मंत्री नाखूश आहेत. मंडळ, महामंडळ, सरकारी वकील, नोटरी, जिल्हा समित्यांवरीलही नियुक्त्या झालेल्या नाहीत.काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी सरकारमध्ये निधीचे समान वाटप व्हायचे. मात्र युती सरकारच्या बजेटमध्ये आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना निधी मिळत नसल्याचा सेनेचा आरोप आहे. सेनेच्या प्रत्येक आमदाराला दहा कोटींचा विकास निधी देण्याची सूचना उद्धव ठाकरेंनी केली होती. परंतु पुढे काहीच झाले नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे