शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा मुद्दा सोडण्यास शिवसेना तयार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 12:38 IST

महाशिवआघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेला देखील काही मुद्दांवर माघार घ्यावी लागणार असं चित्र आहे. आता या मसुद्यातील कोणकोणत्या मुद्दावर शिवसेना नरमाईची भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

मुंबई - राज्यात महाशिवआघाडी स्थापन होण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. सरकार स्थापन करण्यापूर्वीच 'कॉमन मिनिमन कार्यक्रम' आखण्यात आला असून त्याचा मसुदा तयार करण्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते काम करत आहे. याच मसुद्यातील एक बाब समोर आली असून शिवसेना आपली वि.दा. सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी गुंडाळण्याची शक्यता आहे. या संदर्भात जनसत्ता वेबसाईटवर वृत्त आहे. 

सावरकर यांच्याविषयी शिवसेना आणि काँग्रेस पक्षांत परस्पर विरोधी मत आहे. काँग्रेसनेतेराहुल गांधी यांनी सावकर यांच्या स्वातंत्र लढ्यातील भूमिकेवर अनेकदा शंका उपस्थित केलेली आहे. तर शिवसेनेकडून या मुद्दावर राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली असून सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी वारंवार करण्यात आलेली आहे. 

दरम्यान शिवसेना आता काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन कऱण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सावकरांच्या मुद्दावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या संदर्भातील मसुदा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते तयार करत आहेत. या मसुदा समितीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे असून मसुद्यात सावरकर यांना भारतरत्न मागणीचा मुद्दा सोडण्याची शिवसेनेने तयारी दाखवावी असा मुद्दा आहे. हा मसुदा तिन्ही पक्षांच्या हायकमांडकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

महाशिवआघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेला देखील काही मुद्दांवर माघार घ्यावी लागणार असं चित्र आहे. आता या मसुद्यातील कोणकोणत्या मुद्दावर शिवसेना नरमाईची भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.