शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा मुद्दा सोडण्यास शिवसेना तयार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 12:38 IST

महाशिवआघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेला देखील काही मुद्दांवर माघार घ्यावी लागणार असं चित्र आहे. आता या मसुद्यातील कोणकोणत्या मुद्दावर शिवसेना नरमाईची भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

मुंबई - राज्यात महाशिवआघाडी स्थापन होण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. सरकार स्थापन करण्यापूर्वीच 'कॉमन मिनिमन कार्यक्रम' आखण्यात आला असून त्याचा मसुदा तयार करण्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते काम करत आहे. याच मसुद्यातील एक बाब समोर आली असून शिवसेना आपली वि.दा. सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी गुंडाळण्याची शक्यता आहे. या संदर्भात जनसत्ता वेबसाईटवर वृत्त आहे. 

सावरकर यांच्याविषयी शिवसेना आणि काँग्रेस पक्षांत परस्पर विरोधी मत आहे. काँग्रेसनेतेराहुल गांधी यांनी सावकर यांच्या स्वातंत्र लढ्यातील भूमिकेवर अनेकदा शंका उपस्थित केलेली आहे. तर शिवसेनेकडून या मुद्दावर राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यात आली असून सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी वारंवार करण्यात आलेली आहे. 

दरम्यान शिवसेना आता काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन कऱण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सावकरांच्या मुद्दावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या संदर्भातील मसुदा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते तयार करत आहेत. या मसुदा समितीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे असून मसुद्यात सावरकर यांना भारतरत्न मागणीचा मुद्दा सोडण्याची शिवसेनेने तयारी दाखवावी असा मुद्दा आहे. हा मसुदा तिन्ही पक्षांच्या हायकमांडकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

महाशिवआघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेला देखील काही मुद्दांवर माघार घ्यावी लागणार असं चित्र आहे. आता या मसुद्यातील कोणकोणत्या मुद्दावर शिवसेना नरमाईची भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.