शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने पाळला युतीचा धर्म

By admin | Updated: October 8, 2016 04:32 IST

आगामी निवडणुकीत भाजपाला युतीमध्ये स्वारस्य नसले तरी शिवसेना मात्र इच्छुक असल्याची चिन्हे आहेत़

मुंबई : आगामी निवडणुकीत भाजपाला युतीमध्ये स्वारस्य नसले तरी शिवसेना मात्र इच्छुक असल्याची चिन्हे आहेत़ त्यामुळेच अखेर बराच वेळ काढल्यानंतर शिवसेनेने विकास नियोजन आराखड्याच्या आढावा समितीमध्ये मित्रपक्षाची वर्णी लावली आहे़ मात्र शिवसेनेच्या या भूमिकेमुळे नाराज विरोधी पक्षाने सभात्याग केला़ याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे़२०१४ ते २०३४ या २० वर्षांसाठी पालिकेचे नियोजन करण्यात आले आहे़ हा विकास नियोजन आराखडा वादग्रस्त ठरल्यामुळे सुधारित आराखडा तयार करण्यात आला़ या सुधारित आराखड्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या़ या हरकती व सूचनांचा आढावा घेण्यासाठी समिती नेमायची होती, यापैकी चार सदस्य राज्य सरकारचे आणि तीन सदस्य महापालिकेमधील असणार आहेत़ या समितीवर आपली वर्णी लागावी, यासाठी काँग्रेस पक्ष आग्रही होते़युतीमध्ये फूट पडल्यामुळे विरोधी पक्षाचीच निवड या समितीवर होईल, असा अंदाज होता़ मात्र शिवसेनेने हा विषय बराच काळ लांबणीवर टाकला़ अखेर ही समिती नेमण्याच्या अखेरच्या दिवशी महापौर स्नेहल आंबेकर यांनी या समितीवर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव आणि तिसरा सदस्य म्हणून भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांचे नाव जाहीर केले़ यावर काँगे्रस पक्षाने आक्षेप घेतला आहे़ (प्रतिनिधी)>यामुळे निर्माण झाला तिढातिसरा सदस्य कोण असावा, याबाबत पालिका अधिनियम १८८८ तसेच मुंबई प्रादेशिक आणि शहर नियोजन कायदा १९६६ मध्ये काहीच स्पष्ट करण्यात आलेले नाही़ एमआरटीपी कायद्यानुसार नियोजन समितीमध्ये स्थायी समितीचे तीन सदस्य असावे, एवढेच नमूद करण्यात आले आहे़>काँग्रेस न्यायालयात जाणारया नियुक्तीला विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी आव्हान दिले आहे़ ही नियुक्ती अपारदर्शक आहे़ तिन्ही सदस्य युतीचे नगरसेवक आहेत़ त्यामुळे भविष्यात नियोजन समितीच्या कामाबाबत शंका उपस्थित झाल्यास, विकास आराखड्यात त्रुटी आढळून आल्यास किंवा चुका असल्यास यास शिवसेना-भाजपा जबाबदार असेल़ या निवडीविरोधात काँग्रेस पक्ष न्यायालयात जाणार, असे विरोधी पक्षनेता प्रवीण छेडा यांनी सांगितले़>अशी होती अडचण : सत्तेवर एकत्रित असूनही गेल्या वर्षभरात शिवसेना-भाजपामधील संबंध बिघडले आहेत़ विकास नियोजन आराखड्यांमधील तरतुदीवरही शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती़ स्थायी समितीच्या नियोजन समितीच्या माध्यमातून शिवसेनेला आराखड्यातील काही तरतुदींवर बदल करणे शक्य होणार आहे़ भाजपाचा सदस्य असल्यास त्यात अडचणीत येऊ शकतात़ त्याचवेळी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी आपल्याला सदस्य म्हणून घ्यावे, यासाठी दबावतंत्र सुरू ठेवले होते़>अखेर शिवसेनेचा नाइलाजया अडचणीतून आपली सुटका करून घेण्यासाठी महापौरांनी आयुक्तांना पत्र लिहून या समितीवर सर्व गटनेत्यांना संधी देण्याची मागणी केली होती़ मात्र अशी तरतूद करण्यासाठी अवधी कमी असून लवकरात लवकर सदस्यांची नावे जाहीर करा, असे आयुक्तांनी कळविले होते़ त्यामुळे नाइलाजास्तव शिवसेनेला निर्णय घ्यावा लागला़