शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

शिवसेनेमुळे मुंबई गटारात !

By admin | Updated: July 7, 2016 04:14 IST

मुंबईतील रस्त्यांची, गटारांची दुरवस्था कुणामुळे झाली, असा थेट सवाल करत आज काही पक्ष ‘प्रायव्हेट लिमिटेड’ बनले आहेत, पण भाजपा हा कुणा एकाच्या मालकीचा पक्ष नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईतील रस्त्यांची, गटारांची दुरवस्था कुणामुळे झाली, असा थेट सवाल करत आज काही पक्ष ‘प्रायव्हेट लिमिटेड’ बनले आहेत, पण भाजपा हा कुणा एकाच्या मालकीचा पक्ष नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडत मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.षण्मुखानंद सभागृहात भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई शहरासाठी सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाचा पाढा वाचत शिवसेनेला चिमटे घेतले. ते म्हणाले, युतीचं काय होणार याबाबत माध्यमात चर्चा आहे. पण तुम्ही त्यात अडकू नका. तुम्ही फक्त बुथ सांभाळा, युतीचं आम्ही बघून घेऊ. मुंबईसाठी कोणी काय केले हे सर्वांनाच माहिती आहे. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, एलिव्हेटेड रेल्वे, मेट्रोचे जाळे, लोकल-मेट्रो-बेस्ट अशी एकीकृत प्रवास योजना आणि स्वस्त घरांसाठी केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने धडाडीने निर्णय घेतले. मागील युती सरकारच्या काळात नितीन गडकरी यांनी मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधून मुंबईचा चेहरामोहरा बदलला. सरकारने मुंबईच्या विकासासाठी ब्ल्यू-प्रिंट तयार केली आहे. यातून मुंबईकरांच्या रोजच्या हालअपेष्टांतून सुटका करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या मेळाव्याच्या प्रारंभी कार्यकर्त्यांनी शत-प्रतिशत भाजपाच्या घोषणा देत मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला. (प्रतिनिधी)आशिष शेलार पुन्हा मुंबई भाजपाध्यक्षपदीमुंबई भाजपा शहराध्यक्षपदी आमदार आशिष शेलार यांची फेरनियुक्ती करण्यात आली. अलीकडच्या काळात भाजपा आणि शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. शिवाय, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ९ जुलै रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री युतीबाबत काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. राक्षसाला मोठे करू नका ! मेळाव्यात आशिष शेलार यांनी राक्षसाची गोष्ट सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना चक्क राक्षसाशी केली. ते म्हणाले, या राक्षसावर टीका करून त्याला मोठे करू नका. बाटलीतच बंद ठेवा. शेलार यांच्या या टीकेवर शिवसेनेकडून शेलके प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे समजते.मुख्यमंत्री म्हणाले... ट्रान्स हार्बर लिंक रोडसाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. आॅक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करू. आमच्याकडे २५ लाखांत बंगला बांधला जातो. मुंबईत मात्र सामान्य माणसाच्या घराची किंमतच ५० लाख आहे. सामान्य मुंबईकराला १५-२० लाखात घर मिळायला हवे. त्यासाठी मुंबईतील भूखंड मोकळे करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. मात्र, या जागेवर केवळ सामान्यांची घरे उभे राहतील.