शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

शिवसेनेमुळे मुंबई गटारात !

By admin | Updated: July 7, 2016 04:14 IST

मुंबईतील रस्त्यांची, गटारांची दुरवस्था कुणामुळे झाली, असा थेट सवाल करत आज काही पक्ष ‘प्रायव्हेट लिमिटेड’ बनले आहेत, पण भाजपा हा कुणा एकाच्या मालकीचा पक्ष नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईतील रस्त्यांची, गटारांची दुरवस्था कुणामुळे झाली, असा थेट सवाल करत आज काही पक्ष ‘प्रायव्हेट लिमिटेड’ बनले आहेत, पण भाजपा हा कुणा एकाच्या मालकीचा पक्ष नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडत मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.षण्मुखानंद सभागृहात भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई शहरासाठी सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाचा पाढा वाचत शिवसेनेला चिमटे घेतले. ते म्हणाले, युतीचं काय होणार याबाबत माध्यमात चर्चा आहे. पण तुम्ही त्यात अडकू नका. तुम्ही फक्त बुथ सांभाळा, युतीचं आम्ही बघून घेऊ. मुंबईसाठी कोणी काय केले हे सर्वांनाच माहिती आहे. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, एलिव्हेटेड रेल्वे, मेट्रोचे जाळे, लोकल-मेट्रो-बेस्ट अशी एकीकृत प्रवास योजना आणि स्वस्त घरांसाठी केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने धडाडीने निर्णय घेतले. मागील युती सरकारच्या काळात नितीन गडकरी यांनी मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधून मुंबईचा चेहरामोहरा बदलला. सरकारने मुंबईच्या विकासासाठी ब्ल्यू-प्रिंट तयार केली आहे. यातून मुंबईकरांच्या रोजच्या हालअपेष्टांतून सुटका करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या मेळाव्याच्या प्रारंभी कार्यकर्त्यांनी शत-प्रतिशत भाजपाच्या घोषणा देत मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला. (प्रतिनिधी)आशिष शेलार पुन्हा मुंबई भाजपाध्यक्षपदीमुंबई भाजपा शहराध्यक्षपदी आमदार आशिष शेलार यांची फेरनियुक्ती करण्यात आली. अलीकडच्या काळात भाजपा आणि शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. शिवाय, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ९ जुलै रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री युतीबाबत काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. राक्षसाला मोठे करू नका ! मेळाव्यात आशिष शेलार यांनी राक्षसाची गोष्ट सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना चक्क राक्षसाशी केली. ते म्हणाले, या राक्षसावर टीका करून त्याला मोठे करू नका. बाटलीतच बंद ठेवा. शेलार यांच्या या टीकेवर शिवसेनेकडून शेलके प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे समजते.मुख्यमंत्री म्हणाले... ट्रान्स हार्बर लिंक रोडसाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. आॅक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करू. आमच्याकडे २५ लाखांत बंगला बांधला जातो. मुंबईत मात्र सामान्य माणसाच्या घराची किंमतच ५० लाख आहे. सामान्य मुंबईकराला १५-२० लाखात घर मिळायला हवे. त्यासाठी मुंबईतील भूखंड मोकळे करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. मात्र, या जागेवर केवळ सामान्यांची घरे उभे राहतील.