शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जुलैमध्ये शिवसेना भूकंप करणार- संजय राऊत

By admin | Updated: June 10, 2017 16:34 IST

जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 10- ज्या सरकारच्या राज्यात शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात, असं सरकार काय कामाचं? असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. गेल्या तीन वर्षामध्ये साडेचार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे. तरिही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का दिली जात नाही ? असा प्रश्नही संजय राऊत यांनी विचारला आहे. तसंच जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यातला लढा महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. नाशिकमधील शिवसेनेच्या संपर्क अभियानात संजय राऊत बोलत होते. आपली लढाई आता मित्रपक्षासोबत आहे, असंही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.  
 
भाजपकडून  शिवसेनेला संपवण्यासाठी  अनेक चाली खेळल्या जात आहेत, पण तसं होणार नाही. जुलै महिन्यात आपल्या अस्तित्त्वासाठी आपण सर्वात मोठी लढाई लढणार आहोत. असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 
तसंच समृद्धी महामार्गावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ओरबाडल्या जात आहेत. पण समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे. तसंच शिवसेनेला कर्जमाफी नको तर सरसकट कर्जमुक्ती हवी आहे, त्यामुळे शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभी राहणार आहे, असंही या कार्यक्रमात संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं आहे. 
 
मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीसंदर्भात जी उच्चाधिकार समिती नेमली आहे त्यात दिवाकर रावते सहभागी होणार आहेत. या बैठकीत सहभागी होऊन ते शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडतील, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. जुलै महिन्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्रात शिवसेनेचे मोठे आंदोलन  होणार आहे. असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
 नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही संजय राऊत यांनी झापलं असल्याची माहिती मिळते आहे. नाशिकमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिवसेनेचे किती पदाधिकारी होते? तुम्ही पदाधिकारी म्हणून मिरवता आहात का? या प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरेंना द्यायची तयारी ठेवा असंही संजय राऊत सेना पदाधिकाऱ्यांना खडसावून सांगितल्याचं बोललं जात आहे. 
येत्या जुलैमध्ये शिवसेनेकडून नेमका काय भूकंप होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.