शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Maharashtra Politics: “शहाजीबापू, पुन्हा मातोश्रीवर चला, उद्धव ठाकरेंना सांगून चांगली खुर्ची देतो”; खैरेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 19:26 IST

एकनाथ शिंदेंपेक्षा आदित्य ठाकरेंच्या सभेला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे.

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच पैठण दौऱ्यावर होते. पैठण येथील एका सभेला एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदार आणि भाजप नेतेही उपस्थित होते. या सभेत एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीकडून केल्या जात असलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. यावेळी शहाजीबापू पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी शिवसेना आणि मविआवर सडकून टीकाही केली. यानंतर आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर पलटवार करताना, शहाजीबापू पाटील यांना मातोश्रीवर परतण्याचे आवाहन केले आहे.  पैठण येथे झालेल्या सभेला पैठण मतदारसंघातील २५ टक्के लोकंही नव्हते. ७५ टक्के लोकं बाहेरून आणलेले होते. याबाबतच पुरावेही देऊ शकतो. शिवसेना प्रमुखांचाच विचार पुढे घेऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जात आहेत. शिंदे यांच्या सभेपेक्षा तर आदित्य ठाकरेंच्या सभेला आणि दौऱ्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला. तसेच सभेला उत्तर म्हणून पुन्हा सभा न घेता आता गावागावात जाऊन प्रचार, प्रसार आणि जनजागृती करणार असल्याचा प्लान खैरे यांनी सांगितला. 

मी ओरिजिनल, गेलो की वातावरण बदलतच

आता पैठण आणि आजूबाजूच्या परिसरात जाऊन संवाद यात्रा काढणार आहे. तसेच मी ओरिजिनल असून, स्वतः गेलो की, वातावरण बदलतच, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, शहाजीबापू पाटील यांनी आपल्या भाषणात खैरे आणि दानवे यांच्यावर टीका करताना, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासाठीही या ठिकाणी दोन खुर्च्या टाकायला हव्या होत्या, जेणेकरून सभेला गर्दी म्हणजे नेमके काय असते, ते समजले असते, असा खोचक टोला लगावला होता. याला उत्तर देताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, ही झाडी, हे डोंगर, हे फलाना याला काही अर्थ नाही. ते तात्पुरते आहे. काही दिवस चालणार. शहाजी बापू यांचे उद्धव ठाकरेंविषयीचे मत चांगले आहे. मात्र, त्यांना एवढेच सांगेन की, मला किंवा दानवेंना खुर्ची ठेवायचे सोडा. पुन्हा मातोश्रीवर चला. उद्धव ठाकरेंना सांगून तुम्हाला चांगली खुर्ची देतो, असे आवाहन खैरे यांनी केले. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी लहानपणापासूनच मोठे कष्ट उपसले आहेत. महाबळेश्वरच्या डोंगरातील, कोयना धरणाच्यावरली शेती ही तुमच्या-माझ्यासारखी नाही. त्या शेतीत बैलं चालत नाहीत, तिथे कुळव माणसानेच ओढायचा असतो, नांगुर सुद्धा माणसाचे धरायचा असतो. शिंदेसाहेबांनी स्वत: नांगुर ओढलाय. खांद्यावर दावं घेऊन कुळवं ओढलाय, चिखलात पाय बुडवून खाकी चड्डीवर भाताची रोप पेरल्याती, एवढं कष्ट करुनसुद्ध संसार चालत नाही म्हणून ते ठाण्याला गेले. तेथे धर्मवीर आनंद दिघेंच्या आशीर्वादाने रिक्षा चालवायला सुरु केली. रात्रं-दिवस रिक्षा चालवून घराचा प्रपंच केला. म्हणूनच, एकनाथ शिंदे दिवसरात्र जागून काम करत आहेत. ज्या माणसाचे जीवनच जनतेच्या हितासाठी समर्पित झालेय, तो माणूस झोपणार नाही, असे म्हणत शहाजीबापू पाटीलांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळली. 

टॅग्स :Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv Senaशिवसेना