शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कार!

By admin | Updated: June 8, 2017 06:24 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना चर्चेला बोलावता आणि आम्हाला सांगतही नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्जमाफीचा निर्णय जाहीर करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना चर्चेला बोलावता आणि आम्हाला सांगतही नाहीत, असा त्रागा करत शिवसेना मंत्र्यांनी बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर भाजपा आमदारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. शिवसेनेला बाहेरचा मार्ग दाखवा, गरज पडली तर मध्यावधी निवडणुका घ्या, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणणे सुरू केले आहे.सत्तेची फळे चाखताना ‘हम साथ साथ है’ असे म्हणायचे आणि बाहेर पडले की ‘हम आपके है कौन?’ म्हणत आमच्याकडेच बोट दाखवायचे, हे वागणे शेतकऱ्यांना चांगलेच कळते, अशा शब्दांत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले.मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी शिवसेनेचे मंत्री आले, पण त्यांचा सगळा रोख कर्जमाफीची मागणी आम्हीही केली असताना, घोषणा करताना आम्हाला का बोलावले नाही? यावरच होता. तुम्ही आणि आम्ही दोघेही एकच मागणी करत होतो, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे. पण ती कोणत्या शेतकऱ्यांना कशी द्यायची याची चर्चा आपण सगळे मिळून करू, असे मुनगंटीवार बैठकीत म्हणाले. बहिष्कार टाकून चर्चा कशी होऊ शकते? तुम्हाला काय हवे आहे ते बसून चर्चा करू, त्यानुसार नियोजन करू, असेही ते म्हणाले. पण एकच एक मुद्दा सेनेचे मंत्री मांडत राहिले.श्रेय घेण्यासाठी काय अडून बसता. अशा कोणत्याही श्रेयाची ‘एक्सपायरी डेट’ एक वर्षापेक्षा अधिक राहात नाही. उरलेली अडीच वर्षे हे सरकार चालणार आहे, असे खडे बोल भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने बैठकीत ऐकवले. त्यानंतर आम्हाला आता बैठकीत बसायचे नाही, असे सांगून शिवसेनेचे मंत्री बाहेर पडले.लोकमतशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, जीएसटीच्या वेळीही आपण स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो, आता सेनेच्या मनात काय चालू आहे हे समजण्याएवढे आम्ही मनकवडे नक्कीच नाही, असा चिमटाही मुनगंटीवार यांनी काढला. या सगळ्यावर शिवसेनेचा एकही मंत्री बोलायला तयार नाही. उद्धव ठाकरे सुटीसाठी युरोपात गेले आहेत. १२ तारखेला ते परत आल्यानंतर चर्चा करून आम्ही बोलू, असे काहींनी खासगीत सांगितले. त्यानंतरच शेतकरी संपाबद्दल शिवसेनेची भूमिका स्पष्ट होणार असली तरीही, खा. संजय राऊत यांनी बुधवारीच पडद्यआड बऱ्याच हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.>बसून चर्चा करणे अपेक्षितजी मागणी शिवसेना करत होती, त्याच कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली असताना बहिष्कार टाकण्याचे कारणच काय? उलट त्यांनी बसून चर्चा करणे अपेक्षित होते, मात्र काही महत्त्वाचे विषय नाहीत, म्हणून आम्ही बैठकीत बसणार नाही, असे मुख्यमंत्र्यांना सांगून सेनेचे मंत्री बैठकीतून गेले. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी द्यायची याची चर्चा करण्यापेक्षाही त्यांना कदाचित आणखी महत्वाची कामे असतील, असेही मुनगंटीवार म्हणाले.