शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नाराज, दोन्ही काँग्रेसची टीका

By admin | Updated: March 19, 2015 01:33 IST

मुंबईवर शिवसेनेचा वरचष्मा असल्यानेच राज्यातील भाजपा सरकारने मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेनेने केला आहे,

मुंबईच्या तोंडाला पाने : ग्रामीण जनतेवर बोजामुंबई : मुंबईवर शिवसेनेचा वरचष्मा असल्यानेच राज्यातील भाजपा सरकारने मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसली असल्याचा सनसनाटी आरोप शिवसेनेने केला आहे, तर एलबीटीला पर्याय म्हणून व्हॅट लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लोकांवर बोजा पडणार असल्याने हा मुद्दा जिल्हा परिषदा, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राजकीय मुद्दा म्हणून तापवण्याची तयारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे.राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबई महापालिका उभारत असलेला कोस्टल रोड, जीर्ण बीडीडी चाळी, गिरणी कामगारांची घरे, म्हाडाच्या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेतील वसाहती यांच्याकरिता कुठलीही तरतूद केलेली नाही, याकडे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले. मुंबईवर शिवसेनेचा वरचष्मा असल्यानेच हेतूत: भाजपाने अर्थसंकल्पात कानाडोळा केल्याचा आरोप वरळीतील शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केला. शिंदे म्हणाले की, मुंबईतील जनतेने आम्हाला निवडून दिले. सध्या राज्यातील सत्तेत आम्ही दुय्यम भूमिकेत बसलो असलो तरी मुंबईकरांना भाजपा सरकारने अर्थसंकल्पात काहीही दिलेले नाही. जुन्या बीडीडी चाळी किंवा म्हाडा वसाहतीमधील लोक पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. महापालिका कोस्टल रोड उभारत असली तरी त्याबाबत काही घोषणा अपेक्षित होती. कोळीवाड्यांच्या विकासावर सरकार मूग गिळून बसले आहे. राज्य सरकार आपले गृहनिर्माण धोरण जाहीर करणार असले तरी त्याबाबतचे सूतोवाच व तशी तरतूद अर्थसंकल्पात हवी होती. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. शेलार म्हणाले की, मुंबईतून भाजपाचे १५ तर शिवसेनेचे १४ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मुंबई शिवसेनेची नव्हे तर भाजपाची आहे. राज्य सरकारने मुंबईबाबत सरकारने काही निर्णय घेतला तर महापालिकेच्या अधिकारावर गदा आणल्याचा गळा काढायचा आणि अर्थसंकल्पात निधी दिला नाही म्हणूनही रडगाणे गायचे ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी असल्याचे भासवण्याचा हा शिवसेनेचा प्रयत्न आहे. अर्थसंकल्पात मुंबईत येणाऱ्या पर्यटकांकरिता, एसटी डेपोंच्या नुतनीकरणाकरिता आणि मौलाना आझाद विकास महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक विकासाकरिता निधी दिल्याचा बचाव शेलार यांनी केला. भाजपा-शिवसेना या सत्ताधारी मंडळींमध्ये तरतुदींवरून वाद पेटला असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने एलबीटीला पर्याय म्हणून व्हॅट लागू करण्याचा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापवण्याचे ठरवले आहे. शहरी महापालिकांमधील एलबीटी रद्द करताना त्यामुळे महापालिकांना द्यावे लागणारी रक्कम ग्रामीण भागातील जनतेवरही व्हॅट लागू करुन वसूल केली जाणार असल्याने त्याला दोन्ही काँग्रेस विरोध करणार आहेत. २०१५ वर्षी राज्यातील १४ हजार ५०० ग्रामपंचायतींच्या निवडणुका असून लागलीच तीन जिल्हा परिषदांची निवडणूकही आहे. भाजपा सरकारने शहरातील लोकांकरिता ग्रामीण भागातील लोकांवर कराचा बोजा लादला, असा प्रचार या निवडणुकीत विरोधक करणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)विरोधकांचे टीकास्त्रभाजपा सरकारने शहरातील लोकांकरिता ग्रामीण भागातील लोकांवर कराचा बोजा लादला, असा प्रचार या निवडणुकीत विरोधक करणार आहेत. व्हॅटमुळे ग्रामीण जनतेवर भार पडेल हे माहीत असल्यानेच काँग्रेसने आपल्या राजवटीत एलबीटीला पर्याय म्हणून व्हॅट लागू केला नव्हता, याकडे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील व राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी लक्ष वेधले.