शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

शिवसेना मुख्यमंत्र्यांवर नाराज

By admin | Updated: September 30, 2015 02:10 IST

राज्यातील औद्योगिक विकास क्षेत्रात उद्योग उभारण्याकरिता संबंधित महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांची परवानगी लागणार नाही हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संदीप प्रधान, मुंबईराज्यातील औद्योगिक विकास क्षेत्रात उद्योग उभारण्याकरिता संबंधित महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांची परवानगी लागणार नाही हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास विभागाने आणलेला व मंत्रिमंडळाने मंजूर केलेला निर्णय शिवसेनेला रुचलेला नाही. महापालिकांच्या अधिकारावर अतिक्रमण करणाऱ्या या निर्णयाचा फेरविचार व्हावा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आला तेव्हा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नगरविकास विभागाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला नाही. मात्र पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विरोध केला, असे समजते. मागील सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकारांवर अतिक्रण केले तेव्हा शिवसेनेने विरोध केला होता. आपले सरकारही त्याच चुकीच्या परंपरेचे अनुकरण करणार आहे का? आता उद्योग खाते हे शिवसेनेकडे असले तरीही महापालिकेच्या अधिकारावरील अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. अशा धोरणात्मक निर्णयांबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय व्हायला हवेत, असेही कदम मंत्रिमंडळ बैठकीत बोलल्याचे समजते. ठाकरे यांच्या कानावर हे सर्व घातल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितल्याचेही शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने स्पष्ट केले.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, उद्योगांना दुहेरी परवानगी घ्यावी लागत होती. ती या निर्णयामुळे घ्यावी लागणार नाही. मुंबईतील मरोळ येथील औद्योगिक वसाहत केवळ महापालिका हद्दीत असून तेथील भूखंडाचे पूर्ण वितरण झाले आहे. पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, नाशिक येथील औद्योगिक वसाहती महापालिका हद्दीत आहेत. तेथे यापुढे महापालिकेची परवानगी लागणार नाही. सरकारने निर्णय घेऊन किमान १५ दिवस उलटले आहेत. शिवाय नगरपालिका व महाराष्ट्र महापालिका कायद्यात अशीच दुरुस्ती फेब्रुवारी महिन्यात सरकारने केलेली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका कायद्यात बदल झाल्यावरच शिवसेनेकडून विरोध का सुरु झाला, असा सवाल केला जात आहे. याबाबत नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मेक इन महाराष्ट्र व इज आॅफ डुईंग बिझनेस या सरकारच्या दोन भूमिकांना अनुसरून हा निर्णय घेतला आहे. उद्योगांना लागणाऱ्या परवानग्या कमी करण्यास या निर्णयाने हातभार लागणार आहे.