शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

शिवसेना मुख्यमंत्र्यांवर नाराज

By admin | Updated: September 30, 2015 02:10 IST

राज्यातील औद्योगिक विकास क्षेत्रात उद्योग उभारण्याकरिता संबंधित महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांची परवानगी लागणार नाही हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संदीप प्रधान, मुंबईराज्यातील औद्योगिक विकास क्षेत्रात उद्योग उभारण्याकरिता संबंधित महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांची परवानगी लागणार नाही हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास विभागाने आणलेला व मंत्रिमंडळाने मंजूर केलेला निर्णय शिवसेनेला रुचलेला नाही. महापालिकांच्या अधिकारावर अतिक्रमण करणाऱ्या या निर्णयाचा फेरविचार व्हावा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव आला तेव्हा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नगरविकास विभागाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला नाही. मात्र पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विरोध केला, असे समजते. मागील सरकारने एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकारांवर अतिक्रण केले तेव्हा शिवसेनेने विरोध केला होता. आपले सरकारही त्याच चुकीच्या परंपरेचे अनुकरण करणार आहे का? आता उद्योग खाते हे शिवसेनेकडे असले तरीही महापालिकेच्या अधिकारावरील अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. अशा धोरणात्मक निर्णयांबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय व्हायला हवेत, असेही कदम मंत्रिमंडळ बैठकीत बोलल्याचे समजते. ठाकरे यांच्या कानावर हे सर्व घातल्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना या निर्णयाचा फेरविचार करण्यास सांगितल्याचेही शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने स्पष्ट केले.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, उद्योगांना दुहेरी परवानगी घ्यावी लागत होती. ती या निर्णयामुळे घ्यावी लागणार नाही. मुंबईतील मरोळ येथील औद्योगिक वसाहत केवळ महापालिका हद्दीत असून तेथील भूखंडाचे पूर्ण वितरण झाले आहे. पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, नाशिक येथील औद्योगिक वसाहती महापालिका हद्दीत आहेत. तेथे यापुढे महापालिकेची परवानगी लागणार नाही. सरकारने निर्णय घेऊन किमान १५ दिवस उलटले आहेत. शिवाय नगरपालिका व महाराष्ट्र महापालिका कायद्यात अशीच दुरुस्ती फेब्रुवारी महिन्यात सरकारने केलेली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका कायद्यात बदल झाल्यावरच शिवसेनेकडून विरोध का सुरु झाला, असा सवाल केला जात आहे. याबाबत नगरविकास विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मेक इन महाराष्ट्र व इज आॅफ डुईंग बिझनेस या सरकारच्या दोन भूमिकांना अनुसरून हा निर्णय घेतला आहे. उद्योगांना लागणाऱ्या परवानग्या कमी करण्यास या निर्णयाने हातभार लागणार आहे.