शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

"शिवसैनिकांना खोट्या केसेसला सामोरं जावं लागणार नाही, जर असं झालं तर.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 09:17 IST

मध्यरात्रीचे २ वाजले तरी कुणाच्या चेहऱ्यावर आळस नाही, उत्साह आहे. सकाळी टीव्हीवर बघणाऱ्यांनी बघावं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.  

मुंबई - गेली अडीच वर्ष शिवसैनिक कसा राहिला, कसा वागला, कसं चाललं त्याचं याचा विचार कुणी केला. आता आपलं सरकार आहे. शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही. शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागू देणार नाही. शिवसैनिकांना खोट्या केसेसला सामोरं जावं लागणार नाही. जर असं काही उदाहारण तुमच्या नजरेस आले तर संबंधित अधिकारी त्या जागेवर राहणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्भित इशारा दिला आहे. 

शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सर्वसामान्य माणसांचे जीवन बदललं पाहिजे. हे सरकार माझं आहे हे सर्वांना वाटलं पाहिजे अशाप्रकारे काम आपल्याला करायचं आहे. शेवटी हे शिवसैनिक बाळासाहेबांचे सैनिक आहोत. बाळासाहेबांनी सांगायचं, दिघेसाहेबांनी सांगायचे ते आम्ही करायचो. ही परंपरा जपणारे आम्ही आहोत. जे टिंगळटवाळ्या करतात त्यांना करू द्या असं त्यांनी सांगितले. 

संजय राऊतांना टोलाहे सरकार बेकायदेशीर आहे. शपथ घेतली तर घटनाबाह्य आहे असं सांगत बसलेत. सुप्रीम कोर्टानं त्यांच्या मागण्या फेटाळून लावल्या घटनापीठ बसवून सुनावणी करणार आहे. बाहेर येऊन विजय आपलाच झाला असा दिंडोरा पिटत आहेत. आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. घटनेनुसार कायद्याच्या बाहेर जाता येत नाही. आपलं सरकार स्थिर आहे. १६५ मतांनी बहुमत चाचणी पार केली आहे. त्यांचे ९९ आहेत. आणखी पुढे बघा काय काय होतं. आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे. प्रगतीपथावर न्यायचं आहे. या राज्याचा विकास करण्याचं ध्येय आपण समोर ठेऊन काम करतोय. मध्यरात्रीचे २ वाजले तरी कुणाच्या चेहऱ्यावर आळस नाही, उत्साह आहे. सकाळी टीव्हीवर बघणाऱ्यांनी बघावं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.  

तसेच आम्ही घेतलेला निर्णय हा शिवसेनेला, शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आहे. हा निर्णय लोकांनी मान्य केला आहे. जेव्हापासून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हापासून शेकडो लोकं पाठिंबा द्यायला येतायेत. आम्ही रक्ताचं पाणी करून, जिवाचं रान करून, कष्ट घेऊन शिवसेना वाढवली. जे बोलतात त्यांच्या अंगावर किती केसेस आहेत? आम्ही जेल भोगलीय. १०० हून अधिक केसेस अंगावर घेतल्यात असं शिंदे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना