शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिंदे गटाच्या नेत्याने सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य; म्हणाले, “सगळा पक्ष भाजप...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 19:59 IST

Sharad Pawar: राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे शरद पवार यांनी निवृत्ती घेतली, असा दावा करण्यात आला आहे.

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होत निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल, याबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तसेच यासंदर्भात राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. 

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा आणि त्यानंतरच्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीतील अंतर्गत कलहामुळे शरद पवार यांनी राजीनामा दिला. शरद पवारांनी घेतलेला हा निर्णय विचारअंती घेतलेला आहे. भाकरी फिरवायची सुरूवात पवारांनी स्वतःपासून केली आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. 

भविष्यात राष्ट्रवादीत प्रचंड मोठे बदल होणार

आता भविष्यात राष्ट्रवादीत प्रचंड मोठे बदल होणार असल्याचा दावा संजय शिरसाट यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस आता आली तर पूर्ण राष्ट्रवादी भाजपासोबत येईल त्यातील एखादा गट येईल असे वाटत नाही, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे. आमच्या विचारांशी राष्ट्रवादीने जुळवण घेतले तर आम्ही स्वागतच करू. संजय राऊत हे पक्ष तोडण्यासाठी काम करत असतात. शिवसेना पक्ष खरे तर संजय राऊतांनी संपवला. राष्ट्रवादी संपवण्याचाही प्रयत्न त्यांनीच केला, असा आरोप संजय शिरसाट यांनी केला. तसेच जयंत पाटील आणि अजित पवार मोठे नेते आहेत. त्यामुळे अंतर्गत प्रश्नावर आपल्यासारख्या लोकांनी काही बोलणे योग्य नाही, असे संजय शिरसाट म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडी ही आता संपलेली आहे. ही आघाडी आता राहिलेली नाही तरीही याआधी घेतलेल्या सभा या उद्धव ठाकरे गटाने ओढलेल्या सभा होत्या, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Shirsatसंजय शिरसाटSanjay Sirsatसंजय सिरसाट