शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Maharashtra Politics: “महाविकास आघाडीच्या महामोर्चाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण...”: राहुल शेवाळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 16:26 IST

Maharashtra News: उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर जात आहेत, असे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics:महाविकास आघाडीच्या वतीने १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येत आहे. या महामोर्चाचा एक टीझरही काढण्यात आला आहे. यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड आणि चंद्रकांत पाटील यांची वादग्रस्त विधाने दाखवण्यात आली आहेत. महापुरुषांचा अवमान सहन तरी किती करायचा? अशी विचारणा या माध्यमातून शिंदे-फडणवीस सरकारला करण्यात आली आहे. यातच या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी या महामोर्चाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. 

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. अडीच वर्षात जे मुद्दे पुर्ण झालेले नाहीत तेच मुद्दे या महामोर्चात आहेत. महाविकास आघाडीच्या काळात जर हे मुद्दे पुर्ण झाले असते तर हा महामोर्चा काढण्याची वेळ आली नसती, असा टोला राहुल शेवाळे यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षात या विषयांना न्याय दिला असता तर भाजप-शिंदे गटाची युती झाली नसती, असे नमूद करत, उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर जात असल्याची खंत राहुल शेवाळे यांनी यावेळी व्यक्त केली.

मविआच्या महामोर्चाला रस्त्यावर उतरुन उत्तर देणार 

मविआकडून आयोजित केलेल्या मोर्चाला भाजपाही रस्त्यावर उतरुन उत्तर देणार आहे. महापुरुषांच्या अपमानावर बोलणारे उद्धव ठाकरे सुषमा अंधारेंनी वारकऱ्यांच्या अपमानाबाबत गप्प का आहेत? तसंच संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानाचा चुकीचा उल्लेख केला. त्याबाबत काही बोलणार आहात का? आता आम्हीही 'मविआ'ला रस्त्यावर उतरुनच उत्तर देऊ. उद्या मुंबई भाजपाकडून ठिकठिकाणी 'माफी मांगो' आंदोलन केले जाईल. मविआच्या मोर्चाला काळे झेंडे दाखवले जातील. मुंबईतील सहा विभागातील खासदार, आमदार यात सहभाही होतील, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीने महामोर्चासाठी कंबर कसली आहे. ठिकठिकाणी बॅनरबाजी करत वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या विवाहाबद्दल बोलताना दिसत आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचे म्हणताना दिसत आहेत. याशिवाय कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब फुले यांनी शाळा सुरू केल्या. त्यांना सरकारने अनुदान नाही दिले. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असे चंद्रकांत पाटील म्हणताना दिसत आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rahul Shewaleराहुल शेवाळेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी