शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकार १ लाख रोजगार देणार; बेरोजगारांना 'या' क्षेत्रात नोकरीची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 16:29 IST

आम्ही MOU करून विसरणारे लोक नाही. करार झाल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई - राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जात असल्याने महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार बुडतायेत असा आरोप सातत्याने विरोधकांकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर केला जातो. विरोधकांच्या या आरोपांना उत्तर देण्यासाठी कौशल्य विभागाच्या पुढाकाराने १ लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामुळे आता शिंदे -फडणवीस सरकार १ लाख तरुणांना रोजगार देणार आहे. १ लाखाहून अधिक रोजगारासाठी आज सामंजस्य करार करण्यात आलेले आहेत. राजभवन येथे राज्यपाल भगतसिंग कोशयारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी असा निर्णय केला, आमच्या सरकारचा सर्वाधिक भर हा रोजगारावर असला पाहिजे. देशात शासकीय रोजगारावरची अघोषित बंदी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दूर केली. १० लाख रोजगार देण्याचा निर्णय केला. त्याअंतर्गत राज्य सरकारच्या वतीने ७५ हजार बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा निर्णय केला. त्याचसोबत खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून द्यायचा असं त्यांनी सांगितले. 

तसेच देशाचा महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातील ४५ टक्के लोक रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहेत आणि शेती क्षेत्राला एवढा रोजगार देण्याची क्षमता नाही. त्यामुळे उत्पादन, सेवा क्षेत्रात जोपर्यंत नोकरीची संधी उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत युवाशक्तीच्या हाताला कुणी काम देऊ शकत नाही. नोकरीची संधी निर्माण करायची असेल तर कौशल्य विकास हे महत्त्वाचं माध्यम आहे. आम्हाला प्रशिक्षित माणसं मिळत नाही असं उद्योजक सांगतात तर तरुण आमच्या हाताला काम नाही ही दरी संपवण्यासाठी कौशल्य विभाग काम करतंय. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन हाताला काम देण्याची जबाबदारी या विभागाने उचलली आहे. शेती क्षेत्राला सेवा, उत्पादन क्षेत्राशी जोडल्यानंतर शेतीवरील २० टक्के भार कमी होतोय असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

दरम्यान, आजच्या या कार्यक्रमात करारानुसार १ लाखाहून अधिकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. आम्ही MOU करून विसरणारे लोक नाही. करार झाल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करू, काही अडचणी सोडवू, सातत्याने सरकार तुमच्या संपर्कात असेल. योग्यप्रकारे सर्वजण काम कराल याचा विश्वास आहे. मंगलप्रभात लोढा यांनी या विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर दरवर्षीपेक्षा ३ पट रोजगार मेळावे घेतले जात आहेत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'या' क्षेत्रात नोकरीची संधीया कार्यक्रमात ४४ नामांकित उद्योजक, प्लेसमेंट एजन्सी, कौशल्य विभागाचे आयुक्त यांच्यासमावेत रोजगारासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे राज्यातील १ लाखाहून अधिक बेरोजगार युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यात प्रामुख्याने हॉस्पिटॅलिटी, मीडिया अँन्ड एन्टरटेन्मेंट, बांधकाम, रिटेल, बँकिंग, एव्हिएशन या क्षेत्रात दहावी पास-नापास, बारावी, पदवीधर, पदविकाधारक, फार्मसी, आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरींग पदवी या शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाjobनोकरी