शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

शिंदे-अजितदादांकडून शेतकरी देशोधडीला

By admin | Updated: October 10, 2014 22:58 IST

शालिनीताई पाटील : कोरेगावच्या जनतेचे वाटोळे करणाऱ्यांना हद्दपार करा

सातारा : ‘कोरेगाव, खटाव तालुक्यांतील २७ हजार सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना होता. मात्र, अजित पवार यांनी स्वत:च्या हितासाठी महाराष्ट्र राज्य बँकेच्या माध्यमातून कर्ज थकल्याचे निमित्त केले. आणि जरंडेश्वर कारखान्याची लिलावाद्वारे विक्री करून अजित पवार यांनी कारखाना खरेदी करून आपल्या मालकीचा केला. कारखाना खरेदी करण्यामध्ये अजित पवार यांना आ. शशिकांत शिंदे यांनी सहकार्य केले आहे. शेतकऱ्यांचे व त्यांच्या मुलांचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना हिसका दाखवून काँग्रेसचे उमेदवार विजय कणसे यांच्या पाठीशी राहावे,’ असे आवाहन डॉ. शालिनीताई पाटील यांनी केले आहे.जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक व कार्यकत्याची गोपनीय बैठक कोरेगाव येथे झाली. यानंतर शालिनीताई पाटील यांनी सांगितले की, १८ वर्षे संघर्ष करून १९९९ मध्ये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना सुरू केला. सुरुवातीच्या काळात कारखाना व्यवस्थित सुरू होता. परंतु राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्वत:च्या हितासाठी महाराष्ट्र राज्य बँकेच्या माध्यमातून कारखान्याचे कर्ज थकल्याचे निमित्त करून कारखान्याची लिलावाद्वारे विक्री केली. आणि हा कारखाना स्वत: खरेदी केला. २७ हजार सभासदांच्या मालकीचा असणारा हा कारखाना अजित पवारांनी स्वत:च्या मालकीचा करून घेऊन कोरेगाव, खटाव तालुक्यांतील सभासद शेतकरी यांच्यावर फार मोठा अन्याय केला आहे. कारखाना खरेदी करण्यामध्ये अजित पवार यांना आ. शशिकांत शिंदे यांनी सहकार्य केले आहे. शेतकऱ्यांचे व त्यांच्या मुलांचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना हिसका दाखवूनकारखाना गटाचे सर्व संचालक व सभासद कार्यकर्ते यांनी कोरेगाव येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. विजय कणसे यांनी शालिनीताई पाटील यांची समक्ष भेट घेऊन जरंडेश्वर कारखान्याचे, कोर्टामध्ये जे खटले सुरू आहेत, त्यास मदत करत आहेच व इथून पुढेही आमची मदत व सर्वतोपरी सहकार्य करून कारखाना पुन्हा सभासदांच्या मालकीचा होऊन कारखान्याचे तसेच सभासदांचे हित जोपासण्याचे काम करू,’ असे सांगितले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद कार्यकर्ते यांनी विजय कणसे यांना साथ देण्याचा निर्धार केला. (प्रतिनिधी) कारखाना विक्रीत माजी पालकमंत्र्यांचाच हातविद्यमान लोकप्रतिनिधींनी तसेच अजित पवार यांनी सभासद शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कारखाना खरेदी करण्यासाठीच आ. शशिकांत शिंदे यांनीच मदत केली आहे. त्यामुळे स्वहितासाठी काम करणाऱ्या आ. शिंदे यांना आता मतपेटीतून उत्तर देण्याची वेळ आली आहे. तरी सर्वांनी अ‍ॅड. विजय कणसे यांना साथ द्यावी,’ असे आवाहनही शालिनीताई पाटील यांनी कणसे याच्ंयाशी चर्चा झाल्यानंतर केले.