शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानेश्वरी समजून सांगणार्‍या प्राचार्य शेवाळकरांची आठवण

By admin | Updated: May 3, 2014 16:46 IST

ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल आणि आपल्या जीवनात ज्ञानेश्वरीचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर हक्काने कुणाकडे जावे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य राम शेवाळकर.

नानासाहेबांचा फोटो घ्यावा. - प्राचार्य राम शेवाळकरांची आज पुण्यतिथीनागपूर : ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल आणि आपल्या जीवनात ज्ञानेश्वरीचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर हक्काने कुणाकडे जावे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य राम शेवाळकर. मराठीचा अभ्यास करणारा विद्यार्थी असो वा तत्त्वज्ञानाचे संशोधन करणारा संशोधक. प्राचार्य राम शेवाळकर हसतमुखाने सार्‍यांचेच स्वागत करायचे. आता ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर काही लोक आहेत पण प्राचार्य शेवाळकर सांगायचे, तसे समजावून सांगणारे लोक नाहीत. त्यामुळेच नानासाहेबांची आठवण येते. ही आठवण केवळ त्यांच्या जयंती-पुण्यतिथीलाच येते असे नाही. पण या दिवशी ती अधिक प्रकर्षाने येते. नानासाहेब म्हणजे सर्वच विचारधारेच्या लोकांना जवळचे आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व. नानासाहेबांनी प्रत्येक विचारधारेचा आदरच केला. एखाद्या विचारांवर आपली श्रद्धा असते आणि तोच विचार आपल्याला बरोबर वाटतो, हे स्वाभाविक घडते. याचा अर्थ भिन्न विचारांची माणसे चुकीचीच असतात, असे नव्हे. प्रत्येकाच्या श्रद्धा, तत्त्व, विचार वेगवेगळे असू शकतात पण ते समाजासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी असले पाहिजे. मतभेद हे जिवंतपणाचे लक्षण आहे, ते असले पाहिजेत पण मनभेद नको, हे तत्त्व नानासाहेबांनी आयुष्यभर पाळले. त्यामुळे त्यांच्याशी मनभेद असणारी माणसे सापडत नाहीत. अजातशत्रू म्हणून नानासाहेबांची ओळख होती. नानासाहेब असताना त्यांचे घर नेहमीच माणसांनी फुललेले असायचे. अनेकांच्या लिखाणाची प्रेरणा ते होते. नागपूरकरांना नानासाहेब म्हणजे नागपूरचे वैभव वाटायचे. त्यांच्या जाण्याने हे वैभव हरविले, याची खंत सर्वांनाच कायम आहे. नानासाहेबांविषयी अनेकांना कायम कुतुहल वाटायचे. एकीकडे ज्ञानेश्वरी, विनोबा आणि म. गांधी यांच्यावर भावपूर्ण विवेचन करणारे नानासाहेब स्वातंत्र्यवीर सावरकरांवरही तितक्याच पोटतिडकीने बोलायचे. त्यांची व्याख्याने एखाद्या संशोधनापेक्षा कमी नव्हती. आज नानासाहेब नाहीत पण त्यांचा मुलगा आशुतोष शेवाळकर यांनी त्यांच्या व्याख्यानाचे काही संग्रह काढले आहेत. सीडीजही आहेत. यामुळे देहरूपाने नानासाहेब नसले तरी त्यांची व्याख्याने, त्यांचा आवाज त्यांच्या चाहत्यांपर्यत पोहोचतो आहे. प्रत्येक मोठा माणूस आपल्याला हवाच असतो. पण काही बाबी मानवी मर्यादांच्या पलीकडे असतात. येणारा माणूस कधीतरी जाणार असतो. हे शाश्वत सत्य नाकारता येत नाही. नानासाहेबही अनंत आठवणींचा पट ठेवून गेले. पण त्यांच्याबाबतीत हे सत्य स्वीकारणे आजही जड जाते, हे निश्चित!