शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

शेगावच्या ‘आनंद सागर’लाही बसला लालफीतशाहीचा फटका!

By admin | Updated: July 21, 2016 23:19 IST

गत तीन वर्षांपासून संत गजानन महाराज संस्थानचे सुरू होते प्रयत्न.

खामगाव (जि. बुलडाणा) : शेगाव येथील आनंद सागर या मनोहारी प्रकल्पाला ३0 वर्षांचा भाडेपट्टा वाढवून मिळाल्याचा गाजावाजा होत असला, तरी यासाठी संत गजानन महाराज संस्थानला गत दोन वषार्ंपासून बरेच प्रयत्न करावे लागले होते. संत गजानन महाराज संस्थानच्या आनंद सागर या प्रकल्पातील तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाने शेगाव येथील सर्व्हे नं. २२५ मधील ९४.९४ हेक्टर आर व सर्व्हे नं. २४७ मधील २.८१ हेक्टर आर अशी एकूण ९७.७५ हेक्टर आर जमीन विशेष बाब म्हणून १५ वर्षांच्या कालावधीसाठी संस्थानला दिली. त्यानंतर सर्व्हे नं. २४७ मधील क्षेत्र ६.३८ हेक्टर आर असल्याचे निदर्शनास आल्याने एकूण १0१.३२ हेक्टर आर जमिनीचा भाडेपट्टा १९९९ मध्ये संस्थानला देण्यात आला. दरम्यान, सदर जमीन कायमस्वरूपी किंवा दीर्घ मुदतीच्या कालावधीसाठी देण्याची मागणी संस्थानकडून शासनाकडे करण्यात आली. यावर नगर परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय व मंत्रालयातील आवश्यक त्या अटी, शतर्र्ींची पूर्तता संस्थानने केली. २६ डिसेंबर २0१४ रोजी संस्थानच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्यासाठी संस्थानसह जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पाठपुरावा करण्यात आला. मात्र मंत्रालयातील दप्तर दिरंगाईचा फटका संस्थानलाही बसला. विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी ह्यआनंद सागरह्णला भाडेपट्टा वाढवून मिळण्यासाठी प्रयत्न करीत असतानाही मंत्रालयातील आडमुठी धोरणामुळे शेगाव संस्थानला भाडेपट्टा लवकर मिळाला नाही.न्यायालयालाही करावा लागला हस्तक्षेप!शेगाव येथील खडवाडी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाबाबत न्यायालयात घेण्यात आलेल्या सुनावणीदरम्यान आनंद सागरच्या भाडेपट्ट्याचा विषय उच्च न्यायालयासमोर आला. तेव्हा न्यायालयानेही या संदर्भात शासनाकडून माहिती मागितली. त्यामुळे शासनाने आनंद सागरच्या भाडेपट्ट्याच्या फाइलला गती देत अखेर भाडेपट्टा वाढवून देण्याचा आदेशच काढला. मंत्रालयातील श्रींचे वास्तव ठरले अडसर!विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगाव संस्थानला भाडेपट्टा वाढवून मिळविण्यासाठी मंत्रालयातील एका श्रींचे ह्यवास्तवह्णच मोठय़ा अडचणीचे ठरल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. मुख्यमंत्र्यांकडून भाडेपट्टा वाढीला हिरवी झेंडी मिळाल्यानंतरही या अधिकार्‍याने कागदांचा ससेमिरा संस्थानच्या मागे लावला. अखेर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांच्या संमतीने आनंद सागरला ३0 वर्षांचा भाडेपट्टा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.लोकप्रतिनिधींचा पाठपुरावाराज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर तसेच बुलडाण्याचे तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासोबतच अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी आनंद सागरला भाडेपट्टा वाढवून मिळावा, यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला होता.