शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ऊस उत्पादक शेतकरी शेट्टींच्या ‘शोधात’!

By admin | Updated: December 12, 2014 23:34 IST

हंगामास गती : यंदा दराबाबत साखर कारखानदारही गप्पच--‘आपण यांना पाहिलंत का?’

अशोक पाटील - इस्लामपूर -दरवर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस दराच्या आंदोलनात उतरणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यंदा हंगाम सुरू होऊन दोन महिने लोटले तरी गप्प आहेत. त्यातच साखरसम्राटांनीही शांत राहून गळीत हंगाम आटोपण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेट्टींच्या शोधात असून काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर शेट्टींचे छायाचित्र पोस्ट करून, ‘आपण यांना पाहिलंत का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी यावर्षी उसाला २७०० रुपये दर मागितला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी २५०० रुपयांपर्यंत मजल मारली. साखरेचे भाव उतरले आहेत, असा कांगावा करत राज्यातील बहुतांश साखरसम्राटांनी दराबाबत मौन पाळून गळीत हंगाम संपविण्याचा मार्ग अवलंबला आहे.एकीकडे शेट्टी लोकसभेत जाऊन समितीच्या धोरणावर मत मांडत असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील ३५०० रुपयांसाठी आंदोलनाची भाषा करीत आहेत. शेट्टींचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी, एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करीत आंदोलनाची तयारी चालवली आहे. आघाडी सरकारच्या काळात शेट्टी यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिवावर मते मिळवत लोकसभेत दोनवेळा विजय मिळवला. गेल्या काही वर्षांत त्यांनी ऊसदराचे आंदोलन चांगलेच पेटवले होते. त्यामुळे एक-दोन महिने हंगाम लांबणीवर पडत होता. या आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही बसला होता. पण यावर्षीच्या हंगामात मात्र पूर्ण उलटी परिस्थिती आहे. यावेळी भाजप-शिवसेनेचे सरकार राज्यात आहे. निवडणुकीवेळी शेट्टी यांनी त्यांच्यासोबत राहून निवडणूक लढवली होती. त्यामुळेच शेट्टी यांनी यावेळच्या ऊस दराबाबत एक शब्दही काढलेला नाही. राज्यातील सर्वच कारखान्यांनी गळीत हंगाम जोमात सुरू केला आहे, परंतु अद्याप बऱ्याच कारखान्यांनी दराचा निर्णय जाहीर केलेला नाही. काहींनी तर १४०० ते १५०० रुपये देऊन ऊस उत्पादकांची घोर निराशा केली आहे.‘आपण यांना पाहिलंत का?’शेतकऱ्यांच्या बाजूने संघर्ष करणारे राजू शेट्टी यावेळी मात्र अज्ञातवासात गेले आहेत. ऊस उत्पादक त्यांना शोधत आहेत. काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर शेट्टी यांचे छायाचित्र पोस्ट करून, ‘आपण यांना पाहिलंत का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. ऊसपट्ट्यात या पोस्टरची जोरदार चर्चा आहे.शेतकऱ्यांच्या जिवावर मते मिळवत लोकसभेत दोनवेळा विजय मिळवला आहे. याच शेतकऱ्यांना त्यांनी का दूर सारले.