शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

ऊस उत्पादक शेतकरी शेट्टींच्या ‘शोधात’!

By admin | Updated: December 12, 2014 23:34 IST

हंगामास गती : यंदा दराबाबत साखर कारखानदारही गप्पच--‘आपण यांना पाहिलंत का?’

अशोक पाटील - इस्लामपूर -दरवर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस दराच्या आंदोलनात उतरणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यंदा हंगाम सुरू होऊन दोन महिने लोटले तरी गप्प आहेत. त्यातच साखरसम्राटांनीही शांत राहून गळीत हंगाम आटोपण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेट्टींच्या शोधात असून काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर शेट्टींचे छायाचित्र पोस्ट करून, ‘आपण यांना पाहिलंत का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी यावर्षी उसाला २७०० रुपये दर मागितला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी २५०० रुपयांपर्यंत मजल मारली. साखरेचे भाव उतरले आहेत, असा कांगावा करत राज्यातील बहुतांश साखरसम्राटांनी दराबाबत मौन पाळून गळीत हंगाम संपविण्याचा मार्ग अवलंबला आहे.एकीकडे शेट्टी लोकसभेत जाऊन समितीच्या धोरणावर मत मांडत असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील ३५०० रुपयांसाठी आंदोलनाची भाषा करीत आहेत. शेट्टींचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी, एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करीत आंदोलनाची तयारी चालवली आहे. आघाडी सरकारच्या काळात शेट्टी यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिवावर मते मिळवत लोकसभेत दोनवेळा विजय मिळवला. गेल्या काही वर्षांत त्यांनी ऊसदराचे आंदोलन चांगलेच पेटवले होते. त्यामुळे एक-दोन महिने हंगाम लांबणीवर पडत होता. या आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही बसला होता. पण यावर्षीच्या हंगामात मात्र पूर्ण उलटी परिस्थिती आहे. यावेळी भाजप-शिवसेनेचे सरकार राज्यात आहे. निवडणुकीवेळी शेट्टी यांनी त्यांच्यासोबत राहून निवडणूक लढवली होती. त्यामुळेच शेट्टी यांनी यावेळच्या ऊस दराबाबत एक शब्दही काढलेला नाही. राज्यातील सर्वच कारखान्यांनी गळीत हंगाम जोमात सुरू केला आहे, परंतु अद्याप बऱ्याच कारखान्यांनी दराचा निर्णय जाहीर केलेला नाही. काहींनी तर १४०० ते १५०० रुपये देऊन ऊस उत्पादकांची घोर निराशा केली आहे.‘आपण यांना पाहिलंत का?’शेतकऱ्यांच्या बाजूने संघर्ष करणारे राजू शेट्टी यावेळी मात्र अज्ञातवासात गेले आहेत. ऊस उत्पादक त्यांना शोधत आहेत. काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर शेट्टी यांचे छायाचित्र पोस्ट करून, ‘आपण यांना पाहिलंत का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. ऊसपट्ट्यात या पोस्टरची जोरदार चर्चा आहे.शेतकऱ्यांच्या जिवावर मते मिळवत लोकसभेत दोनवेळा विजय मिळवला आहे. याच शेतकऱ्यांना त्यांनी का दूर सारले.