शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादक शेतकरी शेट्टींच्या ‘शोधात’!

By admin | Updated: December 12, 2014 23:34 IST

हंगामास गती : यंदा दराबाबत साखर कारखानदारही गप्पच--‘आपण यांना पाहिलंत का?’

अशोक पाटील - इस्लामपूर -दरवर्षी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ऊस दराच्या आंदोलनात उतरणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यंदा हंगाम सुरू होऊन दोन महिने लोटले तरी गप्प आहेत. त्यातच साखरसम्राटांनीही शांत राहून गळीत हंगाम आटोपण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेट्टींच्या शोधात असून काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर शेट्टींचे छायाचित्र पोस्ट करून, ‘आपण यांना पाहिलंत का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी यावर्षी उसाला २७०० रुपये दर मागितला आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी २५०० रुपयांपर्यंत मजल मारली. साखरेचे भाव उतरले आहेत, असा कांगावा करत राज्यातील बहुतांश साखरसम्राटांनी दराबाबत मौन पाळून गळीत हंगाम संपविण्याचा मार्ग अवलंबला आहे.एकीकडे शेट्टी लोकसभेत जाऊन समितीच्या धोरणावर मत मांडत असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील ३५०० रुपयांसाठी आंदोलनाची भाषा करीत आहेत. शेट्टींचे सहकारी सदाभाऊ खोत यांनी, एफआरपीप्रमाणे दर न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करीत आंदोलनाची तयारी चालवली आहे. आघाडी सरकारच्या काळात शेट्टी यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिवावर मते मिळवत लोकसभेत दोनवेळा विजय मिळवला. गेल्या काही वर्षांत त्यांनी ऊसदराचे आंदोलन चांगलेच पेटवले होते. त्यामुळे एक-दोन महिने हंगाम लांबणीवर पडत होता. या आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनाही बसला होता. पण यावर्षीच्या हंगामात मात्र पूर्ण उलटी परिस्थिती आहे. यावेळी भाजप-शिवसेनेचे सरकार राज्यात आहे. निवडणुकीवेळी शेट्टी यांनी त्यांच्यासोबत राहून निवडणूक लढवली होती. त्यामुळेच शेट्टी यांनी यावेळच्या ऊस दराबाबत एक शब्दही काढलेला नाही. राज्यातील सर्वच कारखान्यांनी गळीत हंगाम जोमात सुरू केला आहे, परंतु अद्याप बऱ्याच कारखान्यांनी दराचा निर्णय जाहीर केलेला नाही. काहींनी तर १४०० ते १५०० रुपये देऊन ऊस उत्पादकांची घोर निराशा केली आहे.‘आपण यांना पाहिलंत का?’शेतकऱ्यांच्या बाजूने संघर्ष करणारे राजू शेट्टी यावेळी मात्र अज्ञातवासात गेले आहेत. ऊस उत्पादक त्यांना शोधत आहेत. काही शेतकऱ्यांनी सोशल मीडियावर शेट्टी यांचे छायाचित्र पोस्ट करून, ‘आपण यांना पाहिलंत का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. ऊसपट्ट्यात या पोस्टरची जोरदार चर्चा आहे.शेतकऱ्यांच्या जिवावर मते मिळवत लोकसभेत दोनवेळा विजय मिळवला आहे. याच शेतकऱ्यांना त्यांनी का दूर सारले.